शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

“उद्धव ठाकरे, संभाजीराजेंनी दिलेले आव्हान स्वीकारा, कुणी खंजीर खुपसला ते जनतेला समजेल”

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 16:35 IST

संभाजीराजेही खोटे बोलताहेत? त्यांचा फोनही न घेणे कुठल्या सभ्यतेत बसते, अशी विचारणा चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

मुंबई: राज्यसभेच्या (Rajya Sabha Election 2022) निवडणुकीत वेगळाच ट्विस्ट पाहायला मिळत आहे. संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यावर ठाम असल्यामुळे शिवसेनेत प्रवेश केला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द मोडला. घोडेबाजार होऊ नये म्हणून निवडणूक लढवणार नाही. ही माघार नसून, स्वाभिमान आहे, असे सांगत संभाजीराजे छत्रपती यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यानंतर आता भाजपने शिवसेनेवर टीका केली असून, मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी संभाजीराजे छत्रपती यांनी दिलेले आव्हान स्वीकारावे. कुणी खंजीर खुपसला हे जनतेला समजेल, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी म्हटले आहे. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचा मान ठेवायचा नाही, तर पक्षाच्या नावात 'शिव' वापरायचा नैतिक अधिकारही नाही, एखादे तथाकथित सेक्युलर नाव शोधा, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला. राज्यसभा उमेदवारीबाबत उद्धव ठाकरेंनी शब्द मोडला. शिवसेनेत प्रवेशाचा प्रस्ताव स्वीकारता येणार नाही, हे स्पष्ट केल्याचे संभाजीराजे सांगताहेत. शब्द मोडल्याचा आरोप ठेवून करून युती तोडणारे उद्धवजी आता काय बोलाल? संभाजीराजेही खोटे बोलताहेत? त्यांचा फोनही न घेणे कुठल्या सभ्यतेत बसते, अशी विचारणा चंद्रकांत पाटील यांनी केली. 

मनसेनेही साधला शिवसेनेवर निशाणा

मनसे नेते गजानन काळे यांनी ट्विट करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. छत्रपतींच्या वंशजाला दुःखी आणि व्यथित होऊन बोलताना पाहणे वेदनादायक होते. उठता बसता महाराजांचे नाव घेणाऱ्या मात्र वागण्यात खोटारडापणा करणाऱ्यांना आता पक्षाच्या नावात "शिव" वापरायची लायकी नाही असेच म्हणावे लागेल. आदरणीय बाळासाहेब जिथून कुठून पाहत असतील त्यांनाही अश्रू आवरले नसावेत, अशी घणाघाती टीका गजानन काळे यांनी केले आहे. 

दरम्यान, शिवसेनेत प्रवेश करा तुम्हाला खासदार करू असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. परंतु, मी प्रवेश करणार नाही स्पष्ट सांगितले. माझी उमेदवारी ही घोडेबाजारासाठी नव्हती. सगळ्या पक्षातील लोकांनी मला मदत करावी. निष्कलंक माझे व्यक्तिमत्व आहे. मला कुठल्याही पक्षाचा द्वेष नाही. मला सगळी गणिती माहिती होती. पुढचा प्रवास खडतर होता याची जाणीव होती. मला शिवसेना खासदारांचे फोन आले. सगळ्या अपक्ष आमदारांवर दबाव होता. मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द मोडला, असा गौप्यस्फोट संभाजीराजे यांनी केला.  

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती