शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

Keshav Upadhye : "भाकरी एकाची, चाकरी दुसऱ्याची… हा राऊतांचा सध्याचा फॉर्म्युला"; भाजपाचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2023 15:23 IST

BJP Keshav Upadhye Slams Sanjay : भाजपाचे नेते केशव उपाध्ये यांनी राऊतांवर हल्लाबोल केला आहे. उपाध्ये यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.

सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर सातत्याने टीका करण्यात येते. जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या काही आमदारांसह भाजपमध्ये यावे असा त्यांच्यावर दबाव होता अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. जयंत पाटील यांनी भाजपचा प्रस्ताव नाकारला तेव्हा लगेच ईडीने त्यांना बोलावणे पाठवले व साडेनऊ तास प्रश्नांच्या फैरी झाडल्या. यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. ईडीने अनेकांच्या बाबतीत हे घडवले आहे असं सामनाच्या आजच्या अग्रलेखात म्हटलं आहे. यावरून भाजपाने ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना खोचक टोला लगावला आहे. 

"भाकरी एकाची आणि चाकरी दुसऱ्याची… हा संजय राऊत यांचा सध्याचा फॉर्म्युला आहे…" असं म्हणत निशाणा साधला आहे. तसेच तारतम्य सोडून काहीही बोलायचं हा संजय राऊतांचा हल्लीचा छंद असल्याचं देखील म्हटलं आहे. भाजपाचे नेते केशव उपाध्ये यांनी राऊतांवर हल्लाबोल केला आहे. केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "भाकरी एकाची आणि चाकरी दुसऱ्याची… हा संजय राऊत यांचा सध्याचा फॉर्म्युला आहे… सामनाची अवस्था संजय राऊतांनी त्यांच्या वक्तव्यांसारखीच म्हणजेच फेक न्यूज फॅक्टरीसारखी करुन ठेवली आहे…"

"तारतम्य सोडून काहीही बोलायचं हा संजय राऊतांचा हल्लीचा छंद आहे, तसे लिखाणही सामनामधून होत आहे… भारतीय जनता पार्टीने जयंत पाटलांना कोणताही प्रस्ताव देण्याचा काही संबंधही नाही. केवळ चौकशीच्या मुख्य मुद्द्यावरुन लक्ष हटवण्यासाठी हा खोटा दावा केला जातोय… संजय राऊत आधी पवार साहेबांचे प्रवक्ते होते… ते आता जयंत पाटलांनाही डिपेंड करताहेत… याचाच अर्थ आता राऊत राष्ट्रवादीचे अधिकृत प्रवक्ते झाले आहेत…" असं म्हणत केशव उपाध्ये यांनी संजय राऊतांवर टीकास्त्र सोडलं आहे.

"केंद्रीय तपास यंत्रणा भाजपच्या घरगडय़ांसारख्या वागत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांची साडेनऊ तास चौकशी होते, पण भाजपमधील भ्रष्टाचाऱ्यांना मोकळे रान मिळते. मात्र चौकश्यांचा कितीही फेरा मागे लावलात तरी स्वाभिमानींना शांत झोप लागते हे जयंत पाटील यांनी दाखवून दिले. पाटला-पाटलांत फरक असतो! काही पाटलांचे पाणीच वेगळे असते. जयंतराव त्यापैकीच आहेत" असं सामनाच्या आजच्या अग्रलेखात म्हटलं आहे. 

टॅग्स :BJPभाजपाSanjay Rautसंजय राऊतJayant Patilजयंत पाटील