शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

Dhananjay Munde Resign: राजीनाम्यामागचं खरं कारण निघालं भलतंच; धनंजय मुंडे काय म्हणताहेत बघा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 11:56 IST

Dhananjay Munde Resignation Reason: काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले असं सांगत हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे असं बीडच्या घटनेवर धनंजय मुंडे यांनी सांगितले.

Dhananjay Munde Resignation: बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटले आहेत. या प्रकरणी वादात अडकलेल्या धनंजय मुंडे यांनी मंगळवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडेराजीनामा सोपवला. धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा दिल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितले. मात्र राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे यांनी पहिलं ट्विट करून राजीनाम्यामागच्या २ कारणांचा खुलासा केला आहे.

धनंजय मुंडे यांनी ट्विटमध्ये म्हटलं की, बीड जिल्ह्यातील मस्साजोगच्या संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे असं त्यांनी सांगितले. 

त्यामुळे माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मा. मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे असं धनंजय मुंडे यांनी खुलासा केला.

मुख्यमंत्री काय म्हणाले ?

धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे राजीनामा दिलेला आहे. त्यांचा राजीनामा मी स्वीकारला असून पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवला आहे. धनंजय मुंडे यांना त्यांच्या मंत्रिपदावरून मुक्त करण्यात आलं आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालेला असून त्यांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा दिल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलं. 

प्रशासकीय बदल्यांचा अधिकार काढून घ्या

दरम्यान, संतोष देशमुख हत्याकांडाचे सूत्रधार वाल्मीक कराड आहे. राजकारणात आल्यानंतर भावना संपतात का, आमचं सरकार कुणाविरोधात कारवाई करणार नाही का, संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो पाहून सुन्न झालं. मुख्यमंत्री २ ओळीत राजीनामा आला, तो स्वीकारला आणि राज्यपालांकडे पाठवला इतकेच बोलले. तुम्हाला संवेदनात नाहीत का, देशमुख कुटुंबाला किती यातना झाल्या त्या दिसल्या नाहीत का? विरोधी पक्ष फक्त घोषणेचा ड्रामा करतोय. तुम्हाला लोकांसाठी झटायला ठेवलंय. सामान्य माणसे चिरडली जातेय, यंत्रणा, प्रशासन राजकारण्यांसाठी काम करतायेत. कितीही राजकीय दबाव आला तरी चुकीचं काम करणार नाही अशी भूमिका प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे. राजकारण्यांच्या हातातून प्रशासकीय बदल्यांचा अधिकार काढला सगळं नीट होईल अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली.  

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेSantosh Deshmukhसंतोष देशमुख हत्या प्रकरणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणAjit Pawarअजित पवारResignationराजीनामा