शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2024 19:34 IST

Devendra Fadnavis News: लोकांनी मन बनवलेले आहे की, देशात नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवायचे आहे. विरोधकांना जनता मतपेटीतूनच उत्तर देईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Devendra Fadnavis News: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपासह महायुतीतील सर्वच पक्ष जोरदार प्रचार करताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठिकठिकाणच्या उमेदवारांचा प्रचार करण्यात व्यस्त आहेत. कोल्हापूर येथे पोहोचलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या टीकेवर पलटवार करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी फोन करून उद्धव ठाकरे यांची चौकशी, विचारपूस करायचे, असे म्हटले आहे. 

पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लोकांनी मन बनवलेले आहे की, देशात नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवायचे आहे. जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिले. देशासमोर मोदींचे संकट आहे, अशी टीका करण्यात आली होती. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. देशासमोरचे संकट पंतप्रधान नरेंद्र मोदी नाहीत. परंतु, त्यांच्यासमोरचे, त्यांच्या पक्षासमोरचे मोठे संकट नरेंद्र मोदी आहेत. कारण पंतप्रधान मोदी आल्यानंतर त्यांच्या पक्षाची अवस्था जी झाली, त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेस आमच्यासोबत आली आहे. त्यामुळे निश्चितच त्यांच्यासमोर नरेंद्र मोदी यांचे संकट आहे. बाकी संपूर्ण देशवासीयांचे प्रेम पंतप्रधान मोदींवर आहे. याचे उत्तर जनता मतपेटीतून देईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच मी जे बोललोय, ते सत्य बोललोय, त्यावर वारंवार बोलायची गरज नाही, असेही फडणवीस यांनी सांगितले.

मोदीजी नियमितपणे फोन करून उद्धव ठाकरे यांची विचारपूस करायचे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत बोलताना उद्धव ठाकरे आजारी असताना, रश्मी ठाकरे यांना फोन करून प्रकृतीची चौकशी करत होतो. त्यांनी मदत मागितली, तरी ती करण्यासाठी पहिल्या क्रमांकावर मी असेन, असे म्हटले होते. याबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी मुलाखत पाहिली नाही. परंतु, हे सत्य आहे. राजकारणात पक्ष वेगवेगळे असू शकतात. अडचणीच्या काळात, आजारपणामध्ये विचारपूस करणे ही आपली संस्कृती आहे आणि मोदीजी ती नेहमी पाळतात. त्यामुळे मला पूर्ण कल्पना आहे की, त्या काळात मोदीजी नियमितपणे फोन करून उद्धव ठाकरे यांची विचारपूस करायचे. काही लागले किंवा काही आवश्यकता असेल, तर विचारायचे, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, निश्चितच संभाजीराजे यांनाचा आवमान झाला. छत्रपती घराण्याबद्दल आदर आहे असे सांगायचे अन् अटी शर्थी घालायच्या. सगळे जे काही केले ते अपमान करण्याकरिताच झाले, अशी टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarendra Modiनरेंद्र मोदीUddhav Thackerayउद्धव ठाकरेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४