शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

"अरेच्चा उद्धवजी! हेच का तुमचं सावरकरप्रेम आणि बाळासाहेबांविषयीचा जाज्वल्य अभिमान?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2024 13:01 IST

भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.

भारत जोडो न्याय यात्रा मुंबईत पोहोचली आहे. आज शिवाजी पार्कवर जाहीर सभा होणार आहे. या सभेत इंडिया आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. १७ मार्च रोजी रॅलीचे आयोजन करण्यात आले असून यात इंडिया आघाडीचे सर्व दिग्गज नेते सहभागी होणार आहेत. या रॅलीत उद्धव ठाकरे, शरद पवार, मल्लिकार्जुन खर्गे, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, आरजेडी नेते तेजस्वी यादव यांच्यासह इंडिया आघाडीचे अनेक ज्येष्ठ नेते सहभागी होऊन देशाला एकतेचा संदेश देणार आहेत.

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांच्यासोबत प्रियंका गांधी उपस्थित आहेत. याच दरम्यान भाजपाने यावरून उद्धव ठाकरे यांना खोचक सवाल विचारला आहे. "अरेच्चा उद्धवजी! हेच का तुमचं सावरकरप्रेम आणि बाळासाहेबांविषयीचा जाज्वल्य अभिमान?" असं म्हणत निशाणा साधला आहे. तसेच "काँग्रेसची मुजोरी आणि उबाठाची ‘जी हुजुरी’ हेच राहुल गांधींच्या पदयात्रेत पाहायला मिळतंय" असंही म्हटलं आहे. 

भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "अरेच्चा उद्धवजी…!  हेच का तुमचं सावरकरप्रेम आणि बाळासाहेबांविषयीचा जाज्वल्य अभिमान? तुमचं खोटं प्रेम आणि बेगडी अभिमान काँग्रेसचरणी लोटांगण घालताना साऱ्या मराठी जनतेने आज पाहिला…"

"राहुल गांधी सगळ्या ऐतिहासिक स्थळांना आणि महापुरूषांच्या पुतळ्यांना अभिवादन करत मुंबईभर फिरताहेत. पण, दोन स्थळांबद्दल मात्र त्यांना भलतीच ॲलर्जी... स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक आणि वंदनीय बाळासाहेबांच्या स्मृती जागवणारं शिवतीर्थ..! काँग्रेस वारंवार या महामानवांना अपमानित करूनही उबाठा गटाला लाचारी काही सोडवत नाही. काँग्रेसची मुजोरी आणि उबाठाची ‘जी हुजुरी’ हेच राहुल गांधींच्या पदयात्रेत पाहायला मिळतंय…" असं चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेChitra Waghचित्रा वाघRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस