शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

दिपाली सय्यद यांचा पक्षप्रवेश रखडला; भाजपाचा विरोध कारणीभूत ठरला?; चंद्रकांत पाटील म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2022 21:29 IST

मविआ सरकार काळात सय्यद यांनी भाजपा महिला आघाडीच्या नेत्यांविरोधात खोटी तक्रार दिली होती.

मुंबई - उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर सय्यद यांनी थेट रश्मी ठाकरे, संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली. त्यामुळे दिपाली सय्यद या शिंदेंच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश करतील हे निश्चित झाले होते. मी एकनाथ शिंदे यांच्यामुळेच शिवसेनेत आले होते असं सय्यद यांनी म्हटलं होतं. परंतु दिपाली सय्यद यांचा बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात पक्षप्रवेश रखडला आहे. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. 

यावर भाजपा नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, शिवसेनेनं काय करावं यावर भाजपानं जास्तीत जास्त मत व्यक्त करावं. विरोध करण्याचं कारण नाही. पण इतक्या वेगाने घटना घडतायेत. त्यामुळे मी इतका अलर्ट नाही. दिपाली सय्यद का येतायेत कुणाच्या आग्रहाने येतायेत. कुणाचा विरोध आहे हे सर्व बघितल्यावर मी यावर बोलेन असं सांगत त्यांनी सय्यद यांच्या पक्षप्रवेशावर भाष्य केले आहे.  

दिपाली सय्यद पक्षप्रवेश रखडला

दिपाली सय्यद या आज ठाण्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात पक्षप्रवेश करणार होत्या. परंतु ऐनवेळी हा पक्षप्रवेश रद्द झाल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपा महिला आघाडीच्या नेत्यांनी दिपाली सय्यद यांच्या शिंदे गटातील पक्षप्रवेशावर विरोध करत आधी माफी मागावी अशी मागणी लावून धरली आहे. त्यात प्रदेश महिला जनरल सेक्रेटरी दिपाली मोकाशी, ठाण्यातील माजी नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी दिपाली सय्यद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील टीकेबाबत नाराजी व्यक्त केली. 

याबाबत दिपाली मोकाशी म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दिपाली सय्यद यांनी खालच्या शब्दात टीका केली होती. त्याचसोबत मविआ सरकार काळात सय्यद यांनी भाजपा महिला आघाडीच्या नेत्यांविरोधात खोटी तक्रार दिली होती. आमचा सय्यद यांच्या पक्षप्रवेशाला विरोध नाही. त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली असेल तर त्यांनी भाजपा नेत्यांची माफी मागावी आणि महिला आघाडीच्या नेत्यांविरोधातील खोटी तक्रार मागे घ्यावी असं त्यांनी सांगितले. सुषमा अंधारे यांनी लगावला टोला सत्तास्थानी प्रवेश करणे सोप्पे असते. कारण तिकडे करिअर फार लवकर होते. कदाचित आज ठाकरे यांच्या शिवसेनेचा संक्रमण काळ आहे. आम्ही सगळ्यांनी लढायचं ठरवलं आहे. त्यामुळे जे जातात त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. आम्ही आमच्या म्हणण्यावर ठाम आहोत असं सांगत सुषमा अंधारे यांनी दिपाली सय्यद यांना टोला लगावला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :deepali sayedदीपाली सय्यदchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदे