शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

म्हणून भाजपाने केली आपल्या तीन प्रवक्त्यांची बोलती बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2018 18:56 IST

केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपाला विविध कारणांमुळे टीकेचे लक्ष्य व्हावे लागत आहेत. दरम्यान, काही वादांच्या पार्श्वभूमीवर भाजपाने आपल्याच तीन प्रवक्त्यांची बोलती बंद केली आहे.

मुंबई - केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपाला विविध कारणांमुळे टीकेचे लक्ष्य व्हावे लागत आहेत. काही प्रकरणांमध्ये तर  स्वपक्षीय नेत्यांच्याच बेतालपणामुळे पक्षाच्या अडचणी वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपाने राज्यातील आपल्या तीन प्रमुख प्रवक्त्यांच्या बोलण्यावर बंदी घातली आहे. दहीहंडीदरम्यान, मुलींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारे आमदार राम कदम, बलात्काराचा आरोप झालेले ज्येष्ठ नेते मधू चव्हाण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचा अकरावा अवतार असल्याचा साक्षात्कार झालेले अवघूत वाघ यांच्यावर प्रसारमाध्यमांसमोर जाऊन बोलण्यास पक्षाकडून मनाई करण्यात आली आहे.दहीहंडी उत्सवादरम्यान, भाजपाचे प्रवक्ते आमदार राम कदम यांनी तुम्हाला आवडलेली मुलगी पळवून आणण्यास मी मदत करेन, असे वक्तव्य केले होते. त्यावरून राज्याच्या राजकारणात वादळ उठले होते. तसेच भाजपावर नामुष्की ओढवली होती. त्यामुळे राम कदम यांना प्रसारमाध्यमांसमोर बोलण्यास पक्षाकडून मनाई करण्यात आली आहे. भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक असलेले मधू चव्हाण हे महिलेने केलेल्या बलात्काराच्या आरोपामुळे अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे त्यांनाही प्रसारमाध्यमामध्ये जाऊन पक्षाची भूमिका मांडू नये, अशी सूचना देण्यात आली आहे. तर काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भगवान विष्णूचा 11वा अवतार असल्याचा दावा करून भाजपा प्रवक्ते अवधूत वाघ यांनी वादाला तोंड फोडले होते. त्यामुळे त्यांनाही सध्या प्रसारसमाध्यमांसमोर काही बोलू नका, असे बजावण्यात आले आहे.  

टॅग्स :BJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारणRam Kadamराम कदम