शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

पाणी प्रश्नावर वाद पेटला; शिवसेना खासदाराविरोधात भाजपची पोलिस उपायुक्तांकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 20:35 IST

पाणी प्रश्नावर डोंबिवलीतील भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात थेट पोलिस उपायुक्तांकडे तक्रार दिली आहे.

कल्याण: घनकचरा व्यवस्थापन करावर शिवसेना भाजपमध्ये वाद पेटला असताना आत्ता पाणी प्रश्नावर डोंबिवलीतील भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात थेट पोलिस उपायुक्तांकडे तक्रार दिली आहे. पाणी प्रश्नावर डोंबिवलीच्या भोपर गावात काही अनुचित प्रकार घडल्यास त्यासाठी खासदार शिंदे जबाबदार राहतील. त्यांच्या विरोधातही कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आमदार चव्हाण यांनी केली आहे. आत्ता शिवसेना भाजपमधील वाद पोलिस ठाण्यात पोहचल्याने हा वाद चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जाते.

कल्याण डोंबिवली महापालिकेने घनकचरा व्यवस्थापन कर लागू केल्यावर त्याला भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी तीव्र विरोध केला. या प्रकरणी आमदार चव्हाण यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार श्रीकांत शिंदे यांना लक्ष्य करुन आयुक्तांच्या विरोधातही टिकेची झोड उठविली. तसेच शहरात बॅनर लावून शिवसेनेचा थुकरटपणा असे त्यावर लिहीले होते. चव्हाण यांच्या टिकेला उत्तर देण्यासाठी शिवसेना नगरसेवक दीपेश म्हात्रे पुढे आले. त्यांनी भाजपवर टिका केली होती. हे प्रकरण ताजे असताना आमदार चव्हाण यांनी आज पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांची भेट घेतली. या दरम्यान भाजप नगरसेविका रविना माळी या देखील होती. रविना माळी यांच्या लेटरहेटवर त्यांनी निवेदन दिले आहे. २७ गावात अमृत योजने अंतर्गत पाणी पुरवठा मंजूर करण्यात आली आहे. ही योजना भाजप सरकारने मंजूर केली आहे. या योजनेच्या कामात खासदार शिंदे यांचा हस्तक्षेप असतो. तसेच भाजप कार्यकत्र्यावर गुन्हे दाखल केले जात आहे. या सगळ्य़ाला खासदार शिंदे जबाबदार आहे. आमच्या पक्षाच्या कार्यकत्र्यावर गुन्हे दाखल झाले तर शिवसैनिकांसह खासदारांच्या विरोधातही गुन्हा दाखल झाला पाहिजे. यापुढे भोपर गावात पाण्याच्या मुद्यावर काही वाद झाल्यास त्याला खासदार जबाबदार असतील असे म्हटले आहे. त्यांच्या विरोधातही कारवाई केली जावी.

दरम्यान शिवसेनेचे विधानसभा संघटक एकनाथ पाटील यांनी सांगितले की, पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा कार्यादेश मिळालेला नसताना भाजपने भूमीपूजन कसे काय केले. आमच्या लोकप्रतिनिधींनी ही योजना मंजूर करुन आणली आहे. त्यामुळे भूमीपूजन करणो हा आमचा हक्कच आहे. रविना माळी यांचा नगरसेविका पदाचा कार्यकाळ संपला आहे. तरी देखील त्यांचे लेटर हेट वापरून त्याच गैरवापर करीत आमच्याखासदारांना नाहक बदनाम केल्या प्रकरणी कोकण विभागीय आयुक्तांकडे तक्रार करणार आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रkalyanकल्याणkdmcकल्याण डोंबिवली महापालिकाWaterपाणीShiv SenaशिवसेनाBJPभाजपा