शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

“आम्ही ९० जागा लढवणार”; अजित पवारांच्या निर्धारावर चंद्रशेखर बावनकुळेंची सूचक प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2023 14:12 IST

Maharashtra Political Crisis: अजितदादांनी घेतलेली भूमिका महाराष्ट्र, देश हिताची आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.

Maharashtra Political Crisis: उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांनी मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. अजित पवार यांच्यासोबत ३२ आमदार असल्याचे सांगितले जात आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी केलेल्या संबोधनात राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत ९० जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस लढणार असून, काही झाले तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची संख्या ७१ च्या वर न्यायचीच आहे, असा निर्धार अजित पवारांनी बोलून दाखवला. यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत असून, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर भाष्य केले आहे. 

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, शरद पवार हे सर्वांसाठी आदरणीय आहेत. अजित पवार यांनी शरद पवार यांच्याबद्दल सर्व आलेख मांडला. वेळोवेळी वेगवेगळी भूमिका घेतल्यामुळे पक्ष अडचणीत आला. विश्वासहर्ता कमी झाली. परिवारातही खोटे बोलावे लागले. कुटुंबही राजकारणापासून सुटले नाही. अजितदादांनी घेतलेली भूमिका महाराष्ट्र, देश हिताची आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले. 

जागांबद्दल काय बोलणे झाले? काय नाही? हे माझ्या अधिकार क्षेत्रात येत नाही

छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि सुनील तटकरे यांनी त्यांना का पक्ष सोडावा लागला? ते का बाहेर पडले? हे सगळे मांडले. अजितदादांनी सत्य परिस्थिती मांडली. मी पवार कुटुंबाचा भाग आहे, खोटे बोलत नाही, असे अजितदादा म्हणाले. आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे, असे सांगताना जागांबद्दल काय बोलण झाले? काय नाही? हे माझ्या अधिकार क्षेत्रात येत नाही. परंतु निवडणूका लागत नाही, तोपर्यंत जागा वाटपाचा निर्णय होत नाही. आम्ही म्हटले इतक्या जागा लढू, एकनाथ शिंदे म्हणाले, इतक्या जागांवर लढू पण खरे चित्र हे निवडणुका लागल्यानंतरच स्पष्ट होते. त्यामुळे राष्ट्रवादी ९० जागा लढवणार हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचे नाही, असे बावनकुळे म्हणाले. 

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची बैठक आधीच ठरली होती. त्यामुळे ते नागपूरवरुन गेले. त्यांनी राष्ट्रपतींचे स्वागत केले. मुख्यमंत्र्यांसमोर अनेक विषय असतात. आमच्यात कुठलीही धुसफूस नाही. तीन भाऊ असल्यामुळे कमी-जास्त होऊ शकते. पण मनभेद, मतभेद आमच्यात नाहीत. हे मजबूत सरकार आहे. बहुमताच सरकार असून ते टिकेल, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी नमूद केले.

 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेAjit Pawarअजित पवारChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे