शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! जसलोक, केईएमसह मुंबईतील ५० हून अधिक हॉस्पिटलना बॉम्बने उडविण्याची धमकी
2
पाणीपुरी खाल्ल्याने ८० पेक्षा अधिक जणांना विषबाधा;पिंप्री, चांदसणी, कमळगाव येथील रुग्णांवर उपचार सुरू
3
हरियाणात काँग्रेसला मोठा धक्का; आमदार, माजी खासदारांनी ४० वर्षांचे नाते संपविले, सदस्यत्वाचा राजीनामा
4
दिल्लीत फडणवीसांबाबत ठरले! महाराष्ट्रात नो चेंज; देवेंद्रना प्रश्न विचारताच गोयल मधेच बोलले...
5
टॅक्सी - रिक्षा चालकांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; कल्याणकारी मंडळ, विमा, मुलांना नोकरी...
6
उत्तर प्रदेशातील मतदारांनी भाजपला का नाकारले? आढावा घेण्यासाठी पक्षाने तयार केली 40 पथके
7
अन्नधान्याच्या वाढलेल्या किंमती महागाई रोखण्यात अडथळा; RBI गव्हर्नरांचे महत्वाचे वक्तव्य
8
अभिषेक बच्चनला बंपर लॉटरी लागली; खटाखट खटाखट १५ कोटींचे सहा आलिशान फ्लॅट खरेदी केले
9
मोठी बातमी! पंढरपूर- कराड रोडवर भीषण अपघात; सहा महिला जागीच ठार, एक गंभीर
10
उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली; आक्रमक ओबीसी आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्ग रोखला
11
Reliance Jio : जिओचे नेटवर्क बंद!; इंटरनेटपासून फायबरपर्यंत सर्वच बंद झाल्याने युजर्सचा संताप
12
शेतकऱ्यांनो खात्यात खटाखट खटाखट २००० रुपये आले का? मोदींनी एक बटन दाबले, २० हजार कोटी वळते केले
13
सन्मान निधीनंतर आता कोट्यवधी शेतकऱ्यांना NDA सरकार देणार आणखी एक गिफ्ट?
14
'अ‍ॅनिमल पार्क'संदर्भात रणबीर कपूरच्या सहकलाकाराने दिली मोठी अपडेट, म्हणाला- "सिनेमाची कथा..."
15
पुढच्यावेळी रॉबर्ट वाड्रा संसदेत दिसणार?; प्रियंका गांधी वायनाडला जाताच पतीची घोषणा
16
लोकसभा अध्यक्षाची निवड कशी केली जाते? कोणते अधिकार मिळतात? जाणून घ्या...
17
सरकारचा एक निर्णय अन् लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला; RTE प्रवेश पुन्हा रखडले
18
वयाच्या चाळीशीतही अभिनेत्रीच्या हॉटनेसची चर्चा; साऊथ नंतर आता बॉलिवूडमध्येही बोलबाला
19
मुंबई, पाटणा, जयपूर, कोलकाता...देशभरातील 40 विमानतळांना बॉम्बने उडवण्याची धमकी
20
वर्षा गायकवाडांचा आमदारकीचा राजीनामा; काँग्रेस- शिवसेनेचे आणखी काही आमदार राजीनामा देणार

भास्कर जाधवांबरोबर जमणे नाही

By admin | Published: October 20, 2014 9:17 PM

उदय सामंत : वृत्तीला कंटाळूनच राष्ट्रवादीचा त्याग

रत्नागिरी : मला गद्दार म्हणणारे भास्कर जाधव हेच खरे गद्दार आहेत. या विधानसभा निवडणुकीत मला पाडण्यासाठी जाधव यांनी षडयंत्र रचले होते. वेगवेगळ्या समाजातील उमेदवार माझ्या विरोधात उभे करण्याचा डाव त्यांनी रचला होता. अशा व्यक्तिबरोबर पक्षात राहून संघर्ष करण्यात शक्ती वाया घालवण्यापेक्षा पक्षातून नेत्यांना सांगूनच चांगलेपणी बाहेर पडण्याचा निर्णय मी घेतला. जाधव या वृत्तीबरोबर पक्षात राहून काम करणे आपणास शक्य नव्हते, असा हल्लाबोल सेनेचे आमदार, माजी मंत्री उदय सामंत यांनी केला. विधानसभा निवडणुकीत सेनेचे उमेदवार म्हणून विजय झाल्यानंतर कुवारबाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर न्याय भवनाच्या बाहेर ते पत्रकारांशी बोलत होते. आपण पक्ष का सोडला, याची कारणे १९ आॅक्टोबरला देऊ, असे सामंत यांनी सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर ते पत्रकारांशी बोलत होते. भास्कर जाधव यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले, जाधव यांनी प्रत्येक वेळी पक्षात षडयंत्र रचली. षडयंत्रकारी नेता अशीच त्यांची ओळख आहे. त्याना सेनेत तिकीट मिळाले नाही म्हणून गद्दारी केली. जाधव यांनी चिपळूण पालिका निवडणुकीत वेगळी आघाडी करीत पक्षविरोधी काम केले. तटकरेंच्या निवडणुकीवेळीही षडयंत्र केले. अशा जाधवांना माझ्यावर गद्दारीचा आरोप करण्याचा अधिकारच नाही. अशा माणसाबरोबर पक्षात राहून काम करणे मला मान्य नाही. आपण पक्ष बदलला. मात्र, आपण पक्षांतर करताना वरिष्ठांबाबत कोणतीही टीका करणार नाही, असे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनाही सांगितले होते. सेनेत काम करताना विकासकामांनाच आपण प्राधान्य देणार असल्याचे सामंत म्हणाले. सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याचे प्रवेशकर्तेवेळी दिलेले आश्वासन आपण नक्कीच पूर्ण करू असे ते म्हणाले. सामंत यांनी यावेळी भास्कर जाधव यांच्यावर जोरदार टिका केली व पूर्वी जाहीर केल्याप्रमाणे त्यांनी जाधव यांच्या टिकेला त्यांनी सडेतोड उत्तर दिले. सामंत यांनी विजयी झाल्यानंतर जाधव यांना पत्रकारपरिषदेतून फटकारले आहे. (प्रतिनिधी)