शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

मोठी बातमी: पवारांच्या राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; प्रवक्त्याच्या सूचक पोस्टने चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2024 11:13 IST

पक्षातील दोन नेत्यांमध्ये अप्रत्यक्षरित्या कलगीतुरा रंगलेला असताना आता यामध्ये प्रवक्त्यांनीही उडी घेतल्याचं दिसत आहे.

Sharad Pawar NCP ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाला महाराष्ट्रात चांगलं यश मिळालं असलं तरी निवडणूक निकालानंतर पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात आमदार रोहित पवार यांनी कोणत्याही नेत्याचं नाव न घेता पक्षात सुरू असलेल्या काही गोष्टींबाबत आपली नाराजी व्यक्त केली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या भाषणातून कोणत्याही नेत्याने अंतर्गत गोष्टींवरची भूमिका जाहीरपणे मांडू नये, अशी सूचना केली. या दोन्ही नेत्यांमध्ये अप्रत्यक्षरित्या कलगीतुरा रंगलेला असताना आता यामध्ये प्रवक्त्यांनीही उडी घेतल्याचं दिसत आहे.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते आणि रोहित पवारांचे विश्वासू अशी ओळख असणाऱ्या विकास लवांडे यांनी ६ जून रोजी एक पोस्ट लिहीत पक्षाच्या प्रदेश पातळीवरील नेतृत्वात खांदेपालट करण्यात यावा, अशी मागणी केली होती. "निष्ठावान, लढाऊ नेते शशिकांत शिंदे आणि युवा आमदार रोहित पवार यांच्यावर प्रदेश संघटनेची मुख्य जबाबदारी देण्यात यावी. तसंच राष्ट्रीय पातळीवर सर्वांना सोबत घेऊन पक्ष संघटना वाढवली पाहिजे," असं लवांडे यांनी म्हटलं होतं. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी अप्रत्यक्षपणे प्रदेशाध्यक्षपदावर भाष्य केल्यानंतर आता जयंत पाटील यांच्या गोटातूनही प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. 

जयंत पाटील यांचे खंदे समर्थक आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते अॅड. भूषण राऊत यांनीही सोशल मीडियावर पोस्ट लिहीत प्रदेशाध्यक्षपदाची मागणी करणाऱ्यांवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे. "राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळणे हे कोंबड्या पाळण्याइतके सोप्पे नाही," असा टोला भूषण राऊत यांनी लगावला आहे. रोहित पवार हे बारामती अॅग्रो या आपल्या कंपनीच्या माध्यमातून कोंबड्यांचा व्यवसाय करत असल्याने भूषण राऊत यांनी त्यांना उद्देशूनच हा टोला लगावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

जाहीर व्यासपीठावरून जयंत पाटलांनी काय आवाहन केलं?

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून अहमदनगर इथं आयोजित सभेत बोलताना जयंत पाटील म्हणाले की, "माझ्या प्रदेशाध्यक्षपदाचे महिने याआधी अनेकांनी मोजून झाले आहेत. आता पुढचे चार महिने मोजू नका. कारण आता निवडणूक आहे. जाहीरपणे बोलायचे बंद करा. काही तक्रार असेल तर शरद पवार यांना भेटून ती तक्रार करा. त्यावर ते आमच्या दोन कानाखाली मारतील, नाहीतर त्यांना योग्य वाटेल तो निर्णय घेतील. फक्त ट्विटरवर वगैरे बोलणं बंद करा," असं आवाहन पाटील यांनी केलं.

"मी सगळो नीट करतो. पक्ष ही कोणा एकाची संपत्ती नाही, महाराष्ट्रातील लाखो लोकांचा हा पक्ष आहे. मी चुकीचो वागलो तर सगळ्या महाराष्ट्रातील जनतेवर याचा परिणाम होणार, याचं भान ठेवून आपण सगळ्यांनी वागू. पुढील चार महिने आपण एका दिलाने राहू. नोव्हेंबरनंतर मीच प्रदेशाध्यक्ष म्हणून नमस्कार करेन. पण तोपर्यंत जाहीरपणे आणि खासगीतही चर्चा करू नका. काही सूचना असतील तर मला येऊन सांगा. लोकसभेत झालेला विजय हा माझ्या एकट्याचा नाही. हे टीम वर्क आहे. त्यामुळे चिंता करू नका, विधानसभेतही आपल्या बाजूनेच निकाल येईल," असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलSharad Pawarशरद पवारRohit Pawarरोहित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४