शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

म्हणून भाजपाने केली आपल्या तीन प्रवक्त्यांची बोलती बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2018 18:56 IST

केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपाला विविध कारणांमुळे टीकेचे लक्ष्य व्हावे लागत आहेत. दरम्यान, काही वादांच्या पार्श्वभूमीवर भाजपाने आपल्याच तीन प्रवक्त्यांची बोलती बंद केली आहे.

मुंबई - केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपाला विविध कारणांमुळे टीकेचे लक्ष्य व्हावे लागत आहेत. काही प्रकरणांमध्ये तर  स्वपक्षीय नेत्यांच्याच बेतालपणामुळे पक्षाच्या अडचणी वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपाने राज्यातील आपल्या तीन प्रमुख प्रवक्त्यांच्या बोलण्यावर बंदी घातली आहे. दहीहंडीदरम्यान, मुलींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारे आमदार राम कदम, बलात्काराचा आरोप झालेले ज्येष्ठ नेते मधू चव्हाण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचा अकरावा अवतार असल्याचा साक्षात्कार झालेले अवघूत वाघ यांच्यावर प्रसारमाध्यमांसमोर जाऊन बोलण्यास पक्षाकडून मनाई करण्यात आली आहे.दहीहंडी उत्सवादरम्यान, भाजपाचे प्रवक्ते आमदार राम कदम यांनी तुम्हाला आवडलेली मुलगी पळवून आणण्यास मी मदत करेन, असे वक्तव्य केले होते. त्यावरून राज्याच्या राजकारणात वादळ उठले होते. तसेच भाजपावर नामुष्की ओढवली होती. त्यामुळे राम कदम यांना प्रसारमाध्यमांसमोर बोलण्यास पक्षाकडून मनाई करण्यात आली आहे. भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक असलेले मधू चव्हाण हे महिलेने केलेल्या बलात्काराच्या आरोपामुळे अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे त्यांनाही प्रसारमाध्यमामध्ये जाऊन पक्षाची भूमिका मांडू नये, अशी सूचना देण्यात आली आहे. तर काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भगवान विष्णूचा 11वा अवतार असल्याचा दावा करून भाजपा प्रवक्ते अवधूत वाघ यांनी वादाला तोंड फोडले होते. त्यामुळे त्यांनाही सध्या प्रसारसमाध्यमांसमोर काही बोलू नका, असे बजावण्यात आले आहे.  

टॅग्स :BJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारणRam Kadamराम कदम