शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

“आम्ही ९० जागा लढवणार”; अजित पवारांच्या निर्धारावर चंद्रशेखर बावनकुळेंची सूचक प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2023 14:12 IST

Maharashtra Political Crisis: अजितदादांनी घेतलेली भूमिका महाराष्ट्र, देश हिताची आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.

Maharashtra Political Crisis: उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांनी मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. अजित पवार यांच्यासोबत ३२ आमदार असल्याचे सांगितले जात आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी केलेल्या संबोधनात राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत ९० जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस लढणार असून, काही झाले तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची संख्या ७१ च्या वर न्यायचीच आहे, असा निर्धार अजित पवारांनी बोलून दाखवला. यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत असून, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर भाष्य केले आहे. 

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, शरद पवार हे सर्वांसाठी आदरणीय आहेत. अजित पवार यांनी शरद पवार यांच्याबद्दल सर्व आलेख मांडला. वेळोवेळी वेगवेगळी भूमिका घेतल्यामुळे पक्ष अडचणीत आला. विश्वासहर्ता कमी झाली. परिवारातही खोटे बोलावे लागले. कुटुंबही राजकारणापासून सुटले नाही. अजितदादांनी घेतलेली भूमिका महाराष्ट्र, देश हिताची आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले. 

जागांबद्दल काय बोलणे झाले? काय नाही? हे माझ्या अधिकार क्षेत्रात येत नाही

छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि सुनील तटकरे यांनी त्यांना का पक्ष सोडावा लागला? ते का बाहेर पडले? हे सगळे मांडले. अजितदादांनी सत्य परिस्थिती मांडली. मी पवार कुटुंबाचा भाग आहे, खोटे बोलत नाही, असे अजितदादा म्हणाले. आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे, असे सांगताना जागांबद्दल काय बोलण झाले? काय नाही? हे माझ्या अधिकार क्षेत्रात येत नाही. परंतु निवडणूका लागत नाही, तोपर्यंत जागा वाटपाचा निर्णय होत नाही. आम्ही म्हटले इतक्या जागा लढू, एकनाथ शिंदे म्हणाले, इतक्या जागांवर लढू पण खरे चित्र हे निवडणुका लागल्यानंतरच स्पष्ट होते. त्यामुळे राष्ट्रवादी ९० जागा लढवणार हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचे नाही, असे बावनकुळे म्हणाले. 

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची बैठक आधीच ठरली होती. त्यामुळे ते नागपूरवरुन गेले. त्यांनी राष्ट्रपतींचे स्वागत केले. मुख्यमंत्र्यांसमोर अनेक विषय असतात. आमच्यात कुठलीही धुसफूस नाही. तीन भाऊ असल्यामुळे कमी-जास्त होऊ शकते. पण मनभेद, मतभेद आमच्यात नाहीत. हे मजबूत सरकार आहे. बहुमताच सरकार असून ते टिकेल, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी नमूद केले.

 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेAjit Pawarअजित पवारChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे