शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

Maharashtra Political Crisis: “उदय सामंतांवर हल्ला करणारे पवारांचे कार्यकर्ते!”; गोपीचंद पडळकरांचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 16:23 IST

Maharashtra Political Crisis: पुण्यात शिवसैनिक आहेतच किती, अशी विचारणा करत आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यावेळी राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते, असा दावा गोपीचंद पडळकरांनी केला आहे.

Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटातील बंडखोर आमदार आणि राज्याचे माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या कारवर हल्ला झाला होता. याप्रकरणी काही शिवसैनिकांना अटक करण्यात आली आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ शिंदे गटातून आता तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्ष आता पुढच्या टप्प्यावर जाताना पाहायला मिळत आहे. यातच आता उदय सामंत यांच्यावर झालेल्या हल्ल्यावरून आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहे. भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना, ते शिवसैनिक नव्हते, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते होते, असा दावा करून खळबळ उडवून दिली आहे. 

'म्हसोबाला नाही बायको, सटवाईला नाही नवरा', अशी अवस्था राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसची झाली आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शिवसेनाच्या नावाखाली घोषणाबाजी करत असून राष्ट्रवादीकडूनच उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे, असा गंभीर आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. 

आदित्य ठाकरे जात आहेत, तिथे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित

आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते गळ्यात भगवा गमछा घालून घोषणाबाजी करत आहेत. ज्या ठिकाणी आदित्य ठाकरे जात आहेत, तिथे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रामुख्याने मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. त्यामुळे हा झंजावात दौरा नाही, एकमेकांना हे फक्त मदत सुरू आहे, असे सांगत पडळकर यांनी आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यांची खिल्ली उडवली.

पुण्यात शिवसेनेचे कार्यकर्तेच नाहीत

ज्या पद्धतीने उदय सामंत यांच्या कारवर हल्ला झालाय ते पाहता हा हल्ला शिवसैनिकांनी केलेला नाही. कारण शिवसैनिक इतक्या मोठ्या संख्येने पुण्यात नाहीत. ते बऱ्यापैकी राष्ट्रवादीची लोकं आहेत. अनेक ठिकाणी जिथं जिथं आदित्य ठाकरेंची रॅले होतेय आणि जिथं जिथं मोठ्या सभा होताहेत तिथं खासकरून पवारांची माणसं तिथे उपस्थित असतात. त्यामुळे याच लोकांनी हल्ला केला असेल, असा मोठा दावा पडळकर यांनी केला. 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळGopichand Padalkarगोपीचंद पडळकरSharad Pawarशरद पवारUday Samantउदय सामंत