शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

"'भारत' शब्दाला विरोध आणि परदेशात जाऊन 'भारत जोडो' म्हणायचे, दुटप्पी भूमिका कशासाठी?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2023 11:39 IST

BJP Keshav Upadhye slams Rahul Gandhi : भाजपाचे नेते केशव उपाध्ये यांनी राहुल गांधींवर टीकास्त्र सोडलं आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा परदेशातून भारत सरकारवर निशाणा साधला आहे. युरोप दौऱ्यावर असलेले राहुल गांधी पॅरिसमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी इंडिया-भारत वाद आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. ज्यांना एखाद्या गोष्टीचे नाव बदलायचं आहे, ते इतिहास नाकारण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी टीका त्यांनी यावेळी केली. त्यांच्या या टीकेला आता भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "मुळात काँग्रेस नेते राहुल गांधीना हिंदुत्वावर बोलण्याचा काहीतरी अधिकार आहे का?" असा सवाल विचारत हल्लाबोल केला आहे. 

'भारत' शब्दाला विरोध करायचा आणि परदेशात जाऊन 'भारत जोडो' म्हणायचे, ही दुटप्पी भूमिका कशासाठी? असं म्हणत निशाणा साधला आहे. भाजपाचे नेते केशव उपाध्ये यांनी राहुल गांधींवर टीकास्त्र सोडलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "मुळात काँग्रेस नेते राहुल गांधीना हिंदुत्वावर बोलण्याचा काहीतरी अधिकार आहे का? परदेशात जाऊन भारताची बदनामी करणे, हा एक कलमी कार्यक्रम त्यांनी हाती घेतला आहे."

"मोदीजींची दूरदृष्टी आणि हिंदुत्व राहुलजींना कधीच कळणार नाही. काँग्रेसच्या नेत्यांची कल्पनाशक्ती ज्या ठिकाणी थांबते, त्या ठिकाणी मोदीजींची कल्पनाशक्ती सुरू होते, यातच काय ते आले. राहुल गांधीनी पॅरिसमध्ये जाऊन आपल्या 'भारत जोडो' यात्रेबद्दल म्हणे माहिती दिली. 'भारत' शब्दाला विरोध करायचा आणि परदेशात जाऊन 'भारत जोडो' म्हणायचे, ही दुटप्पी भूमिका कशासाठी? 'इंडिया जोडो' म्हणा ना!" असं केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

राहुल यांनी आपल्या राज्यघटनेत 'इंडिया म्हणजेच भारत' अशी व्याख्या करण्यात आली आहे. या राज्यांना एकत्र करुन इंडिया किंवा भारत बनला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या राज्यांमध्ये सर्व लोकांचा समावेश आहे. त्यांचा आवाज ऐकला जातो, कुणाचाही आवाज दाबला जात. मी गीता, उपनिषदे आणि इतर अनेक हिंदू पुस्तके वाचली आहेत, परंतु भारतीय जनता पक्ष (भाजप) जे काही करत आहे, त्याचा हिंदू धर्माशी काही संबंध नाही. नाव बदलणारे लोक इतिहास नाकारण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीका केली आहे.  

टॅग्स :BJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधीIndiaभारतPoliticsराजकारण