शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

अनिल देशमुखांच्या दुकानदारीचे वस्त्रहरण, तर १०० कोटीत प्रत्येकाचा वाटा; भाजप नेत्याचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 14:13 IST

Param Bir Singh Letter: भाजप नेत्यांनी ट्विट करत महाविकास आघाडीतील नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना टोला लगावला आहे.

ठळक मुद्देशरद पवारांना भाजप नेत्याचा अप्रत्यक्ष टोलाट्विटरच्या माध्यमातून महाविकास आघाडीवर टीकातर १०० कोटीत प्रत्येकाचा वाटा आहे - अतुल भातखळकर

मुंबई : सचिन वाझे प्रकरण, (Sachin Vaze Case) परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर धक्कादायक आरोप करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेले पत्र (Param Bir Singh Letter) या एकूण राज्यातील प्रकरणांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यानंतर मंगळवारी  देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन फोन टॅपिंग प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. यावर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करत महाविकास आघाडीतील नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना टोला लगावला आहे. (bjp leader atul bhatkhalkar criticised maha vikas aghadi govt on param bir singh letter)

भाजपचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेनंतर भातखळकर यांनी एक ट्विट करून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. ''गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या दुकानदारीचे वस्त्रहरण करणारे नवे पुरावे आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उघड केले. पण तरीही ते निर्लज्जपणे खुर्ची उबवत बसले आहेत, तेवढाच निर्लज्जपणा दाखवत त्यांचे नेते देशमुखांचे समर्थन करित आहेत. थोडक्यात काय तर १०० कोटीत प्रत्येकाचा वाटा आहे, अशी भातखळकर यांनी केली आहे. 

शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्ष टीकेचे बाण

भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते म्हणजेच शरद पवार यांच्यावरही थेट नाव न घेता ‘त्यांचे नेते’ असा उल्लेख करत या ट्विटच्या माध्यमातून टीका केली आहे. पोलीस खात्यांमधील बदल्यासंदर्भातील घोटाळ्याचे पुरावे असतानाही कोणतीही कारवाई मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी केली नाही, असा आरोप करत देवेंद्र फडणवीस यांनी आता हे सर्व पुरावे केंद्रीय गृह सचिवांकडे देऊन CBI चौकशीची मागणी करणार असल्याचे म्हटले आहे. 

सत्ता जाणे हीच भाजपची दुखरी नस, आम्हाला नैतिकता शिकवू नये; शिवसेनेचा पलटवार

दरम्यान, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी अनिल देशमुख यांनी सचिना वाझे यांना दर महिन्याला बार, रेस्तराँ आणि अन्य आस्थापनांमधून १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते, असा धक्कादायक आरोप त्यांनी या पत्रातून केला आहे. भाजपाने या मुद्यावर आक्रमक भूमिका घेत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. तर नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. भाजपसह रिपाइं, वंचित बहुजन आघाडी आणि अन्य पक्षांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी आग्रही मागणी केली आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणAtul Bhatkalkarअतुल भातखळकरSharad Pawarशरद पवारAnil Deshmukhअनिल देशमुखParam Bir Singhपरम बीर सिंगsachin Vazeसचिन वाझेTwitterट्विटर