शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

"शिवसेनेची अवस्था खाली डोकं आणि वर पाय अशी झाली आहे"; आशिष शेलारांची टीका

By देवेश फडके | Updated: February 4, 2021 14:04 IST

महाविकास आघाडी सरकार हिंदूंचा अपमान करणाऱ्या शरजील उस्मानीला पळून जाण्यास मदत करत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.

ठळक मुद्देभाजप नेते आशिष शेलार यांची शिवसेनेवर जोरदार टीकामहाविकास आघाडी सरकारने शरजीलला मदत केल्याचा आरोपशिवसेनेने आमच्याकडे क्लास लावावा - आशिष शेलार

मुंबई : शिवसेनेची अवस्था खाली डोकं आणि वर पाय अशी झाली आहे. अमिबाला सुद्धा लाज वाटावी, अशाप्रकारे एकाच वेळी चार पद्धतीने चालणारा शिवसेना पक्ष आहे, अशी जोरदार टीका भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. मुंबईत आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलताना आशिष शेलार यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. 

महाविकास आघाडी सरकार हिंदूंचा अपमान करणाऱ्या शरजील उस्मानीला पळून जाण्यास मदत करत असल्याचा आरोप करत शरजीलने केलेल्या अपमानास्पद टिप्पणीची तुलना इतर कोणाशी करणे, याचा अर्थ यांचे डोके ठिकाणावर आहे का, असा प्रश्न विचारण्यासारखा आहे. भाजपने दोन दिवस आंदोलन केल्यानंतर सरकारने पावले उचलायला सुरुवात केली. भाजपने मागणी लावून धरल्यानंतर अटक करण्यासाठी कारवाई केली जात आहे. मूळात परिषदेला परवानगीच का दिली?, अशी विचारणा आशिष शेलार यांनी केली. 

"बाळासाहेबांचा फोटो लावून शिवसेना खंडणी घेतेय", संदीप देशपांडेंनी पुरावेच दाखवले

महाविकास आघाडी सरकारची शरजीलला मदत?

शरजील उस्मानीने परिषदेत केलेल्या वक्तव्यानंतर त्याला मुंबई आणि महाराष्ट्राबाहेर जाऊ का दिले? शरजीलला पळून जाण्यासाठी मदत करण्याचे काम सत्तेत बसलेल्या महाविकास आघाडीने केले आहे, असा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे. भाजपने दोन दिवस आंदोलन करत मागणी लावून धरल्यानंतर गुन्हा दाखल करू, असे म्हणणे ही पश्चात्तापबुद्धी आहे. शिवसेनेने हिंदूंना सडलेला म्हणणाऱ्या व्यक्तीला वाचवण्याचे काम का केले, हे स्पष्ट करावे, अशी मागणी त्यांनी यावेळी बोलताना केली.

शिवसेनेने आमच्याकडे क्लास लावावा

नागपूरच्या कार्यालयात आपण वारंवार भेटला आहात, आताही जावे. शिवसेनेने आमच्याकडे क्लास लावावा. भाजपाला बाजूला ठेवण्याच्या हेतूने स्वत:च पर्याय म्हणून दुसऱ्यांच्या कुबड्या घेतात. आपल्या विचारधारेला तिलांजली देतात. देशातील जनतेच्या मानसिकतेच्या मतांवर भाष्य करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. मुख्यमंत्री महोदयांनी सूर्यावर थुंकण्याचे प्रयोग करू नयेत, असे आशिष शेलार म्हणाले.

तेव्हा महाराष्ट्रद्रोह आठवतो आणि आता?

महाराष्ट्रावर परराज्यातून कोणी टीका केली, तर यांना महाराष्ट्रद्रोह आठवतो. पण मग आता परदेशातून कोणी आपल्या देशाच्या विषयावर टीका, बदनामी केली, तर यांना आनंद होतोय. हे परदेशातील कनेक्शन काय आहे हे संजय राऊत यांनी जनतेसमोर मांडावे, अशीही मागणी आशिष शेलार यांनी यावेळी केली. 

 

टॅग्स :PoliticsराजकारणAshish Shelarआशीष शेलारUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाShiv Senaशिवसेना