शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

"राज्य सरकार असेल थंड तर आता आम्हीच पुकारू बंड"; चित्रा वाघ यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2022 19:27 IST

BJP Chitra Wagh And Thackeray Government : चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

मुंबई - भाजपा नेत्या चित्रा वाघ (BJP Chitra Wagh) यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर (Thackeray Government) जोरदार हल्लाबोल केला आहे. "राज्य सरकार असेल थंड तर आता आम्हीच पुकारू बंड" असं म्हणत निशाणा साधला आहे. "राज्यात अपहरणकर्ती टोळी तर फिरतेच आहे आणि आता तर अल्पवयीन-तरूण मुलींच्या अवैध गर्भपाताचा गोरखधंदाही उघड झाला आहे. चिमुकल्या जीवांशी खेळण्याची 30-30 हजारांत सौदेबाजी चालली आहे. कायदे कमजोर नाहीत. कायद्याच्या रक्षणकर्त्यांचा जोर ओसरला आहे. राज्य सरकार असेल थंड तर आता आम्हीच पुकारू बंड" असा इशारा चित्रा वाघ यांनी दिला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे. 

"अतिशय धक्कादायक आणि संतापजनक घटना वर्धा मधील आर्वी येथे घडली आहे. एका 13 वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आला. त्याच्यात ती गर्भवती राहिली आणि आरोपीच तिला गर्भपातासाठी घेऊन गेला. 30 हजारांत व्यवहार झाला अशी बातमी 11 जानेवारी रोजी समजली. आर्वी पोलिसांनी तत्काळ त्या ठिकाणी धाव घेतली आणि धक्का बसला की, काही कवट्या, हाडं, गर्भपिशव्या त्या ठिकाणी सापडल्या. याचा अर्थ मोठा गोरखधंदा तिथे सुरू होता. किती अवैध गर्भपात तिथे केले गेले? किती मुलांना मारलं गेलं? किती चिमुकल्यांची हत्या केली गेली? हे सांगता येणार नाही" असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

"महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडाल्याचं पाहायला मिळतंय"

"सांगलीच्या म्हैसाळची पुनरावृत्ती या ठिकाणी झाल्याचं वाटत आहे. मला आठवतंय की, सांगलीच्या म्हैसाळमध्ये अशाच प्रकारची घटना घडली होती. या सगळ्या प्रकरणाचं मूळ जर पाहिलं तर ते कुठे ना कुठे राज्याच्या कायदा सुव्यवस्थेकडे जातं आहे. कारण, या 13 वर्षाच्या मुलीवरती लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. माझ्याकडे अशा प्रकारे अत्याचार झालेल्या अनेक मुलींची यादी आहे. यामुळेच कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडाल्याचं आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे." 

"गृहविभाग आणि आरोग्य विभागाने एकत्रित येऊन योजना बनवली पाहिजे"

"मला असं वाटतं की या पार्श्वभूमीवरती नक्कीच गृहविभाग आणि आरोग्य विभागाने एकत्रित येऊन एखादी योजना बनवली पाहिजे. कायदे हे कधीच कमकुवत नसतात परंतु त्याची अमलबजावणी करणारे मात्र कमकुवत झाल्याचे पाहायला मिळत आहे. म्हणून या हरामखोरांना सोडता कामा नये, राज्यात 25 हजार महिला गायब झाल्याची धक्कादायक माहिती गृहमंत्र्यांनी दिलेली आहे आणि त्यातील कित्येक जणींसोबत असा प्रकार झाला असेल, याची भीती आता वाटते आहे. त्यामुळेच याची गंभीर दखल घेणं तितकच गरजेचं आहे" असं देखील चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Chitra Waghचित्रा वाघMaharashtraमहाराष्ट्रBJPभाजपाPoliticsराजकारण