शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

"थोडासा स्वाभिमानाचा च्यवनप्राश घ्या अन् एखादा चमचा..."; संजय राऊतांवर भाजपाचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 16:05 IST

Shivaji Maharaj Statue, Sanjay Raut vs BJP: राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर राऊतांनी केलेल्या टीकेला भाजपाकडून प्रत्युत्तर

Shivaji Maharaj Statue, Sanjay Raut vs BJP: छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माफी मागितली. त्यानंतर शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केले. "राज्यात सध्या जे वातावरण आहे, ते पाहता राज्याला गृहमंत्री आहे का? असेल तर एवढा दुबळा कसा? असा प्रश्न उपस्थित होतो. फडणवीसांना स्वतःला गृहमंत्री म्हणवून घेण्याचा अधिकार नाही," असे टीकास्त्र राऊतांनी सोडले. या टीकेला भाजपाकडूनही सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

"काँग्रेसपुढे कण्यातून वाकलेले आणि स्वहस्ते पक्षाची शकले केलेले जेव्हा दुसऱ्यांना हिणवण्याचे शाब्दिक चाळे करतात, तेव्हा हसून दुर्लक्ष करणंच योग्य असतं. संजय राऊत, तुम्हीच थोडासा स्वाभिमानाचा च्यवनप्राश घ्या आणि एखादं-दुसरा चमचा उद्धवजींना पण द्या. लाचारीच्या विषाणूने तसेही तुम्ही अशक्त झाला आहात. त्यामुळे येत्या निवडणुकीत तुम्ही टिकाव धरण्याची शक्यता नाही. म्हणूनच देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून सशक्त आहेत की अशक्त, याची उठाठेव करण्यापेक्षा स्वतःचा पक्ष सलाईनवर का गेलाय?, याचं आत्मपरिक्षण करा," अशा शब्दांत भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये यांनी राऊतांवर निशाणा साधला.

संजय राऊत काय म्हणाले होते?

"माफी मागून असा विषय मिटतो का? मग असे अनेक विषय माफी मागून सुटायला पाहिजे. मग काय आम्ही चाळीस गद्दारांना माफी द्यायची का? सरकारच्या गळ्याशी आल्याने, तोंड दाखवायला जागा नसल्याने असे बोलतायत की मुख्यमंत्र्यांची माफी महाराष्ट्राने स्वीकारायला पाहिजे. नुसत्या माफीला काही अर्थ नाही. या शिल्पकाराला काम देण्याची शिफारस कुणाची होती हे तुम्ही जाहीर करा. नंतर माफी मागा," असा खोचक सल्ला राऊतांनी मुख्यमंत्र्याना दिला होता.

"तुमच्या राज्याच्या वर्दीच्या लोकांवर कोकणातले गुंड धावून जातात. तुम्ही त्यांना संरक्षण देऊ शकत नाही. तुम्ही कसे गृहमंत्री? सरकारची लाज गेली आहे. ती चारही बाजूंनी सील करून परत येणार नाही. प्रधानमंत्री कायम मौनात असतात. जिथे चमकायला मिळते, तिथे बरोबर येतात. ते येणार असतात तेव्हा चार-चार हेलिपॅड बांधली जातात. एरवी शिवजयंतीला ते ट्विट करतात. पण पुतळा कोसळल्यानंतर त्यांनी लगेच एकही ट्विट केले नाही," याकडे राऊतांनी लक्ष वेधले.

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजSanjay Rautसंजय राऊतDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदे