शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

"राज्य सरकार असेल थंड तर आता आम्हीच पुकारू बंड"; चित्रा वाघ यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2022 19:27 IST

BJP Chitra Wagh And Thackeray Government : चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

मुंबई - भाजपा नेत्या चित्रा वाघ (BJP Chitra Wagh) यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर (Thackeray Government) जोरदार हल्लाबोल केला आहे. "राज्य सरकार असेल थंड तर आता आम्हीच पुकारू बंड" असं म्हणत निशाणा साधला आहे. "राज्यात अपहरणकर्ती टोळी तर फिरतेच आहे आणि आता तर अल्पवयीन-तरूण मुलींच्या अवैध गर्भपाताचा गोरखधंदाही उघड झाला आहे. चिमुकल्या जीवांशी खेळण्याची 30-30 हजारांत सौदेबाजी चालली आहे. कायदे कमजोर नाहीत. कायद्याच्या रक्षणकर्त्यांचा जोर ओसरला आहे. राज्य सरकार असेल थंड तर आता आम्हीच पुकारू बंड" असा इशारा चित्रा वाघ यांनी दिला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे. 

"अतिशय धक्कादायक आणि संतापजनक घटना वर्धा मधील आर्वी येथे घडली आहे. एका 13 वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आला. त्याच्यात ती गर्भवती राहिली आणि आरोपीच तिला गर्भपातासाठी घेऊन गेला. 30 हजारांत व्यवहार झाला अशी बातमी 11 जानेवारी रोजी समजली. आर्वी पोलिसांनी तत्काळ त्या ठिकाणी धाव घेतली आणि धक्का बसला की, काही कवट्या, हाडं, गर्भपिशव्या त्या ठिकाणी सापडल्या. याचा अर्थ मोठा गोरखधंदा तिथे सुरू होता. किती अवैध गर्भपात तिथे केले गेले? किती मुलांना मारलं गेलं? किती चिमुकल्यांची हत्या केली गेली? हे सांगता येणार नाही" असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

"महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडाल्याचं पाहायला मिळतंय"

"सांगलीच्या म्हैसाळची पुनरावृत्ती या ठिकाणी झाल्याचं वाटत आहे. मला आठवतंय की, सांगलीच्या म्हैसाळमध्ये अशाच प्रकारची घटना घडली होती. या सगळ्या प्रकरणाचं मूळ जर पाहिलं तर ते कुठे ना कुठे राज्याच्या कायदा सुव्यवस्थेकडे जातं आहे. कारण, या 13 वर्षाच्या मुलीवरती लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. माझ्याकडे अशा प्रकारे अत्याचार झालेल्या अनेक मुलींची यादी आहे. यामुळेच कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडाल्याचं आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे." 

"गृहविभाग आणि आरोग्य विभागाने एकत्रित येऊन योजना बनवली पाहिजे"

"मला असं वाटतं की या पार्श्वभूमीवरती नक्कीच गृहविभाग आणि आरोग्य विभागाने एकत्रित येऊन एखादी योजना बनवली पाहिजे. कायदे हे कधीच कमकुवत नसतात परंतु त्याची अमलबजावणी करणारे मात्र कमकुवत झाल्याचे पाहायला मिळत आहे. म्हणून या हरामखोरांना सोडता कामा नये, राज्यात 25 हजार महिला गायब झाल्याची धक्कादायक माहिती गृहमंत्र्यांनी दिलेली आहे आणि त्यातील कित्येक जणींसोबत असा प्रकार झाला असेल, याची भीती आता वाटते आहे. त्यामुळेच याची गंभीर दखल घेणं तितकच गरजेचं आहे" असं देखील चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Chitra Waghचित्रा वाघMaharashtraमहाराष्ट्रBJPभाजपाPoliticsराजकारण