शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या ‘मिशन बारामती’ला पहिलं यश! सुप्रिया सुळेंच्या निकटवर्तीयाचा NCPला रामराम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2023 12:18 IST

Maharashtra Politics: बड्या नेत्याचा होत असलेला भाजप प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Maharashtra Politics: कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा चैतन्य निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. तर राज्यातील महाविकास आघाडीला बळ मिळाल्याची चर्चा सुरू आहे. अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निवृत्ती मागे घेऊन पुन्हा एकदा सक्रीय झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आणि खासदार सुप्रिया सुळे यांचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या बड्या नेत्याने राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय पक्का केला असून, लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. 

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने मिशन बारामती हाती घेतले आहे. बड्या नेत्याची भाजपमध्ये होत असलेली एन्ट्री या मिशन बारामतीचे पहिले मोठे यश मानले जात असल्याची चर्चा सुरू आहे. सुप्रिया सुळे यांचे अत्यंत निकटचे सहकारी अशोक टेकवडे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. अशोक टेकवडे हे पुरंदरमधील मोठे नाव असून, हा राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. 

पुरंदरमधील राजकीय गणितच बदलणार असल्याची चर्चा

अशोक टेकवडे यांच्या भाजप प्रवेशानंतर पुरंदरमधील राजकीय गणितच बदलणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अशोक टेकवडे गेल्या महिन्यांपासून राष्ट्रवादीत नाराज होते. त्यामुळे ते राष्ट्रवादीत फार काळ राहतील असे वाटत नाही. ते पक्ष सोडतील, अशी चर्चा स्थानिकांमध्ये सुरू असल्याचे म्हटले जात आहे. भाजप प्रवेशामुळे भाजपला पुरंदरमध्ये मोठे बळ मिळणार आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जात आहे. मिशन बारामतीचा भाग म्हणूनच टेकवडे यांनाही पक्षात प्रवेश देण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे. 

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार असल्याचे म्हटले जात आहे. टेकवडे यांच्यासह त्यांचे अनेक समर्थक तसेच कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांचे काही मुद्दे पटले आणि पुरंदरचे प्रश्न सोडवून विकास करण्याची चांगली संधी आहे. त्यामुळे असा निर्णय घेतला, असे अशोक टेकवडे यांनी म्हटले आहे. 

 

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा