शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

राहुल गांधींनी जनतेसमोर उठाबश्या काढाव्यात; आशिष शेलारांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2021 12:55 IST

कार्नेल विद्यापीठातील एका कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी तत्कालीन पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांनी जाहीर केलेली आणीबाणी ही चूक होती, असे मोठे विधान केल्यानंतर आता त्यावर प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. भारतीय जनता पक्षाने (BJP) यावरून राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी आता जनतेसमोर उठाबश्या काढाव्यात, अशी टीका भाजप आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.

ठळक मुद्देराहुल गांधींच्या वक्तव्यानंतर आता राजकारण तापलेआणीबाणी ही चूक असल्याचे राहुल गांधींनी कबूल केले - आशिष शेलारइंदिरा गांधींची विचारसरणी चुकीची होती का, हेही स्पष्ट करावे - आशिष शेलार

मुंबई : कार्नेल विद्यापीठातील एका कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी तत्कालीन पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांनी जाहीर केलेली आणीबाणी ही चूक होती, असे मोठे विधान केल्यानंतर आता त्यावर प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. भारतीय जनता पक्षाने (BJP) यावरून राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी आता जनतेसमोर उठाबश्या काढाव्यात, अशी टीका भाजप आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. (bjp leader ashish shelar slams rahul gandhi over emergency statement)

भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना राहुल गांधींना टोला लगावला. ''राहुल गांधी यांनी आणीबाणीवरून माफी मागितली. आणीबाणी ही चूक असल्याचे कबूल केले. आणीबाणी चुकीची होती म्हणजे इंदिरा गांधी यांची त्यावेळची विचारसरणी चुकीची होती का? हेही राहुल गांधी यांनी स्पष्ट करावे'', अशी मागणी आशिष शेलार यांनी यावेळी बोलताना केली. 

आणीबाणी घोषित करणे आजीची चूकच, पण...; राहुल गांधींनी सांगितली 'मन की बात'

कांजूरमार्गची जागा खासगी मालकीची

कांजूरमार्गची जागा खासगी मालकीची आहे. कोर्टात हे सांगितले आहे. खासगी मालकाकडून आता ही जागा विकत घेतली जाणार आहे. त्यात भ्रष्टाचार होणार आहे. या जागेची किंमत ५० हजार कोटी असू शकते. जागा मालकासोबतचे साटेलोटे आता उघड होऊ लागलेत. सांगा कितीचा ठरलाय व्यवहार? अगोदरच ठरला होता ना हा व्यवहार?, असे अनेक प्रश्न आशिष शेलार यांनी उपस्थित केले.

गोध्रा दंगलीबद्दल नरेंद्र मोदी देशाची माफी मागणार का?

इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीबाबत राहुल गांधींनी माफी मागणे यात आम्हाला गैर वाटत नाही. राहुल यांनी मनाचा मोठेपणा दाखवून चूक स्वीकारली. इंदिरा गांधींनी केलेल्या चुकीची त्यांनी कबुली दिली. आता गोध्रा दंगलीबद्दल गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाची माफी मागणार का, असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी विचारला आहे.

काय म्हणाले राहुल गांधी?

कॉर्नेल विद्यापीठात एका कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी यांनी आणीबाणीबाबतचं मत व्यक्त केले. प्रोफेसर कौशिक बसु यांच्याशी साधलेल्या संवादादरम्यान राहुल गांधी यांनी आणीबाणीबाबत म्हटलं की, आणीबाणी घोषित करणं इंदिरा गांधी यांची चूक होती. मात्र, त्याचा पक्ष म्हणून काँग्रेसनं कधीही फायदा करून घेतला नाही. आणीबाणीचा काळ आणि आताची परिस्थिती भिन्न आहे. काँग्रेस पक्षानं स्वतंत्र संस्थांचा कधीही गैरवापर केला नाही, असा दावा राहुल गांधी यांनी यावेळी बोलताना केला. 

टॅग्स :PoliticsराजकारणRahul Gandhiराहुल गांधीIndira Gandhiइंदिरा गांधीBJPभाजपाAshish Shelarआशीष शेलारcongressकाँग्रेस