शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! केंद्र सरकारने मोलॅसिस ज्यूस व सिरप पासून इथेनॉल निर्मितीवर घातलेली बंदी उठवली; हर्षवर्धन पाटलांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 12:51 IST

केंद्र सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. केंद्राने मोलॅसिस ज्यूस व सिरपपासून इथेनॉल निर्मितीवर घातलेली बंदी उठवली आहे.

Harshvardhan Patil ( Marathi News ) : केंद्र सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. केंद्राने मोलॅसिस ज्यूस व सिरपपासून इथेनॉल निर्मितीवर घातलेली बंदी उठवली आहे. यामुळे ऊ, उत्पादक शेतकऱ्यांना आणि कारखानदारांना दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने ६ डिसेंबर २०२३ रोजी मोलॅसिसपासून बीहेव्ही मोलीसेस आणि ज्यूस व सिरप पासून इथेनॉल करण्यासाठी बंदी घातली होती. यामुळे शेतकऱ्यांचे आणि खारखानदारांचे नुकसान झाले होते. 

ज्याची चर्चा होती तेच घडलं; काँग्रेस आमदारानं दिला राजीनामा, भाजपात प्रवेश करणार?

यावरील बंदी उठवण्याची मागणी गेल्या काही दिवसापासून सुरू होती. याबाबत भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांनी मागणी केली होती. यावर आता केंद्राने हा निर्णय घेतला आहे. याबाबत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी माहिती दिली."आज केंद्र सरकारने २०२३ ला मोलॅसिसपासून आणि  सिरपपासून इथेनॉल निर्मितीवर बंदी घातली होती.  आम्ही याबाबत राष्ट्रीय साखर संघामार्फत पाठपुरावा करत होतो. पेट्रोल मंत्री, केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यांना पत्र दिलं होतं. आता केंद्र सरकारने ती बंदी उठवली आहे. आता २०२४-२५ च्या गळीत हंगामात ज्या कारखान्यांकडे डिस्टलरी आहे त्यांना इथेनॉल काढायला परवानगी मिळणार आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली. 

"केंद्राने चांगला निर्णय घेतला आहे, राष्ट्रीय साखर संघाच्या पाठपुराव्याला यश आले आहे. मला वाटतं आता देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. २०२४ -२५ च्या गळीत हंगामात साखरेपेक्षा इथेनॉलला चांगला दर मिळेल. यामुळे आपल्या ऊसालाही चांगला दर मिळेल. यामुळे या निर्णयाचं मी स्वागत करतो. राष्ट्रीय सारख संघातर्फे मी केंद्रीय मंत्री अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आभार मानतो, असंही पाटील म्हणाले. 

"वास्तविक पाहता सिरप आणि मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मिसाठी जवळपास ५० हजार कोटींची जास्त गुंतवणूक ही सहकारी आणि खासगी कारखान्यांनी केंद्र सरकारच्या धोरणानेच केली होती. परंतु साखरेचा तुटवडा भासेल की काय अशा बातम्या समोर आल्या तेव्हा बंदी घातली होती. याचा फायदा देशातील ५ कोटी शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे, असंही भाजपा नेते हर्षवर्धन पाटील म्हणाले. 

टॅग्स :harshvardhan patilहर्षवर्धन पाटीलBJPभाजपाFarmerशेतकरी