शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

भाजपाच्या काही खासदारांचे तिकीट कापणार? लोकसभेसाठी नवे चेहरे देण्याचा विचार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2019 07:23 IST

२०१४ च्या निवडणुकीत चार ते पाच खासदारांसह किमान आठ ते दहा उमदेवार भारतीय जनता पार्टी बदलेल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. भाजपात त्यावर विचारमंथन सुरू आहे.

- यदु जोशीमुंबई  - २०१४ च्या निवडणुकीत चार ते पाच खासदारांसह किमान आठ ते दहा उमदेवार भारतीय जनता पार्टी बदलेल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. भाजपात त्यावर विचारमंथन सुरू आहे.वर्धेचे खासदार रामदास तडस यांना लोकसभेची उमेदवारी न देता सहा महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरविले जाऊ शकते. तडस यांचा देवळीमध्ये २००९ मध्ये ३,७४६ मतांनी पराभव झाला होता. २०१४ च्या निवडणुकीत भाजपाचे माजी खासदार सुरेश वाघमारे यांनी जोरदार टक्कर दिली पण काँग्रेसचे रणजित कांबळे यांनी त्यांचा ९४३ मतांनी पराभव केला होता. भंडारा-गोंदियामध्ये भाजपाने गेल्या वर्षीच्या पोटनिवडणुकीत हेमंत पटले यांना उमेदवारी दिली पण ते पराभूत झाले. यावेळी स्थानिक जातीय समीकरणांचा विचार करुन भाजपातर्फे कुणबी समाजाला संधी दिली जाईल, असे म्हटले जाते.माहिती अशी आहे की, माजी मंत्री आणि वर्धेचे माजी खासदार दत्ता मेघे यांचे पुत्र सागर यांना यावेळी भाजपाची वर्धा लोकसभेची उमेदवारी दिली जाईल. सागर हे २०१४ मध्ये काँग्रेसचे उमेदवार होते आणि मोदी लाटेत त्यांचा मोठा पराभव झाला होता. त्यानंतर ते राजकारणापासून अलिप्त होते. सागर यांचे बंधू समीर हे नागपूर जिल्ह्यातील हिंगणामधून भाजपाचे आमदार आहेत.पुणे लोकसभा मतदारसंघात अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी उमेदवारी मागितली आहे. गेल्यावेळीच त्यांची खासदारकीसाठी लढण्याची तीव्र इच्छा होती पण मुंडे-गडकरी वादात त्यांची संधी हुकली होती. यावेळी विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांचे अन्यत्र राजकीय पुनर्वसन केले जाईल.अहमदनगरचे विद्यमान भाजपा खासदार दिलिप गांधी यांच्या पर्यायाचा विचारही पक्षात सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अलिकडे झालेल्या महापालिका निवडणुकीत गांधी यांचा मुलगा आणि सून असे दोघेही पराभूत झाले होते. आघाडीमध्ये ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आहे. तेथे राष्ट्रवादीमध्ये उमेदवारीसाठीच्या चढाओढीत एखादा तगडा चेहरा गळाला लागेल का, यावर भाजपाची नजर आहे. भाजपामधूनच पर्याय द्यायचा तर पालकमंत्री राम शिंदे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड ही नावे प्रामुख्याने आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय यांनी मध्यंतरी लोकसभेला लढण्याची घोषणा करून खळबळ उडविली होती. ते भाजपाचे उमेदवार होऊ शकतात, असेही म्हटले जात होते. तथापि, तीन राज्यांतील भाजपाच्या पराभवानंतर आणि एकूणच वातावरण भाजपाविरोधी असल्याचा अंदाज आल्याने सुजय यांनी भाजपात जाण्याचा विचार सोडला असल्याचे त्यांच्या निकटस्थांनी सांगितले.सोलापूरमध्ये माजी केंद्रीय गृह मंत्री सुशीलकुमार शिंदे हे काँग्रेसचे उमेदवार असतील, असे नक्की मानले जाते. त्यामुळे भाजपाचे विद्यमान खासदार शरद बनसोडे यांच्याऐवजी राज्यसभेचे सदस्य अमर साबळे यांचे नाव निश्चित मानले जाते. साबळे यांनी एक वर्षापासून सोलापुरात संपर्क ठेवला आहे.माढा मतदारसंघ पक्षासाठी महत्त्वाचासोलापूर शेजारचा माढा मतदारसंघ युतीमध्ये गेल्यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कोट्यात होता व तेथे सदाभाऊ खोत लढले पण राष्ट्रवादीचे विजयसिंह मोहिते पाटील यांनी त्यांचा पराभव केला होता. या वेळी ही जागा भाजपा आपल्याकडे घेईल, असे म्हटले जाते. त्या परिस्थितीत सहकारमंत्री सुभाष देशमुख, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजयमामा शिंदे ही नावे चर्चेत आहेत. विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह यांना आपल्याकडे आणून उमेदवारी देण्याची खेळीही भाजपा खेळू शकते.ईशान्य मुंबईचे खासदार किरीट सोमय्या यांच्या पर्यायाचादेखील विचार केला जात आहे. मात्र, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी खासदारकीसाठी लढण्यास होकार दिला, तर सोमय्या यांना डच्चू दिला जाऊ शकतो. या शिवाय, नांदेडमधून उमेदवार बदलण्यात येणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :BJPभाजपाPoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्र