शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

"थोडासा स्वाभिमानाचा च्यवनप्राश घ्या अन् एखादा चमचा..."; संजय राऊतांवर भाजपाचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 16:05 IST

Shivaji Maharaj Statue, Sanjay Raut vs BJP: राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर राऊतांनी केलेल्या टीकेला भाजपाकडून प्रत्युत्तर

Shivaji Maharaj Statue, Sanjay Raut vs BJP: छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माफी मागितली. त्यानंतर शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केले. "राज्यात सध्या जे वातावरण आहे, ते पाहता राज्याला गृहमंत्री आहे का? असेल तर एवढा दुबळा कसा? असा प्रश्न उपस्थित होतो. फडणवीसांना स्वतःला गृहमंत्री म्हणवून घेण्याचा अधिकार नाही," असे टीकास्त्र राऊतांनी सोडले. या टीकेला भाजपाकडूनही सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

"काँग्रेसपुढे कण्यातून वाकलेले आणि स्वहस्ते पक्षाची शकले केलेले जेव्हा दुसऱ्यांना हिणवण्याचे शाब्दिक चाळे करतात, तेव्हा हसून दुर्लक्ष करणंच योग्य असतं. संजय राऊत, तुम्हीच थोडासा स्वाभिमानाचा च्यवनप्राश घ्या आणि एखादं-दुसरा चमचा उद्धवजींना पण द्या. लाचारीच्या विषाणूने तसेही तुम्ही अशक्त झाला आहात. त्यामुळे येत्या निवडणुकीत तुम्ही टिकाव धरण्याची शक्यता नाही. म्हणूनच देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून सशक्त आहेत की अशक्त, याची उठाठेव करण्यापेक्षा स्वतःचा पक्ष सलाईनवर का गेलाय?, याचं आत्मपरिक्षण करा," अशा शब्दांत भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये यांनी राऊतांवर निशाणा साधला.

संजय राऊत काय म्हणाले होते?

"माफी मागून असा विषय मिटतो का? मग असे अनेक विषय माफी मागून सुटायला पाहिजे. मग काय आम्ही चाळीस गद्दारांना माफी द्यायची का? सरकारच्या गळ्याशी आल्याने, तोंड दाखवायला जागा नसल्याने असे बोलतायत की मुख्यमंत्र्यांची माफी महाराष्ट्राने स्वीकारायला पाहिजे. नुसत्या माफीला काही अर्थ नाही. या शिल्पकाराला काम देण्याची शिफारस कुणाची होती हे तुम्ही जाहीर करा. नंतर माफी मागा," असा खोचक सल्ला राऊतांनी मुख्यमंत्र्याना दिला होता.

"तुमच्या राज्याच्या वर्दीच्या लोकांवर कोकणातले गुंड धावून जातात. तुम्ही त्यांना संरक्षण देऊ शकत नाही. तुम्ही कसे गृहमंत्री? सरकारची लाज गेली आहे. ती चारही बाजूंनी सील करून परत येणार नाही. प्रधानमंत्री कायम मौनात असतात. जिथे चमकायला मिळते, तिथे बरोबर येतात. ते येणार असतात तेव्हा चार-चार हेलिपॅड बांधली जातात. एरवी शिवजयंतीला ते ट्विट करतात. पण पुतळा कोसळल्यानंतर त्यांनी लगेच एकही ट्विट केले नाही," याकडे राऊतांनी लक्ष वेधले.

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजSanjay Rautसंजय राऊतDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदे