शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 15:24 IST

BJP Jaykumar Gore News: एवढा सक्षम मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला आहे. देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले पाहिजेत, यात काहीच शंका नाही, असे भाजपा नेत्यांनी म्हटले आहे.

BJP Jaykumar Gore News: २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला न भूतो असे यश मिळाले. त्यातही भाजपा पक्ष क्रमांक एकचा पक्ष ठरला. परंतु, यानंतर शपथविधीपासून ते मंत्रिमंडळ विस्तारापर्यंत अनेक टप्प्यांवर महायुतीत मानापमान नाट्य घडल्याचे पाहायला मिळाले. पालकमंत्रीपदावरून महायुतीत असलेली धुसपूस अद्यापही शमलेली नाही. यातच महायुतीतील घटक पक्ष एकमेकांवर कुरघोडी करायची एकही संधी सोडत नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असल्याचे सांगितले जाते. यातच आता भाजपा नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत मोठे भाकित केले आहे. यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून, अनेक नेते यावर प्रतिक्रिया देत आहेत.

विकसित महाराष्ट्राचा संकल्प देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस २०३४ पर्यंत या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील. विकसित महाराष्ट्राचा संकल्प आपल्याला पूर्ण करायचा आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावर असल्याशिवाय विकसित महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण होऊ शकत नाही. आता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातच आपल्याला पुढे जायचे आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे डबल इंजिनचे सरकारच महाराष्ट्राचे भले करू शकते, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले. यावरून आता भाजपा नेते आणि राज्याचे मंत्री जयकुमार गोरे यांनी भाष्य केले.

२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमचे नेते आहेत. भाजपा नेते आहेत. भाजपाची सत्ता अविरत राहावी ही माझी मनापासूनची इच्छा आहे. देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले पाहिजेत, यात काहीच शंका नाही. एवढा सक्षम मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला आहे. त्यामुळे २०३४ काय त्यापुढे असले तरीही हरकत नाही, असे जयकुमार गोरे यांनी म्हटले आहे. तसेच पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या प्रकरणावरून देशातील सर्वांच्याच मनात प्रचंड चीड आहे. नक्कीच याला उत्तर द्यावे लागेल. पंतप्रधान मोदी यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. याचे परिणाम पाकिस्तानला भोगावे लागतील, अशी टीकाही जयकुमार गोरे यांनी केली.

दरम्यान, शरद पवार यांनी केलेल्या विधानावर जयकुमार गोरे यांनी भाष्य केले. शरद पवार मोठे नेते आहेत. मात्र अशा प्रसंगी प्रश्न निर्माण करणे ही त्यांची जुनी सवय आहे. मात्र देश एकत्र आहे. देशाने एकत्र राहून मुकाबला केला पाहिजे. अशा संकटात या प्रवृत्तीचा नायनाट केला पाहिजे. अशावेळी सर्वांनी एकत्र यायला हवे. कधी पुलवामा हल्ल्यावर शंका निर्माण केली. आता यावर केली जात आहे. मात्र याची चर्चा होऊ नये, एवढीच अपेक्षा आहे, असेही गोरे यांनी म्हटले आहे. 

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाJaykumar Goreजयकुमार गोरेMahayutiमहायुतीChief Ministerमुख्यमंत्री