शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

“उद्धवजी, तुम्ही राजीनामा दिला तेव्हाच मविआचा पोपट मेला, कायद्याची भाषा समजत नसेल तर...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2023 16:27 IST

Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ट्युशन लावा, असा खोचक सल्ला भाजपकडून देण्यात आला आहे.

Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर आता महाविकास आघाडी तसेच भाजप आणि शिंदे गटाकडून प्रतिक्रिया येत आहेत. याशिवाय न्यायालयाने दिलेल्या निकालावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आता ठाकरे गटाने केलेल्या टीकेवर भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात येत आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे. 

आता खर्‍या अर्थाने लढा सुरू झाल्याचे ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाचा निकालही आला आहे. आपला लढा जनतेसाठी आहे. हा लढा देश आणि राज्यासाठी आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. सर्वोच्च न्यायलायाने लक्तरे टांगल्यानंतर नैतिकतेला धरून शिंदेंनी राजीनामा द्यायला हवा. तुम्हाला जीवदान मिळाले असेल तर ते तात्पुरते आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्यासमोर जो पोपट ठेवला, तो मेलेला आहे, हालचाल नाही, परंतु तो मृत घोषित असल्याचे काम विधानसभा अध्यक्षांना दिले आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. यानंतर आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले. 

उद्धवजी, तुम्ही राजीनामा दिला तेव्हाच मविआचा पोपट मेला

उद्धव जी ज्या दिवशी तुम्ही राजीनामा दिला त्याच दिवशी महाविकास आघाडीचा पोपट मेला. सुप्रीम कोर्टानं पण तेच सांगितलं. तुम्हाला कायद्याची भाषा समजत नसेल तर आमच्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ट्युशन लावा, असा खोचक टोला चित्रा वाघ यांनी लगावला आहे. तसेच ज्यांची पक्ष प्रमुख पदाची नियुक्ती केंद्रीय निवडणूक आयोगानं बेकायदा ठरवली तेच ज्ञान पाजळताहेत की राज्यपाल नियुक्तीवर नियमावली आणावी. उद्धवा, अजब तुझा कारभार !, अशी टीकाही चित्रा वाघ यांनी केली. 

दरम्यान, नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यायला नको होता. महाविकास आघाडीने लगेच नवीन अध्यक्ष बनवायला पाहिजे होते. असे झाले असते तर १६ आमदार अपात्र ठरले असते, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार म्हणाले होते. यावर बोलताना, सरकार पडण्यासाठी भाजप जबाबदार असल्याचा कांगावा करणाऱ्यांनी अजित पवार यांच्या वक्तव्यावर बोलावे. नाना पटोले, उद्धव ठाकरे आता तुमचे कान सोनाराने (अजित पवार) टोचले, असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. 

 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षUddhav Thackerayउद्धव ठाकरेChitra Waghचित्रा वाघ