शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
5
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
6
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
7
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
8
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
9
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
10
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
11
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
12
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाहपदी भय्याजी जोशी यांची चौथ्यांदा निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2018 17:58 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाहपदी भय्याजी जोशी यांची चौथ्यांदा निवड करण्यात आली आहे. 

नागपूर- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाहपदी भय्याजी जोशी यांची चौथ्यांदा निवड करण्यात आली आहे. नागपुरातील रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरात सुरू असलेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत जोशी यांची एकमताने निवड करण्यात आली. जोशी यांना सलग चौथ्यांदा या पदाची जबाबदारी देण्यात आली आहे हे विशेष. ते पुढील ३ वर्षे या पदावर कायम राहतील. २०१९ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने हे महत्वाचे पाऊल मानण्यात येत आहे.सरकार्यवाह हे पद संघा प्रमुखांनंतरचं दुसरं मोठं पद आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाहपदाची निवडणूक दर ३ वर्षांनी होते. यंदा भय्याजी जोशी यांची फेरनिवड होते की सहसरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांना संधी मिळते याबाबत संघ वर्तुळात उत्सुकता होती. त्यानुसार शनिवारी निवडप्रक्रिया राबविण्यात आली व जोशी यांचीच फेरनिवड झाली. संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख डॉ.मनमोहन वैद्य यांनी जोशी यांची निवड झाल्याची घोषणा केली. बाळासाहेब देवरस , हो.वे शेषाद्री यांनी याअगोदर तीन हून अधिकवेळा सरकार्यवाहपदाची जबाबदारी पार पाडली आहे. जोशी रविवारी नवीन कार्यकारिणीची घोषणा करतील.

 

असा घडला क्रम- जोशी सरकार्यवाहपदावरुन पायउतार झाले.

- निवडणूक अधिकारी म्हणून मध्य क्षेत्र संघचालक अशोक सोहनी यांच्याकडे जबाबदारी

- पश्चिम क्षेत्र संघचालक जयंतीभाई भाडेरिया यांनी भय्याजी जोशी यांच्या नावाचा  प्रस्ताव ठेवला. त्यांनी भय्याजी यांच्या कार्यकाळात संघाच्या प्रगतीचा उल्लेख केला .

- पूर्व उत्तर प्रदेश संघचालक वीरेंद्र पराक्रमादित्य, दक्षिण प्रांताचे कार्यवाह राजेंद्रन,  कोकण प्रांत सहकार्यवाह विठ्ठल कांबळे, आसाम क्षेत्र कार्यवाह डॉ.उमेश चक्रवर्ती यांचे जोशींच्या नावाला अनुमोदन

- अ.भा.प्रतिनिधी सभेत जोशी यांची एकमताने निवड

जोशींना मिळाला अनुभवाचा फायदा

यंदा जोशी यांच्यासोबतच सहसरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांचे नावदेखील चर्चेत होते. परंतु संघश्रेष्ठींचा कल जोशी यांच्याकडेच होता. २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपाच्या प्रचारात सक्रिय भुमिका पार पाडली होती. यात भय्याजी जोशी यांनी संपूर्ण रणनिती आखली होती व त्यांच्याच प्रयत्नांमुळे भाजपाला ‘न भुतो न भविष्यति’ असे यश मिळण्यास मदत झाली होती. शिवाय जोशी यांच्या कार्यकाळात संघाचा विस्तारदेखील झाला. उत्तरप्रदेशसह ईशान्येत त्यांच्या कार्यकाळात संघकार्यात वाढ झाली. २०१२ साली जोशी यांनी दुसºयांदा सरकार्यवाहपदाची सूत्रे घेतल्यापासून सहा वर्षात संघाच्या शाखांमध्ये ४० टक्क्यांनी वाढ झाली.  त्यामुळे जोशी यांच्या अनुभवावरच संघाच्या प्रतिनिधींनी विश्वास टाकला व त्यांना परत एकदा सरकार्यवाहपदाची माळ त्यांच्या गळ्यात टाकली.

प्रचारक ते सरकार्यवाहपदाचा चौकार

सरकार्यवाह भय्याजी जोशी हे मूळचे इंदूरचे असून त्यांचा जन्म १९४७ सालचा आहे. जोशी यांनी ठाणे या शहरात शिक्षण पूर्ण करत कला शाखेची पदवी संपादन केली. ते कलाशाखेचे पदवीधर आहेत. लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जुळलेल्या भैय्याजी जोशी यांची १९७५ साली प्रचारक म्हणून नियुक्ती झाली. त्यांनी देशातील निरनिराळ्या प्रांतांमध्ये संघविस्ताराचे काम केले. यादरम्यान महाराष्ट्रात जिल्हा विभाग प्रचारक, प्रांत सेवा प्रमुख, क्षेत्र सेवा प्रमुख, अखिल भारतीय सहसेवा प्रमुख, अखिल भारतीय सेवा प्रमुख, सह-सरकार्यवाह अशा विविध जबाबदाºया त्यांनी पार पाडल्या. मार्च २००९ साली झालेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत त्यांची सरकार्यवाहपदी पहिल्यांदा निवड करण्यात आली. २०१२ व २०१५ सालीदेखील त्यांची एकमताने निवड झाली. विधायक सेवा कार्य करणारे म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचे संघटनकौशल्य, प्रशासकीय हातोटी व नियोजन यामुळे संघकार्याचा देशभरात विस्तार झाला आहे. 

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघnagpurनागपूर