शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसी नेते एकवटू लागले! "आरक्षणाला कसा धक्का बसणार नाही हे सांगा"; मुंडे बहीण-भाऊ हाकेंच्या भेटीला
2
Ohh No! सुपर ८ लढतीपूर्वी टीम इंडियाच्या प्रमुख शिलेदाराला दुखापत, वाचा अपडेट्स 
3
Rahul Gandhi: ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
4
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
5
रिल्सच्या नादात तरुणीचा जीव गेला, रिव्हर्समध्ये कार डोंगरावरून दरीत कोसळून भीषण अपघात
6
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
7
"गॅरी, पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नकोस, टीम इंडियाला कोच करण्यासाठी ये!" 
8
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
9
'स्वतःच्या प्रमोशनसाठी रेल्वेचा वापर', मल्लिकार्जुन खरगेंचा मोदी सरकारवर आरोप
10
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
11
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
12
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
13
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
14
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
15
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
16
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
17
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
18
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
19
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह
20
"लोक मदतीसाठी ओरडत होते, हा एक भयंकर क्षण..."; प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं?

चारसूत्री भात लागवडीचा प्रयोग आदिवासी भागात ठरला लाभदायी

By admin | Published: October 24, 2016 8:36 AM

जलयुक्त शिवार अभियानातून अडविण्यात आलेल्या पाण्याने व शेततळ्यातून वासाळी, बारीशिंगवे येथील शेतकऱ्यांनी केलेला चारसुत्री हा नवीन भातशेतीचा प्रयोग लाभदायी ठरला

लक्ष्मण सोनवणे, ऑनलाइन लोकमत

बेलगाव कुऱ्हे ( नाशिक), दि. २४ -  भाताचे माहेरघर म्हणून परिचित असलेल्या इगतपुरी तालुक्यात हवामान बदलाचे मोठे आव्हान उभे राहिले असताना महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानातून अडविण्यात आलेल्या पाण्याने व शेततळ्यातून वासाळी, बारीशिंगवे येथील शेतकऱ्यांनी केलेला चारसुत्री हा नवीन भातशेतीचा प्रयोग लाभदायी ठरला आहे.आठवड्याभरात सोंगणीला वेग येणार असून भातशेतीतून उत्पादन देखील चांगले मिळणार असल्याने आदिवासी शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. बारीशिंगवे परिसरात भात कापणी सुरु झाली असून, मजूर खर्च परवडत नसल्यामुळे भात कापणी यंत्राच्या साहाय्याने येथील शेतकरी वसंत बोराडे, शिवाजी बोराडे, पांडुरंग बोराडे, गुलाब भले, कैलास भले, गोविंद लहांगे यांनी शेतात लागवड केलेली चारसुत्री भात कापणी सुरु केलेली आहे. मंडळ कृषी अधिकारी अरु ण पगारे, कृषी सहाय्यक रणजित आंधळे यांचे त्यांना विशेष मार्गदर्शन लाभत आहे. मुबलक पाऊस परंतु खडकाळ जमिनीमुळे तालुक्यातील वासाळी येथे कायमच दुष्काळी परिस्थिती असते. अशात शेतकरी धास्तावले होते. गेल्या चार वर्षात पावसाचे स्वरूप, उपलब्ध पाणीसाठा यावर अवलंबून शेतीवर मोठा विपरीत परिणाम होताना दिसत होता. तालुक्यात नैसर्गिक बदलाच्या समस्या ‘आ’वासून उभ्या असताना शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानाच्या संयोगाने व शेततळे झाल्यामुळे पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांना झाला. शेती संशोधन तंत्रज्ञानात झपाट्याने प्रगती होत असताना पावसावर अवलंबून असलेल्या भातशेतीसाठी दुष्काळी परिस्थितीमध्ये जलयुक्त शिवारातील सिमेंट काँक्रीट बंधारे शेतकऱ्यांना फायद्याचे ठरले आहेत. भातशेतीला पर्यायी व्यवस्था निर्माण करून आधुनिक पीकपद्धती राबविण्यासाठी शेतकऱ्यांना मोठे यश मिळाले आहे.