शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
3
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
4
लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
5
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
6
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्याधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
7
VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्षही करू शकली नाही आग!
8
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
9
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
10
MLC 2025: भारतीय फलंदाजाचा धुमधडाका! चार चेंडूत मारले चार षटकार, केली तुफान फटकेबाजी
11
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
12
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
13
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
14
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
15
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
16
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
17
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
18
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
19
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
20
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! केंद्र सरकारने मोलॅसिस ज्यूस व सिरप पासून इथेनॉल निर्मितीवर घातलेली बंदी उठवली; हर्षवर्धन पाटलांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 12:51 IST

केंद्र सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. केंद्राने मोलॅसिस ज्यूस व सिरपपासून इथेनॉल निर्मितीवर घातलेली बंदी उठवली आहे.

Harshvardhan Patil ( Marathi News ) : केंद्र सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. केंद्राने मोलॅसिस ज्यूस व सिरपपासून इथेनॉल निर्मितीवर घातलेली बंदी उठवली आहे. यामुळे ऊ, उत्पादक शेतकऱ्यांना आणि कारखानदारांना दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने ६ डिसेंबर २०२३ रोजी मोलॅसिसपासून बीहेव्ही मोलीसेस आणि ज्यूस व सिरप पासून इथेनॉल करण्यासाठी बंदी घातली होती. यामुळे शेतकऱ्यांचे आणि खारखानदारांचे नुकसान झाले होते. 

ज्याची चर्चा होती तेच घडलं; काँग्रेस आमदारानं दिला राजीनामा, भाजपात प्रवेश करणार?

यावरील बंदी उठवण्याची मागणी गेल्या काही दिवसापासून सुरू होती. याबाबत भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांनी मागणी केली होती. यावर आता केंद्राने हा निर्णय घेतला आहे. याबाबत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी माहिती दिली."आज केंद्र सरकारने २०२३ ला मोलॅसिसपासून आणि  सिरपपासून इथेनॉल निर्मितीवर बंदी घातली होती.  आम्ही याबाबत राष्ट्रीय साखर संघामार्फत पाठपुरावा करत होतो. पेट्रोल मंत्री, केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यांना पत्र दिलं होतं. आता केंद्र सरकारने ती बंदी उठवली आहे. आता २०२४-२५ च्या गळीत हंगामात ज्या कारखान्यांकडे डिस्टलरी आहे त्यांना इथेनॉल काढायला परवानगी मिळणार आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली. 

"केंद्राने चांगला निर्णय घेतला आहे, राष्ट्रीय साखर संघाच्या पाठपुराव्याला यश आले आहे. मला वाटतं आता देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. २०२४ -२५ च्या गळीत हंगामात साखरेपेक्षा इथेनॉलला चांगला दर मिळेल. यामुळे आपल्या ऊसालाही चांगला दर मिळेल. यामुळे या निर्णयाचं मी स्वागत करतो. राष्ट्रीय सारख संघातर्फे मी केंद्रीय मंत्री अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आभार मानतो, असंही पाटील म्हणाले. 

"वास्तविक पाहता सिरप आणि मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मिसाठी जवळपास ५० हजार कोटींची जास्त गुंतवणूक ही सहकारी आणि खासगी कारखान्यांनी केंद्र सरकारच्या धोरणानेच केली होती. परंतु साखरेचा तुटवडा भासेल की काय अशा बातम्या समोर आल्या तेव्हा बंदी घातली होती. याचा फायदा देशातील ५ कोटी शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे, असंही भाजपा नेते हर्षवर्धन पाटील म्हणाले. 

टॅग्स :harshvardhan patilहर्षवर्धन पाटीलBJPभाजपाFarmerशेतकरी