शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

'कर्ज घेऊन दिवाळी सण साजरा करण्याचा भाजपा सरकारचा प्रयत्न'; नाना पटोलेंचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2024 15:46 IST

रस्ते मारण्यासाठी नाही, तर सुविधांसाठी असतात, अशी टीका नाना पटोले यांनी केली. 

कर्ज घेऊन दिवाळी सण साजरा करण्याचा प्रयत्न भाजपा सरकार करत असल्याचं हे स्पष्ट आहे. समृद्धी महामार्गासाठी ७५ हजार कोटी कर्ज घेतले आहे. देशात आणि राज्याच्या जनतेवर कर्ज वाढवणे, हे विकासाच्या नावावर प्रकल्प लुटण्याचे काम सुरू आहे. समृद्धी मार्गावर रोज अपघात होत आहेत. कोट्यावधी रुपये त्या लोकांचे रुग्णालयात खर्च होत आहेत. रस्ते मारण्यासाठी नाही, तर सुविधांसाठी असतात, अशी टीका नाना पटोले यांनी केली. 

भाजपा जातीय आधारावर सार्वजनिक पुजारी नेमण्याचे धोरण बदलणार असेल, तर आम्ही त्यांच्यासोबत राजकीय समझौता करायला तयार आहोत, असे जाहीर करत वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी नवी गुगली टाकली. प्रकाश आंबेडकरांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे. प्रकाश आंबेडकरांच्या या विधानावर देखील पत्रकारांनी नाना पटोले यांना प्रश्न विचारला. यावर प्रकाश आंबेडकरांवर मला काही प्रतिक्रिया द्यायची नाही, असं नाना पटोले म्हणाले. 

दरम्यान, महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांच्यात १५ जागांवर अजूनही तिढा आहे. तो सुटलेला नाही. आघाडी होणार की नाही याविषयी शंका आहे. जागेचे हे भिजत घोंगडे मिटल्याशिवाय वंचितला किती जागा मिळणार हे सांगता येणार नाही. त्यामुळे महाविकास आघाडी जागा सोडो अथवा न सोडो ४८ जागा लढविण्यासाठी आमच्याकडे उमेदवार आहेत. २७ जागांची पूर्ण तयारी झाली आहे. मुंबईत महाविकास आघाडीच्या बैठकीला मी उद्या जाणार आहे. त्यांचा निर्णय झाल्यावर आम्ही आमचा निर्णय घोषित करू, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर