शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2024 19:34 IST

Devendra Fadnavis News: लोकांनी मन बनवलेले आहे की, देशात नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवायचे आहे. विरोधकांना जनता मतपेटीतूनच उत्तर देईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Devendra Fadnavis News: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपासह महायुतीतील सर्वच पक्ष जोरदार प्रचार करताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठिकठिकाणच्या उमेदवारांचा प्रचार करण्यात व्यस्त आहेत. कोल्हापूर येथे पोहोचलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या टीकेवर पलटवार करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी फोन करून उद्धव ठाकरे यांची चौकशी, विचारपूस करायचे, असे म्हटले आहे. 

पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लोकांनी मन बनवलेले आहे की, देशात नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवायचे आहे. जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिले. देशासमोर मोदींचे संकट आहे, अशी टीका करण्यात आली होती. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. देशासमोरचे संकट पंतप्रधान नरेंद्र मोदी नाहीत. परंतु, त्यांच्यासमोरचे, त्यांच्या पक्षासमोरचे मोठे संकट नरेंद्र मोदी आहेत. कारण पंतप्रधान मोदी आल्यानंतर त्यांच्या पक्षाची अवस्था जी झाली, त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेस आमच्यासोबत आली आहे. त्यामुळे निश्चितच त्यांच्यासमोर नरेंद्र मोदी यांचे संकट आहे. बाकी संपूर्ण देशवासीयांचे प्रेम पंतप्रधान मोदींवर आहे. याचे उत्तर जनता मतपेटीतून देईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच मी जे बोललोय, ते सत्य बोललोय, त्यावर वारंवार बोलायची गरज नाही, असेही फडणवीस यांनी सांगितले.

मोदीजी नियमितपणे फोन करून उद्धव ठाकरे यांची विचारपूस करायचे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत बोलताना उद्धव ठाकरे आजारी असताना, रश्मी ठाकरे यांना फोन करून प्रकृतीची चौकशी करत होतो. त्यांनी मदत मागितली, तरी ती करण्यासाठी पहिल्या क्रमांकावर मी असेन, असे म्हटले होते. याबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी मुलाखत पाहिली नाही. परंतु, हे सत्य आहे. राजकारणात पक्ष वेगवेगळे असू शकतात. अडचणीच्या काळात, आजारपणामध्ये विचारपूस करणे ही आपली संस्कृती आहे आणि मोदीजी ती नेहमी पाळतात. त्यामुळे मला पूर्ण कल्पना आहे की, त्या काळात मोदीजी नियमितपणे फोन करून उद्धव ठाकरे यांची विचारपूस करायचे. काही लागले किंवा काही आवश्यकता असेल, तर विचारायचे, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, निश्चितच संभाजीराजे यांनाचा आवमान झाला. छत्रपती घराण्याबद्दल आदर आहे असे सांगायचे अन् अटी शर्थी घालायच्या. सगळे जे काही केले ते अपमान करण्याकरिताच झाले, अशी टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarendra Modiनरेंद्र मोदीUddhav Thackerayउद्धव ठाकरेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४