शहरं
Join us  
Trending Stories
1
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
2
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
3
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
4
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
7
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
8
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
9
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
10
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
11
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
12
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
13
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
14
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
15
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
16
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
17
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
18
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
19
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
20
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
Daily Top 2Weekly Top 5

शिंदे सरकारचे मोठे निर्णय; मुंबईत कारला टोलमुक्त प्रवेश अन्...; मध्यमवर्गीयांसह अनेकांना दिलासा, अंमलबजावणी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2024 08:19 IST

टोलमाफीच्या निर्णयाची अंमलबजावणी मध्यरात्री बारा वाजल्यापासून सुरू झाली आहे.

मुंबई : मुंबईतील पाचही टोलनाक्यांवर हलकी वाहने, एसटी बसेस आणि स्कूल बसेसना टोलमाफी देण्याचा मोठा निर्णय सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. 

 टोलमाफीच्या निर्णयाची अंमलबजावणी मध्यरात्री बारा वाजल्यापासून सुरू झाली आहे. मुंबईतील पाच प्रवेश मार्गांवरून शहरात प्रवेश करताना व बाहेर जाताना वरील वाहनांना आता टोल द्यावा लागणार नाही. लहान कारला टोलमुक्ती मिळाल्याने मध्यमवर्गीयांमधून विशेष आनंद व्यक्त होत आहे. जड वाहने आणि खासगी बसेसना मात्र टोल नाक्यांवर टोल द्यावा लागणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत विविध १९ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. यावेळी विविध निर्णय घेण्यात आले. 

वेळ, इंधन वाचेल, प्रदूषण कमी होईलमी आमदार असताना टोलमाफीचे आंदोलन केले होते. कोर्टातही गेलो होतो. मला आनंद आहे, लाखो लोकांना या टोलमाफीमुळे दिलासा मिळणार आहे. यामुळे वेळ, इंधन वाचेल, प्रदूषण कमी होईल. हे सरकार सर्वसामान्यांना न्याय देणारे आहे. - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

वाहतूककोंडीतून होणार सुटका-टोलमाफीमुळे वाहतूककोंडीतून मुंबईकरांची सुटका होणार आहे. सध्या मुंबईत प्रवेश करणाऱ्या चारचाकी हलक्या वाहनांकडून ४५ रुपये, मिनी बसकडून ७५ रुपये, ट्रककडून १५० तर अवजड वाहनांकडून १९० रुपये टोल आकाराला जातो.

-मुंबईतील पाच टोलनाक्यांवरून दरमहा साधारणपणे ६० लाख वाहने ये-जा करतात. गत ऑगस्ट महिन्यामध्ये या ५ टोलनाक्यांवरून ६१ लाख ९३ हजार वाहनांनी प्रवास केला. त्यातून तब्बल ४२ कोटी ५० लाख रुपयांचे उत्पन्न कंत्राटदाराला मिळाले. यामध्ये ४२ लाख ६१ हजार कारचा समावेश होता. या कार चालकांकडून २२ कोटी ५५ लाख रुपयांचे उत्पन्न कंत्राटदाराला मिळाले होते.

कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव -महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. पद्मविभूषण रतन टाटा कौशल्य विद्यापीठ असे या विद्यापीठाचे नामकरण असेल. ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ हा निर्णय घेण्यात आला.

भरपाईसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापनमुंबईत प्रवेश करणाऱ्या वाहनांकडून सायन-पनवेल महामार्गावरील वाशी, लालबहादूर शास्त्री रस्त्यावर मुलुंड, पूर्व द्रुतगती मार्गावर मुलुंड आणि ऐरोली पुलाजवळ, पश्चिम द्रुतगती मार्गावर दहीसर येथील पथकर नाक्यावर टोल वसुली केली जाते. आता या नाक्यांवर टोलमधून सूट दिल्यामुळे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला द्याव्या लागणाऱ्या भरपाईसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.

मुंबईतील पाचही टोलनाक्यांची मुदत डिसेंबर २०२६ मध्ये संपत आहे. टोलमाफीमुळे टोल वसुली करणाऱ्या कंपनीला नेमकी किती रक्कमेची भरपाई द्यावी लागेल, याची आकडेवारी सध्या महामंडळाकडे उपलब्ध नाही, अशी माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिली. 

महत्त्वाचे निर्णय - -धारावी पुनर्विकासासाठी देवनार डम्पिंग ग्राउंडची १२५ एकर जागा देणार -राज्यात प्रधानमंत्री आवास योजना (शहरी ) २.० राबविणार -आगरी समाजासाठी महामंडळ -दमणगंगा एकदरे-गोदावरी नदी जोड योजनेस मान्यता 

टॅग्स :State Governmentराज्य सरकारEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारMahayutiमहायुती