शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पोलिसांनी नोटीस पाठवावी; भाजपाची मागणी, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 13:35 IST

शिवसैनिक ताणतणाव निर्माण करत असतील पोलिसांनी मुख्यमंत्र्यांना नोटीस पाठवायला हवी अशी मागणी अनिल बोंडे यांनी केली.

मुंबई – युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी मातोश्री समोर हनुमान चालीसा पठण करणार असा इशारा दिल्यानंतर आता यावरून राजकारण पेटलं आहे. राणा दाम्पत्याविरोधात मातोश्रीबाहेर शिवसैनिकांनी गर्दी करून घोषणाबाजी करत आहेत. त्यावरून भाजपा नेते अनिल बोंडे यांनी शिवसेनेला खोचक सल्ला दिला आहे. आंदोलन करण्याऐवजी शिवसैनिकांनी हनुमान चालीसेचं पठण करावं असं बोंडे यांनी म्हटलं आहे.

अनिल बोंडे म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा अनुयायी, मी माजी शिवसैनिक म्हणून सांगतो, राणा दाम्पत्याचा उदो उदो उद्धार करण्यापेक्षा हनुमान चालीसा पठण करा, हर हर महादेवच्या घोषणा द्या. मातोश्रीबाहेर बसलात आहात तर रामरक्षा म्हणा. महाबली हनुमानाचा जयजयकार करा. पवनसुत हनुमान की जय. कमीत कमी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करा. पूर्ण महाराष्ट्र तुमच्यावर हसतोय. आपण जेव्हा चांगला सल्ला देतो, तेव्हा समोरचा सत्तेने आंधळे झालेले लोकं कुणाचंही ऐकत नाही. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी समजुतदारपणा दाखवून शिवसैनिकांना हनुमान चालीसा म्हणायला सांगा असं त्यांनी सांगितले.

तसेच मातोश्रीसमोर हनुमान चालीसा म्हटल्याने जातीय तेढ कसा निर्माण होईल? उद्धव ठाकरेंच्या आदेशानंतर शिवसैनिक जमत असतील. ताणतणाव निर्माण करत असतील मग पोलिसांनी राणा दाम्पत्याप्रमाणेच मुख्यमंत्र्यांनाही नोटीस पाठवायला हवी. जागोजागी शिवसैनिकांना जमवून लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचं काम केले जात आहे. त्यामुळे जातीय सलोखा संपतोय, तेढ निर्माण होतोय त्यामुळे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी निरपक्षेपणे कारवाई करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही नोटीस बजावावी अशी मागणी बोंडे यांनी केली आहे.

महाराष्ट्राला अस्थिर करण्याचा डाव

राणा दाम्पत्यांनी मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करणार असल्याचं सांगितल्याने त्यांना विरोध करण्यासाठी शिवसैनिक जमले आहेत. त्यावेळी अनिल देसाई यांनी भाजपावर निशाणा साधत म्हटलं आहे की, आमच्या रक्तात हिंदुत्व आहे. भाजपा नव्याने हिंदुत्व शिकतंय. त्यांना गरज आहे. महाराष्ट्र कुठे चालला आहे. कुणाला फूस लावून सोडलं आहे. स्वत: बिळात गेले आहे. हनुमान चालीसाच्या माध्यमातून महाराष्ट्राला अस्थिर करण्याचा डाव आहे असा आरोप देसाईंनी केला आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाAnil Bondeअनिल बोंडे