शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
2
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
3
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
4
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
5
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
6
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
7
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
8
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
9
'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार गौतमी पाटील? म्हणाली, "शो खूप छान आहे पण..."
10
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
11
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
12
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
13
अग्निवीर आणि अन्य जवान यांच्यामध्ये भेदभाव का होतो?; मुंबई उच्च न्यायालयात याचिका; केंद्र सरकारला हायकोर्टाची नोटीस
14
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
15
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
16
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
17
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
18
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
19
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
20
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
Daily Top 2Weekly Top 5

"शिवसेनेची अवस्था खाली डोकं आणि वर पाय अशी झाली आहे"; आशिष शेलारांची टीका

By देवेश फडके | Updated: February 4, 2021 14:04 IST

महाविकास आघाडी सरकार हिंदूंचा अपमान करणाऱ्या शरजील उस्मानीला पळून जाण्यास मदत करत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.

ठळक मुद्देभाजप नेते आशिष शेलार यांची शिवसेनेवर जोरदार टीकामहाविकास आघाडी सरकारने शरजीलला मदत केल्याचा आरोपशिवसेनेने आमच्याकडे क्लास लावावा - आशिष शेलार

मुंबई : शिवसेनेची अवस्था खाली डोकं आणि वर पाय अशी झाली आहे. अमिबाला सुद्धा लाज वाटावी, अशाप्रकारे एकाच वेळी चार पद्धतीने चालणारा शिवसेना पक्ष आहे, अशी जोरदार टीका भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. मुंबईत आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलताना आशिष शेलार यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. 

महाविकास आघाडी सरकार हिंदूंचा अपमान करणाऱ्या शरजील उस्मानीला पळून जाण्यास मदत करत असल्याचा आरोप करत शरजीलने केलेल्या अपमानास्पद टिप्पणीची तुलना इतर कोणाशी करणे, याचा अर्थ यांचे डोके ठिकाणावर आहे का, असा प्रश्न विचारण्यासारखा आहे. भाजपने दोन दिवस आंदोलन केल्यानंतर सरकारने पावले उचलायला सुरुवात केली. भाजपने मागणी लावून धरल्यानंतर अटक करण्यासाठी कारवाई केली जात आहे. मूळात परिषदेला परवानगीच का दिली?, अशी विचारणा आशिष शेलार यांनी केली. 

"बाळासाहेबांचा फोटो लावून शिवसेना खंडणी घेतेय", संदीप देशपांडेंनी पुरावेच दाखवले

महाविकास आघाडी सरकारची शरजीलला मदत?

शरजील उस्मानीने परिषदेत केलेल्या वक्तव्यानंतर त्याला मुंबई आणि महाराष्ट्राबाहेर जाऊ का दिले? शरजीलला पळून जाण्यासाठी मदत करण्याचे काम सत्तेत बसलेल्या महाविकास आघाडीने केले आहे, असा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे. भाजपने दोन दिवस आंदोलन करत मागणी लावून धरल्यानंतर गुन्हा दाखल करू, असे म्हणणे ही पश्चात्तापबुद्धी आहे. शिवसेनेने हिंदूंना सडलेला म्हणणाऱ्या व्यक्तीला वाचवण्याचे काम का केले, हे स्पष्ट करावे, अशी मागणी त्यांनी यावेळी बोलताना केली.

शिवसेनेने आमच्याकडे क्लास लावावा

नागपूरच्या कार्यालयात आपण वारंवार भेटला आहात, आताही जावे. शिवसेनेने आमच्याकडे क्लास लावावा. भाजपाला बाजूला ठेवण्याच्या हेतूने स्वत:च पर्याय म्हणून दुसऱ्यांच्या कुबड्या घेतात. आपल्या विचारधारेला तिलांजली देतात. देशातील जनतेच्या मानसिकतेच्या मतांवर भाष्य करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. मुख्यमंत्री महोदयांनी सूर्यावर थुंकण्याचे प्रयोग करू नयेत, असे आशिष शेलार म्हणाले.

तेव्हा महाराष्ट्रद्रोह आठवतो आणि आता?

महाराष्ट्रावर परराज्यातून कोणी टीका केली, तर यांना महाराष्ट्रद्रोह आठवतो. पण मग आता परदेशातून कोणी आपल्या देशाच्या विषयावर टीका, बदनामी केली, तर यांना आनंद होतोय. हे परदेशातील कनेक्शन काय आहे हे संजय राऊत यांनी जनतेसमोर मांडावे, अशीही मागणी आशिष शेलार यांनी यावेळी केली. 

 

टॅग्स :PoliticsराजकारणAshish Shelarआशीष शेलारUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाShiv Senaशिवसेना