शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

"शिवसेनेची अवस्था खाली डोकं आणि वर पाय अशी झाली आहे"; आशिष शेलारांची टीका

By देवेश फडके | Updated: February 4, 2021 14:04 IST

महाविकास आघाडी सरकार हिंदूंचा अपमान करणाऱ्या शरजील उस्मानीला पळून जाण्यास मदत करत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.

ठळक मुद्देभाजप नेते आशिष शेलार यांची शिवसेनेवर जोरदार टीकामहाविकास आघाडी सरकारने शरजीलला मदत केल्याचा आरोपशिवसेनेने आमच्याकडे क्लास लावावा - आशिष शेलार

मुंबई : शिवसेनेची अवस्था खाली डोकं आणि वर पाय अशी झाली आहे. अमिबाला सुद्धा लाज वाटावी, अशाप्रकारे एकाच वेळी चार पद्धतीने चालणारा शिवसेना पक्ष आहे, अशी जोरदार टीका भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. मुंबईत आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलताना आशिष शेलार यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. 

महाविकास आघाडी सरकार हिंदूंचा अपमान करणाऱ्या शरजील उस्मानीला पळून जाण्यास मदत करत असल्याचा आरोप करत शरजीलने केलेल्या अपमानास्पद टिप्पणीची तुलना इतर कोणाशी करणे, याचा अर्थ यांचे डोके ठिकाणावर आहे का, असा प्रश्न विचारण्यासारखा आहे. भाजपने दोन दिवस आंदोलन केल्यानंतर सरकारने पावले उचलायला सुरुवात केली. भाजपने मागणी लावून धरल्यानंतर अटक करण्यासाठी कारवाई केली जात आहे. मूळात परिषदेला परवानगीच का दिली?, अशी विचारणा आशिष शेलार यांनी केली. 

"बाळासाहेबांचा फोटो लावून शिवसेना खंडणी घेतेय", संदीप देशपांडेंनी पुरावेच दाखवले

महाविकास आघाडी सरकारची शरजीलला मदत?

शरजील उस्मानीने परिषदेत केलेल्या वक्तव्यानंतर त्याला मुंबई आणि महाराष्ट्राबाहेर जाऊ का दिले? शरजीलला पळून जाण्यासाठी मदत करण्याचे काम सत्तेत बसलेल्या महाविकास आघाडीने केले आहे, असा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे. भाजपने दोन दिवस आंदोलन करत मागणी लावून धरल्यानंतर गुन्हा दाखल करू, असे म्हणणे ही पश्चात्तापबुद्धी आहे. शिवसेनेने हिंदूंना सडलेला म्हणणाऱ्या व्यक्तीला वाचवण्याचे काम का केले, हे स्पष्ट करावे, अशी मागणी त्यांनी यावेळी बोलताना केली.

शिवसेनेने आमच्याकडे क्लास लावावा

नागपूरच्या कार्यालयात आपण वारंवार भेटला आहात, आताही जावे. शिवसेनेने आमच्याकडे क्लास लावावा. भाजपाला बाजूला ठेवण्याच्या हेतूने स्वत:च पर्याय म्हणून दुसऱ्यांच्या कुबड्या घेतात. आपल्या विचारधारेला तिलांजली देतात. देशातील जनतेच्या मानसिकतेच्या मतांवर भाष्य करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. मुख्यमंत्री महोदयांनी सूर्यावर थुंकण्याचे प्रयोग करू नयेत, असे आशिष शेलार म्हणाले.

तेव्हा महाराष्ट्रद्रोह आठवतो आणि आता?

महाराष्ट्रावर परराज्यातून कोणी टीका केली, तर यांना महाराष्ट्रद्रोह आठवतो. पण मग आता परदेशातून कोणी आपल्या देशाच्या विषयावर टीका, बदनामी केली, तर यांना आनंद होतोय. हे परदेशातील कनेक्शन काय आहे हे संजय राऊत यांनी जनतेसमोर मांडावे, अशीही मागणी आशिष शेलार यांनी यावेळी केली. 

 

टॅग्स :PoliticsराजकारणAshish Shelarआशीष शेलारUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाShiv Senaशिवसेना