शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
2
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
3
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
4
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
5
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
6
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
7
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
8
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
9
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
10
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
11
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
12
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
13
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
14
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
15
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
16
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
17
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
18
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
19
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
20
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक

पाणी प्रश्नावर वाद पेटला; शिवसेना खासदाराविरोधात भाजपची पोलिस उपायुक्तांकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 20:35 IST

पाणी प्रश्नावर डोंबिवलीतील भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात थेट पोलिस उपायुक्तांकडे तक्रार दिली आहे.

कल्याण: घनकचरा व्यवस्थापन करावर शिवसेना भाजपमध्ये वाद पेटला असताना आत्ता पाणी प्रश्नावर डोंबिवलीतील भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात थेट पोलिस उपायुक्तांकडे तक्रार दिली आहे. पाणी प्रश्नावर डोंबिवलीच्या भोपर गावात काही अनुचित प्रकार घडल्यास त्यासाठी खासदार शिंदे जबाबदार राहतील. त्यांच्या विरोधातही कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आमदार चव्हाण यांनी केली आहे. आत्ता शिवसेना भाजपमधील वाद पोलिस ठाण्यात पोहचल्याने हा वाद चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जाते.

कल्याण डोंबिवली महापालिकेने घनकचरा व्यवस्थापन कर लागू केल्यावर त्याला भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी तीव्र विरोध केला. या प्रकरणी आमदार चव्हाण यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार श्रीकांत शिंदे यांना लक्ष्य करुन आयुक्तांच्या विरोधातही टिकेची झोड उठविली. तसेच शहरात बॅनर लावून शिवसेनेचा थुकरटपणा असे त्यावर लिहीले होते. चव्हाण यांच्या टिकेला उत्तर देण्यासाठी शिवसेना नगरसेवक दीपेश म्हात्रे पुढे आले. त्यांनी भाजपवर टिका केली होती. हे प्रकरण ताजे असताना आमदार चव्हाण यांनी आज पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांची भेट घेतली. या दरम्यान भाजप नगरसेविका रविना माळी या देखील होती. रविना माळी यांच्या लेटरहेटवर त्यांनी निवेदन दिले आहे. २७ गावात अमृत योजने अंतर्गत पाणी पुरवठा मंजूर करण्यात आली आहे. ही योजना भाजप सरकारने मंजूर केली आहे. या योजनेच्या कामात खासदार शिंदे यांचा हस्तक्षेप असतो. तसेच भाजप कार्यकत्र्यावर गुन्हे दाखल केले जात आहे. या सगळ्य़ाला खासदार शिंदे जबाबदार आहे. आमच्या पक्षाच्या कार्यकत्र्यावर गुन्हे दाखल झाले तर शिवसैनिकांसह खासदारांच्या विरोधातही गुन्हा दाखल झाला पाहिजे. यापुढे भोपर गावात पाण्याच्या मुद्यावर काही वाद झाल्यास त्याला खासदार जबाबदार असतील असे म्हटले आहे. त्यांच्या विरोधातही कारवाई केली जावी.

दरम्यान शिवसेनेचे विधानसभा संघटक एकनाथ पाटील यांनी सांगितले की, पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा कार्यादेश मिळालेला नसताना भाजपने भूमीपूजन कसे काय केले. आमच्या लोकप्रतिनिधींनी ही योजना मंजूर करुन आणली आहे. त्यामुळे भूमीपूजन करणो हा आमचा हक्कच आहे. रविना माळी यांचा नगरसेविका पदाचा कार्यकाळ संपला आहे. तरी देखील त्यांचे लेटर हेट वापरून त्याच गैरवापर करीत आमच्याखासदारांना नाहक बदनाम केल्या प्रकरणी कोकण विभागीय आयुक्तांकडे तक्रार करणार आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रkalyanकल्याणkdmcकल्याण डोंबिवली महापालिकाWaterपाणीShiv SenaशिवसेनाBJPभाजपा