शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

Atul Bhatkhalkar : "नाल्यातले पैसे खाल्ले, कचऱ्यातले खाल्ले, मुंबईला तुंबवून दाखवलं"; भाजपाची शिवसेनेवर बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 11:30 IST

BJP Atul Bhatkhalkar Slams Shivsena : भाजपाचे नेते अतुल भातखळकर (BJP Atul Bhatkhalkar) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे.

मुंबई - मुंबईमध्ये सकाळपासून पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचल्याचे चित्र आहे. त्याचा रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. त्याशिवाय मुंबईची लाईफलाईन मानल्या जाणाऱ्या लोकल सेवेलाही पावसाचा फटका बसला आहे. लोकल सेवा उद्याप सुरू आहे ही प्रवाशांसाठी दिलासा देणारी बाब आहे. मात्र मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक पाच-१० मिनिटे उशिराने सुरू आहे तर पश्चिम रेल्वे मार्गावरील ट्रेन्स १० मिनिटाच्या विलंबाने धावत आहेत. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातच पावसाने जोरदार हजेरी लावली असल्याने सर्वच नागरिकांना आपल्या कामासाठी घरातून बाहेर निघताना पावसाचा अंदाज घेऊन बाहेर पडा, असा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. 

मुंबई आणि महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन विभाग या पावसाळी परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. याच दरम्यान भाजपाने शिवसेनेवर सडकून टीका केली आहे. "नाल्यातले पैसे खाल्ले, कचऱ्यातले खाल्ले , मुंबईला तुंबवून दाखवलं" असं म्हणत जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपाचे नेते अतुल भातखळकर (BJP Atul Bhatkhalkar) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "नाल्यातले पैसे खाल्ले, कचऱ्यातले खाल्ले, मुंबईला तुंबवून दाखवलं... आता शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेतून देखील तोंड काळे करण्याची तयारी ठेवावी..." असं भातखळकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

अतुल भातखळकर यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. "नवे शिवसेना भाजप सरकार जनतेच्या सेवेत रुजू झाले. टोमणे, फेसबुक लाईव्ह, तोंडाच्या वाफा हा सगळा महाराष्ट्राचा अडीच वर्षांचा दुर्दैवी भूतकाळ होता. आता हे आपले सरकार. गोरगरीब दुबळ्या जनतेचे सरकार" असं म्हटलं आहे. पावसामुळे सखल भागात पाणी साचायला सुरूवात झाली आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये तुफान पाऊस पडत आहे. त्यामुळे पावसाचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडा, अशा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. वडाळा, अंधेरी सबवे, सायन गांधी मार्केट, दादर हिंदमाता यासह अनेक ठिकाणी पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत गरज असल्यासच घराबाहेर पडा असा सल्लादेखील मुंबई आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाकडून देण्यात आला आहे.

मुंबई आणि कोकणासोबतच कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. जून महिन्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाळा. पण जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून कोल्हापूरसह आसपासच्या परिसरात पावसाचा जोर चांगलाच दिसून येत आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. NDRF च्या टीम रत्नागिरी, रायगडमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पुढील चार ते पाच दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रादेशिक हवामान विभागाने याबाबत अंदाज वर्तवला आहे. 

टॅग्स :Mumbai Rain Updateमुंबई मान्सून अपडेटBJPभाजपाShiv SenaशिवसेनाRainपाऊसAtul Bhatkalkarअतुल भातखळकर