शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
2
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
3
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
4
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
5
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
6
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
7
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
8
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
9
VIDEO : टीम इंडियातील ब्युटीची 'मन की बात'; थेट PM मोदींना विचारला स्कीन केअर रुटीनसंदर्भातील प्रश्न
10
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
11
विश्वविजेत्या कन्यांचं Tata कडून खास सेलिब्रेशन...; संघातील प्रत्येक खेळाडूला देणार Sierra एसयूव्ही गिफ्ट! खास आहेत फीचर्स
12
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
13
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
14
Numerology: प्रत्येक स्त्री ही गृहलक्ष्मी असते; पण 'या' जन्मतारखेची स्त्री ठरते 'भाग्यलक्ष्मी'!
15
Physicswallah Ltd IPO: IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी
16
कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली...
17
1 डिसेंबरपासून मोबाइल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार, 199 रुपयांचा पॅक किती रुपयांना होणार? मोठा दावा
18
हृदयद्रावक! बॉलिंगनंतर पाणी प्यायला, उलटी होताच बेशुद्ध होऊन खाली पडला, मैदानावरच मृत्यू
19
Lenskart IPO: लिस्टिंग गेन मिळेल का, केव्हा होणार शेअरचं अलॉटमेंट? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं
20
"या नाटकाचा अविभाज्य घटक असलेली तू...", प्रिया मराठेच्या आठवणीत पुष्कर श्रोत्रीची भावुक पोस्ट

राज्यपालांनी मागितलेली माफी म्हणजे मराठी माणसाचा विजय; जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2022 22:18 IST

राज्यपालांनी मराठी माणूस आणि मुंबई या संदर्भात केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झाला होता.

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: "रक्ताचे पाट वाहून ही भूमी आम्ही मिळविली आहे. 105 हुतात्मे देऊन आम्ही मुंबई मिळविली आहे. मराठी माणसाचे मन मोठे आहे, कोश्यारी तुम्हाला मराठी माणूस माफ करेल. कारण याच मनाने गुजरात्यांना स्वीकारले आहे. स्वतःचा घाम गाळून त्यांचे खिशे भरले. पण, त्याबद्दल आम्ही कधीच आसूया बाळगली नाही. आमची मनं मोठी आहेत. मला वाटते की हा मराठी माणसाचा विजय आहे", अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसने आज राजभवनावर मोर्चा नेण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर मराठी माणसाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह टीकेबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी माफी मागितली. याबाबत ते पत्रकारांशी बोलता होते.

जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले, "खरं तर कोश्यारी यांना आपण फार लांबचा कौल दिला होता. जेव्हा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलले तेव्हाच मराठी माणसाने पेटून उठायला हवे होते. जेव्हा ते महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीमाई यांच्या विवाहाच्या वयाबद्दल बरळले होते. तेव्हाच आपण उठायला हवे होते. आपण न उठल्यामुळेच त्यांची मराठी माणसाला भिकारी म्हणण्याची हिंमत झाली. राजस्थानी आणि गुजराती नसते तर मराठी माणसाला कोण ओळखतो, हे त्यांचे विधान आहे. पण, त्यांना माहित असायला हवे की मराठी माणसाला सबंध जग ओळखतं. रक्ताचे पाट वाहून ही भूमी आम्ही मिळविली आहे. १०५ हुतात्मे देऊन आम्ही मुंबई मिळविली आहे. मराठी माणसाचे मन मोठे आहे, कोश्यारी तुम्हाला मराठी माणूस माफ करेल", असे ते म्हणाले.

"राष्ट्रवादीची पुढील भूमिका काय असेल असे विचारले असता, ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसची नसून सबंध मराठी माणसांची होती. कोश्यारी हे आपणाला एकट्याला भिकारी म्हणाले नव्हते तर ते सर्वच मराठीजनांना भिकारी म्हणाले होते. त्यामुळे  यामध्ये पक्ष आणू नका, ही भूमिका समस्त मराठी माणसांची होती. भले सामान्य मराठी माणूस रस्त्यावर उतरला नाही पण, आपण जेव्हा आंदोलनासाठी रस्त्यावर चालत होतो. तेव्हा गाडीतून जाणारा प्रत्येक माणूस मला प्रोत्साहन देत होता. कारण, कोश्यारींचे शब्द बाणासारखे मराठी मनाला टोचले होते. मराठी माणूस अस्वस्थ होता. पक्षाभिनिवेश विसरून दबावगट तयार होत होता. कदाचित त्यांना ते कळले असावे, म्हणून त्यांनी माफीनामा दिला", असेही आव्हाड म्हणाले.

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीJitendra Awhadजितेंद्र आव्हाडNCPराष्ट्रवादी काँग्रेसmarathiमराठी