शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Maharashtra Politics: “तुमचे उरलेले दोन-चार जण वाचवा, नाहीतर शिंदे गट तेही घेऊन पळतील”; बावनकुळेंचा ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2022 16:56 IST

Maharashtra News: अमित शाहांसमोर उद्धव ठाकरे म्हणजे सूर्यासमोर दिवा असून, त्यांचे नाव घेऊन बोलू नये, असा इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.

Maharashtra Politics: गेल्या काही दिवसांपासून अनेकविध मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहे. मात्र, यातच भाजपने पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर खोचक शब्दांत टोला लगावला आहे. तुमचे उरलेले दोन-चार जण वाचवा, टिकवा. अन्यथा एकनाथ शिंदे यांचा गट तेही घेऊन पळतील, असे सांगत भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. 

प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी शिवसेना, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या जनआक्रोश मोर्चावर टीका केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दिलदार नेते आहेत. ते माझे मित्र आहेत. त्यामुळे मला ते भेटले. उद्धव ठाकरेही आमचे मित्र होते. पण ते शरद पवारांच्या नादी लागले. उद्धव ठाकरेंबद्दल एक सांगतो. एक दिवस ते चारच लोक राहतील. माझे कुटुंब, माझी जबाबदारी अशी त्यांची अवस्था होईल. उद्धवजी, तुमचे उरलेले दोन चारजण वाचवा. नाही तर शिंदे साहेब तेही घेऊन पळतील. त्यामुळे टीका करणे सोडा, या शब्दांत चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. 

अमित शाहांसमोर उद्धव ठाकरे म्हणजे सूर्यासमोर दिवा

शिवसेनेला जन आक्रोश मोर्चा काढण्याचा अधिकार नाही. ते इव्हेंट मॅनेजमेट करत आहेत, अशी टीका बावनकुळे यांनी केली आहे. तसेच पंकजा मुंडे पक्षात नाराज नाही, असे सांगत उद्धव ठाकरे घाबरले आहेत. म्हणून मोठी भाषण सुरू आहेत. उद्धव ठाकरे यांनी विचार करून बोलले पाहिजे. अमित शाह आणि उद्धव ठाकरे म्हणजे सूर्यासमोर दिवा आहे. त्यांचे नाव घेऊन बोलू नये, असा इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. 

आम्ही शिंदे गटासोबतच युती करून निवडणूक लढणार आहोत

आम्ही शिंदे गटासोबतच युती करून निवडणूक लढणार आहोत, असे स्पष्ट करत एकनाथ शिंदे यांना पंतप्रधान भेटले की नाहीत यावर तेच उत्तर देतील, असे बावनकुळे यांनी सांगितले. समाजामध्ये विश्वास निर्माण करणे हे आमचे काम आहे. आम्ही विश्वास निर्माण करण्यासाठी हे करतोय. मुस्लिम समाज आमच्या सोबत आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी नमूद केले.

 

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेAurangabadऔरंगाबाद