शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
4
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
5
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
6
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
7
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
8
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
9
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
10
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
11
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
12
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
13
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
14
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
15
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
16
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
17
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
18
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
19
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
20
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! केंद्र सरकारने मोलॅसिस ज्यूस व सिरप पासून इथेनॉल निर्मितीवर घातलेली बंदी उठवली; हर्षवर्धन पाटलांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 12:51 IST

केंद्र सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. केंद्राने मोलॅसिस ज्यूस व सिरपपासून इथेनॉल निर्मितीवर घातलेली बंदी उठवली आहे.

Harshvardhan Patil ( Marathi News ) : केंद्र सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. केंद्राने मोलॅसिस ज्यूस व सिरपपासून इथेनॉल निर्मितीवर घातलेली बंदी उठवली आहे. यामुळे ऊ, उत्पादक शेतकऱ्यांना आणि कारखानदारांना दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने ६ डिसेंबर २०२३ रोजी मोलॅसिसपासून बीहेव्ही मोलीसेस आणि ज्यूस व सिरप पासून इथेनॉल करण्यासाठी बंदी घातली होती. यामुळे शेतकऱ्यांचे आणि खारखानदारांचे नुकसान झाले होते. 

ज्याची चर्चा होती तेच घडलं; काँग्रेस आमदारानं दिला राजीनामा, भाजपात प्रवेश करणार?

यावरील बंदी उठवण्याची मागणी गेल्या काही दिवसापासून सुरू होती. याबाबत भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांनी मागणी केली होती. यावर आता केंद्राने हा निर्णय घेतला आहे. याबाबत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी माहिती दिली."आज केंद्र सरकारने २०२३ ला मोलॅसिसपासून आणि  सिरपपासून इथेनॉल निर्मितीवर बंदी घातली होती.  आम्ही याबाबत राष्ट्रीय साखर संघामार्फत पाठपुरावा करत होतो. पेट्रोल मंत्री, केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यांना पत्र दिलं होतं. आता केंद्र सरकारने ती बंदी उठवली आहे. आता २०२४-२५ च्या गळीत हंगामात ज्या कारखान्यांकडे डिस्टलरी आहे त्यांना इथेनॉल काढायला परवानगी मिळणार आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली. 

"केंद्राने चांगला निर्णय घेतला आहे, राष्ट्रीय साखर संघाच्या पाठपुराव्याला यश आले आहे. मला वाटतं आता देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. २०२४ -२५ च्या गळीत हंगामात साखरेपेक्षा इथेनॉलला चांगला दर मिळेल. यामुळे आपल्या ऊसालाही चांगला दर मिळेल. यामुळे या निर्णयाचं मी स्वागत करतो. राष्ट्रीय सारख संघातर्फे मी केंद्रीय मंत्री अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आभार मानतो, असंही पाटील म्हणाले. 

"वास्तविक पाहता सिरप आणि मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मिसाठी जवळपास ५० हजार कोटींची जास्त गुंतवणूक ही सहकारी आणि खासगी कारखान्यांनी केंद्र सरकारच्या धोरणानेच केली होती. परंतु साखरेचा तुटवडा भासेल की काय अशा बातम्या समोर आल्या तेव्हा बंदी घातली होती. याचा फायदा देशातील ५ कोटी शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे, असंही भाजपा नेते हर्षवर्धन पाटील म्हणाले. 

टॅग्स :harshvardhan patilहर्षवर्धन पाटीलBJPभाजपाFarmerशेतकरी