शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पोलिसांनी नोटीस पाठवावी; भाजपाची मागणी, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 13:35 IST

शिवसैनिक ताणतणाव निर्माण करत असतील पोलिसांनी मुख्यमंत्र्यांना नोटीस पाठवायला हवी अशी मागणी अनिल बोंडे यांनी केली.

मुंबई – युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी मातोश्री समोर हनुमान चालीसा पठण करणार असा इशारा दिल्यानंतर आता यावरून राजकारण पेटलं आहे. राणा दाम्पत्याविरोधात मातोश्रीबाहेर शिवसैनिकांनी गर्दी करून घोषणाबाजी करत आहेत. त्यावरून भाजपा नेते अनिल बोंडे यांनी शिवसेनेला खोचक सल्ला दिला आहे. आंदोलन करण्याऐवजी शिवसैनिकांनी हनुमान चालीसेचं पठण करावं असं बोंडे यांनी म्हटलं आहे.

अनिल बोंडे म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा अनुयायी, मी माजी शिवसैनिक म्हणून सांगतो, राणा दाम्पत्याचा उदो उदो उद्धार करण्यापेक्षा हनुमान चालीसा पठण करा, हर हर महादेवच्या घोषणा द्या. मातोश्रीबाहेर बसलात आहात तर रामरक्षा म्हणा. महाबली हनुमानाचा जयजयकार करा. पवनसुत हनुमान की जय. कमीत कमी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करा. पूर्ण महाराष्ट्र तुमच्यावर हसतोय. आपण जेव्हा चांगला सल्ला देतो, तेव्हा समोरचा सत्तेने आंधळे झालेले लोकं कुणाचंही ऐकत नाही. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी समजुतदारपणा दाखवून शिवसैनिकांना हनुमान चालीसा म्हणायला सांगा असं त्यांनी सांगितले.

तसेच मातोश्रीसमोर हनुमान चालीसा म्हटल्याने जातीय तेढ कसा निर्माण होईल? उद्धव ठाकरेंच्या आदेशानंतर शिवसैनिक जमत असतील. ताणतणाव निर्माण करत असतील मग पोलिसांनी राणा दाम्पत्याप्रमाणेच मुख्यमंत्र्यांनाही नोटीस पाठवायला हवी. जागोजागी शिवसैनिकांना जमवून लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचं काम केले जात आहे. त्यामुळे जातीय सलोखा संपतोय, तेढ निर्माण होतोय त्यामुळे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी निरपक्षेपणे कारवाई करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही नोटीस बजावावी अशी मागणी बोंडे यांनी केली आहे.

महाराष्ट्राला अस्थिर करण्याचा डाव

राणा दाम्पत्यांनी मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करणार असल्याचं सांगितल्याने त्यांना विरोध करण्यासाठी शिवसैनिक जमले आहेत. त्यावेळी अनिल देसाई यांनी भाजपावर निशाणा साधत म्हटलं आहे की, आमच्या रक्तात हिंदुत्व आहे. भाजपा नव्याने हिंदुत्व शिकतंय. त्यांना गरज आहे. महाराष्ट्र कुठे चालला आहे. कुणाला फूस लावून सोडलं आहे. स्वत: बिळात गेले आहे. हनुमान चालीसाच्या माध्यमातून महाराष्ट्राला अस्थिर करण्याचा डाव आहे असा आरोप देसाईंनी केला आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाAnil Bondeअनिल बोंडे