शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

काँग्रेसची राष्ट्रपती राजवटीची मागणी; बावनकुळे म्हणाले, “पुढे सत्ता येणार नाही म्हणून...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 18:03 IST

Chandrashekhar Bawankule: काँग्रेस आमदार भाजपात येण्याची भीती वाटत असल्याने अशी विधाने केली जात आहेत, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.

Chandrashekhar Bawankule: महाराष्ट्रात भाजपने दोन मोठ्या विरोधी पक्षांना सोबत घेत सरकार स्थापन केले आहे. शिवसेनेनंतर राष्ट्रवादीच्या अजित पवारांसह ३० हून अधिक आमदार भाजपसोबत सरकारमध्ये आहेत. महाराष्ट्र भाजपची बैठक बोलावण्यात आली होती.  यामध्ये आगामी निवडणुकीवर चर्चा करण्यात आली. यावेळी राज्यात महायुतीच्या २२० जागा निवडून येतील. महाविजय २०२४ चा आम्ही संकल्प केला आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. 

महाराष्ट्रात भाजपची घोडदौड प्रचंड ताकदीने सुरु राहणार आहे. पार्लियामेंट ते पंचायतपर्यंत आम्ही काम करीत असून येणाऱ्या सर्व निवडणुकीत भाजप क्रमांक एकवर राहील आणि महाराष्ट्राच्या इतिहासात आतापर्यंत जो आम्ही नंबर गाठला नाही तो नंबर आमची महायुती गाठेल, असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. काँग्रेसने महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी. राज्यपाल, राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली.

सत्ता गेली आहे व पुढे सत्ता येणार नाही

काँग्रेस पक्षात मोठ्या प्रमाणात अस्वस्था निर्माण झाली आहे. सत्ता गेली आहे व पुढे सत्ता येणार नाही. यामुळे नाना पटोले आपल्या संघटनेला व आमदारांना धौर्य देण्यासाठी राष्ट्रपती  राजवट लागणार असल्याचे वक्तव्य करीत आहेत. काँग्रेस आमदार भाजपात येतील, अशी भीतीही त्यांना वाटत असल्याचा टोला बावनकुळे यांनी लगावला.

दरम्यान, आम्ही महाराष्ट्राचे गणित आखले आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,  उपमुख्यमंत्री अजित पवार भाजपसोबत आले आहेत. आम्ही सर्व जण मिळूण आमचे टार्गेट पूर्ण करणार आहोत. एकूण २८८ विधानसभापैकी महायुतीमध्ये आम्हाला ज्या जागा मिळतील, त्यापैकी ८० टक्के जागांवर आमचा विजय होईल. म्हणजे १५२ जागांवर आम्ही विजयी होऊ. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महायुती २०० हून अधिक जागांवर विजयी होईल. जागावाटपावरून एनडीएमध्ये वाद होणार नाही, असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. 

 

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेNana Patoleनाना पटोलेNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे