शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
5
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
6
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
7
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
8
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
9
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
10
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
11
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
12
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
13
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
14
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
15
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
16
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
17
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
18
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
19
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
20
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र

“ठाकरे सरकार पडणारच, हे इयत्ता आठवीतील मुलगाही सांगू शकेल”

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2021 16:55 IST

Pandharpur Bypoll: भाजपने पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

ठळक मुद्देसरकारकडे काहीच नियोजन नाही - भाजपरेमडेसिवीर इंजेक्शनसाठी वणवण भटकावे लागत आहे - भाजपठाकरे सरकार लवकरच पडेल - चंद्रकांत पाटील

पंढरपूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे निधन झाल्यामुळे पंढरपूर-मंगळवेढा (Pandharpur Bypoll) पोटनिवडणूक होत आहे. एकीकडे कोरोनाची परिस्थिती गंभीर होत असताना, दुसरीकडे पंढरपूरमध्ये निवडणूक प्रचाराला वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पोटनिवडणुकीनंतर पंढरपूरमध्ये निर्बंध लावण्याविषयी सांगितले. या पार्श्वभूमीवर भाजपने पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर टीका केली असून, महाविकास आघाडी सरकार पडेल, हे तर आता आठवीतील मुलगाही सांगू शकेल, असा टोला भाजपकडून लगावण्यात आला आहे. (chandrakant patil claims that maha vikas aghadi thackeray govt will collapse soon)

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपसाठी प्रतिष्ठेची झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) आणि भाजपकडून समाधान आवताडे (Samadhan Autade) यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकार पडणार असल्याचा दावा केल्यानंतर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही ठाकरे सरकार पडणार असल्याचे भाकीत केले आहे. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजपचे उमदेवार समाधान आवताडे यांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी चंद्रकांत पाटील पंढरपुरात आले होते.

“पंतप्रधान मोदी प्रचारात मस्त आणि देशातील जनता कोरोनाने त्रस्त”

सरकारकडे काहीच नियोजन नाही

राज्यात कोरोनाचा फैलाव वाढत चालला आहे. ठाकरे सरकारकडे काहीच नियोजन नाही, प्लानिंग नाही. सरकारमध्ये इच्छा शक्ती कमी आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेतला जात नाही. इयत्ता आठवीतील मुलगाही राजकीय विश्लेषण करू शकेल. हे सरकार लवकरच पडले. विरोधी पक्ष म्हणून आम्ही आमची भूमिका योग्य पद्धतीने बजावत आहोत, असे पाटील यांनी सांगितले.

रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी वणवण भटकावे लागत आहे

दहावी आणि बारावीची परीक्षा रद्द होऊ शकत नाही. विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत सरकारने गंभीरपणे विचार केलेला दिसत नाही. ऑक्सिजन नसल्यामुळे डॉक्टरांवर रडण्याची वेळ आली आहे. सरकारने आरोग्य यंत्रणेचे काहीच नियोजन दिसत नाही. आमदारांच्या विकास निधीतले चार कोटी काढून दोन कोटी रुपये सरकारला द्यायला हवे होते. तेही केले नाही. रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी वणवण भटकावे लागत आहे, असा निशाणा पाटील यांनी साधला. 

भाजपशासित राज्यांमध्येही कोरोनाचे संकट भीषण; पवारांनी विरोधकांना चांगलंच सुनावलं

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १४ एप्रिल रात्री ८ वाजेपासून पुढचे १५ दिवस राज्यात लॉकडाऊनचे निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये पूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली असून फक्त जीवनावश्यक वस्तू आणि सेवांशी संबंधित व्यक्तींना प्रवासाची आणि उद्योगांना सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच, विविध समाजघटकांसाठी अर्थसहाय्य करण्याचीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. 

टॅग्स :PandharpurपंढरपूरPoliticsराजकारणBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेनाchandrakant patilचंद्रकांत पाटील