शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

"राज्य सरकार असेल थंड तर आता आम्हीच पुकारू बंड"; चित्रा वाघ यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2022 19:27 IST

BJP Chitra Wagh And Thackeray Government : चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

मुंबई - भाजपा नेत्या चित्रा वाघ (BJP Chitra Wagh) यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर (Thackeray Government) जोरदार हल्लाबोल केला आहे. "राज्य सरकार असेल थंड तर आता आम्हीच पुकारू बंड" असं म्हणत निशाणा साधला आहे. "राज्यात अपहरणकर्ती टोळी तर फिरतेच आहे आणि आता तर अल्पवयीन-तरूण मुलींच्या अवैध गर्भपाताचा गोरखधंदाही उघड झाला आहे. चिमुकल्या जीवांशी खेळण्याची 30-30 हजारांत सौदेबाजी चालली आहे. कायदे कमजोर नाहीत. कायद्याच्या रक्षणकर्त्यांचा जोर ओसरला आहे. राज्य सरकार असेल थंड तर आता आम्हीच पुकारू बंड" असा इशारा चित्रा वाघ यांनी दिला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे. 

"अतिशय धक्कादायक आणि संतापजनक घटना वर्धा मधील आर्वी येथे घडली आहे. एका 13 वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आला. त्याच्यात ती गर्भवती राहिली आणि आरोपीच तिला गर्भपातासाठी घेऊन गेला. 30 हजारांत व्यवहार झाला अशी बातमी 11 जानेवारी रोजी समजली. आर्वी पोलिसांनी तत्काळ त्या ठिकाणी धाव घेतली आणि धक्का बसला की, काही कवट्या, हाडं, गर्भपिशव्या त्या ठिकाणी सापडल्या. याचा अर्थ मोठा गोरखधंदा तिथे सुरू होता. किती अवैध गर्भपात तिथे केले गेले? किती मुलांना मारलं गेलं? किती चिमुकल्यांची हत्या केली गेली? हे सांगता येणार नाही" असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

"महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडाल्याचं पाहायला मिळतंय"

"सांगलीच्या म्हैसाळची पुनरावृत्ती या ठिकाणी झाल्याचं वाटत आहे. मला आठवतंय की, सांगलीच्या म्हैसाळमध्ये अशाच प्रकारची घटना घडली होती. या सगळ्या प्रकरणाचं मूळ जर पाहिलं तर ते कुठे ना कुठे राज्याच्या कायदा सुव्यवस्थेकडे जातं आहे. कारण, या 13 वर्षाच्या मुलीवरती लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. माझ्याकडे अशा प्रकारे अत्याचार झालेल्या अनेक मुलींची यादी आहे. यामुळेच कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडाल्याचं आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे." 

"गृहविभाग आणि आरोग्य विभागाने एकत्रित येऊन योजना बनवली पाहिजे"

"मला असं वाटतं की या पार्श्वभूमीवरती नक्कीच गृहविभाग आणि आरोग्य विभागाने एकत्रित येऊन एखादी योजना बनवली पाहिजे. कायदे हे कधीच कमकुवत नसतात परंतु त्याची अमलबजावणी करणारे मात्र कमकुवत झाल्याचे पाहायला मिळत आहे. म्हणून या हरामखोरांना सोडता कामा नये, राज्यात 25 हजार महिला गायब झाल्याची धक्कादायक माहिती गृहमंत्र्यांनी दिलेली आहे आणि त्यातील कित्येक जणींसोबत असा प्रकार झाला असेल, याची भीती आता वाटते आहे. त्यामुळेच याची गंभीर दखल घेणं तितकच गरजेचं आहे" असं देखील चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Chitra Waghचित्रा वाघMaharashtraमहाराष्ट्रBJPभाजपाPoliticsराजकारण