शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

राज्यपालांनी मागितलेली माफी म्हणजे मराठी माणसाचा विजय; जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2022 22:18 IST

राज्यपालांनी मराठी माणूस आणि मुंबई या संदर्भात केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झाला होता.

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: "रक्ताचे पाट वाहून ही भूमी आम्ही मिळविली आहे. 105 हुतात्मे देऊन आम्ही मुंबई मिळविली आहे. मराठी माणसाचे मन मोठे आहे, कोश्यारी तुम्हाला मराठी माणूस माफ करेल. कारण याच मनाने गुजरात्यांना स्वीकारले आहे. स्वतःचा घाम गाळून त्यांचे खिशे भरले. पण, त्याबद्दल आम्ही कधीच आसूया बाळगली नाही. आमची मनं मोठी आहेत. मला वाटते की हा मराठी माणसाचा विजय आहे", अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसने आज राजभवनावर मोर्चा नेण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर मराठी माणसाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह टीकेबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी माफी मागितली. याबाबत ते पत्रकारांशी बोलता होते.

जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले, "खरं तर कोश्यारी यांना आपण फार लांबचा कौल दिला होता. जेव्हा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलले तेव्हाच मराठी माणसाने पेटून उठायला हवे होते. जेव्हा ते महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीमाई यांच्या विवाहाच्या वयाबद्दल बरळले होते. तेव्हाच आपण उठायला हवे होते. आपण न उठल्यामुळेच त्यांची मराठी माणसाला भिकारी म्हणण्याची हिंमत झाली. राजस्थानी आणि गुजराती नसते तर मराठी माणसाला कोण ओळखतो, हे त्यांचे विधान आहे. पण, त्यांना माहित असायला हवे की मराठी माणसाला सबंध जग ओळखतं. रक्ताचे पाट वाहून ही भूमी आम्ही मिळविली आहे. १०५ हुतात्मे देऊन आम्ही मुंबई मिळविली आहे. मराठी माणसाचे मन मोठे आहे, कोश्यारी तुम्हाला मराठी माणूस माफ करेल", असे ते म्हणाले.

"राष्ट्रवादीची पुढील भूमिका काय असेल असे विचारले असता, ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसची नसून सबंध मराठी माणसांची होती. कोश्यारी हे आपणाला एकट्याला भिकारी म्हणाले नव्हते तर ते सर्वच मराठीजनांना भिकारी म्हणाले होते. त्यामुळे  यामध्ये पक्ष आणू नका, ही भूमिका समस्त मराठी माणसांची होती. भले सामान्य मराठी माणूस रस्त्यावर उतरला नाही पण, आपण जेव्हा आंदोलनासाठी रस्त्यावर चालत होतो. तेव्हा गाडीतून जाणारा प्रत्येक माणूस मला प्रोत्साहन देत होता. कारण, कोश्यारींचे शब्द बाणासारखे मराठी मनाला टोचले होते. मराठी माणूस अस्वस्थ होता. पक्षाभिनिवेश विसरून दबावगट तयार होत होता. कदाचित त्यांना ते कळले असावे, म्हणून त्यांनी माफीनामा दिला", असेही आव्हाड म्हणाले.

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीJitendra Awhadजितेंद्र आव्हाडNCPराष्ट्रवादी काँग्रेसmarathiमराठी