शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
3
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
4
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
5
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
6
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
8
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
9
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
10
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
11
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
12
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
13
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
14
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
15
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
16
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
17
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
18
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
19
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
20
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

म्हणून भाजपाने केली आपल्या तीन प्रवक्त्यांची बोलती बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2018 18:56 IST

केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपाला विविध कारणांमुळे टीकेचे लक्ष्य व्हावे लागत आहेत. दरम्यान, काही वादांच्या पार्श्वभूमीवर भाजपाने आपल्याच तीन प्रवक्त्यांची बोलती बंद केली आहे.

मुंबई - केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपाला विविध कारणांमुळे टीकेचे लक्ष्य व्हावे लागत आहेत. काही प्रकरणांमध्ये तर  स्वपक्षीय नेत्यांच्याच बेतालपणामुळे पक्षाच्या अडचणी वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपाने राज्यातील आपल्या तीन प्रमुख प्रवक्त्यांच्या बोलण्यावर बंदी घातली आहे. दहीहंडीदरम्यान, मुलींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारे आमदार राम कदम, बलात्काराचा आरोप झालेले ज्येष्ठ नेते मधू चव्हाण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचा अकरावा अवतार असल्याचा साक्षात्कार झालेले अवघूत वाघ यांच्यावर प्रसारमाध्यमांसमोर जाऊन बोलण्यास पक्षाकडून मनाई करण्यात आली आहे.दहीहंडी उत्सवादरम्यान, भाजपाचे प्रवक्ते आमदार राम कदम यांनी तुम्हाला आवडलेली मुलगी पळवून आणण्यास मी मदत करेन, असे वक्तव्य केले होते. त्यावरून राज्याच्या राजकारणात वादळ उठले होते. तसेच भाजपावर नामुष्की ओढवली होती. त्यामुळे राम कदम यांना प्रसारमाध्यमांसमोर बोलण्यास पक्षाकडून मनाई करण्यात आली आहे. भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक असलेले मधू चव्हाण हे महिलेने केलेल्या बलात्काराच्या आरोपामुळे अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे त्यांनाही प्रसारमाध्यमामध्ये जाऊन पक्षाची भूमिका मांडू नये, अशी सूचना देण्यात आली आहे. तर काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भगवान विष्णूचा 11वा अवतार असल्याचा दावा करून भाजपा प्रवक्ते अवधूत वाघ यांनी वादाला तोंड फोडले होते. त्यामुळे त्यांनाही सध्या प्रसारसमाध्यमांसमोर काही बोलू नका, असे बजावण्यात आले आहे.  

टॅग्स :BJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारणRam Kadamराम कदम