शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

पाणी प्रश्नावर वाद पेटला; शिवसेना खासदाराविरोधात भाजपची पोलिस उपायुक्तांकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 20:35 IST

पाणी प्रश्नावर डोंबिवलीतील भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात थेट पोलिस उपायुक्तांकडे तक्रार दिली आहे.

कल्याण: घनकचरा व्यवस्थापन करावर शिवसेना भाजपमध्ये वाद पेटला असताना आत्ता पाणी प्रश्नावर डोंबिवलीतील भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात थेट पोलिस उपायुक्तांकडे तक्रार दिली आहे. पाणी प्रश्नावर डोंबिवलीच्या भोपर गावात काही अनुचित प्रकार घडल्यास त्यासाठी खासदार शिंदे जबाबदार राहतील. त्यांच्या विरोधातही कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आमदार चव्हाण यांनी केली आहे. आत्ता शिवसेना भाजपमधील वाद पोलिस ठाण्यात पोहचल्याने हा वाद चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जाते.

कल्याण डोंबिवली महापालिकेने घनकचरा व्यवस्थापन कर लागू केल्यावर त्याला भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी तीव्र विरोध केला. या प्रकरणी आमदार चव्हाण यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार श्रीकांत शिंदे यांना लक्ष्य करुन आयुक्तांच्या विरोधातही टिकेची झोड उठविली. तसेच शहरात बॅनर लावून शिवसेनेचा थुकरटपणा असे त्यावर लिहीले होते. चव्हाण यांच्या टिकेला उत्तर देण्यासाठी शिवसेना नगरसेवक दीपेश म्हात्रे पुढे आले. त्यांनी भाजपवर टिका केली होती. हे प्रकरण ताजे असताना आमदार चव्हाण यांनी आज पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांची भेट घेतली. या दरम्यान भाजप नगरसेविका रविना माळी या देखील होती. रविना माळी यांच्या लेटरहेटवर त्यांनी निवेदन दिले आहे. २७ गावात अमृत योजने अंतर्गत पाणी पुरवठा मंजूर करण्यात आली आहे. ही योजना भाजप सरकारने मंजूर केली आहे. या योजनेच्या कामात खासदार शिंदे यांचा हस्तक्षेप असतो. तसेच भाजप कार्यकत्र्यावर गुन्हे दाखल केले जात आहे. या सगळ्य़ाला खासदार शिंदे जबाबदार आहे. आमच्या पक्षाच्या कार्यकत्र्यावर गुन्हे दाखल झाले तर शिवसैनिकांसह खासदारांच्या विरोधातही गुन्हा दाखल झाला पाहिजे. यापुढे भोपर गावात पाण्याच्या मुद्यावर काही वाद झाल्यास त्याला खासदार जबाबदार असतील असे म्हटले आहे. त्यांच्या विरोधातही कारवाई केली जावी.

दरम्यान शिवसेनेचे विधानसभा संघटक एकनाथ पाटील यांनी सांगितले की, पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा कार्यादेश मिळालेला नसताना भाजपने भूमीपूजन कसे काय केले. आमच्या लोकप्रतिनिधींनी ही योजना मंजूर करुन आणली आहे. त्यामुळे भूमीपूजन करणो हा आमचा हक्कच आहे. रविना माळी यांचा नगरसेविका पदाचा कार्यकाळ संपला आहे. तरी देखील त्यांचे लेटर हेट वापरून त्याच गैरवापर करीत आमच्याखासदारांना नाहक बदनाम केल्या प्रकरणी कोकण विभागीय आयुक्तांकडे तक्रार करणार आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रkalyanकल्याणkdmcकल्याण डोंबिवली महापालिकाWaterपाणीShiv SenaशिवसेनाBJPभाजपा