शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

Dhananjay Munde Resign: राजीनाम्यामागचं खरं कारण निघालं भलतंच; धनंजय मुंडे काय म्हणताहेत बघा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 11:56 IST

Dhananjay Munde Resignation Reason: काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले असं सांगत हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे असं बीडच्या घटनेवर धनंजय मुंडे यांनी सांगितले.

Dhananjay Munde Resignation: बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटले आहेत. या प्रकरणी वादात अडकलेल्या धनंजय मुंडे यांनी मंगळवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडेराजीनामा सोपवला. धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा दिल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितले. मात्र राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे यांनी पहिलं ट्विट करून राजीनाम्यामागच्या २ कारणांचा खुलासा केला आहे.

धनंजय मुंडे यांनी ट्विटमध्ये म्हटलं की, बीड जिल्ह्यातील मस्साजोगच्या संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे असं त्यांनी सांगितले. 

त्यामुळे माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मा. मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे असं धनंजय मुंडे यांनी खुलासा केला.

मुख्यमंत्री काय म्हणाले ?

धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे राजीनामा दिलेला आहे. त्यांचा राजीनामा मी स्वीकारला असून पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवला आहे. धनंजय मुंडे यांना त्यांच्या मंत्रिपदावरून मुक्त करण्यात आलं आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालेला असून त्यांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा दिल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलं. 

प्रशासकीय बदल्यांचा अधिकार काढून घ्या

दरम्यान, संतोष देशमुख हत्याकांडाचे सूत्रधार वाल्मीक कराड आहे. राजकारणात आल्यानंतर भावना संपतात का, आमचं सरकार कुणाविरोधात कारवाई करणार नाही का, संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो पाहून सुन्न झालं. मुख्यमंत्री २ ओळीत राजीनामा आला, तो स्वीकारला आणि राज्यपालांकडे पाठवला इतकेच बोलले. तुम्हाला संवेदनात नाहीत का, देशमुख कुटुंबाला किती यातना झाल्या त्या दिसल्या नाहीत का? विरोधी पक्ष फक्त घोषणेचा ड्रामा करतोय. तुम्हाला लोकांसाठी झटायला ठेवलंय. सामान्य माणसे चिरडली जातेय, यंत्रणा, प्रशासन राजकारण्यांसाठी काम करतायेत. कितीही राजकीय दबाव आला तरी चुकीचं काम करणार नाही अशी भूमिका प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे. राजकारण्यांच्या हातातून प्रशासकीय बदल्यांचा अधिकार काढला सगळं नीट होईल अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली.  

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेSantosh Deshmukhसंतोष देशमुख हत्या प्रकरणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणAjit Pawarअजित पवारResignationराजीनामा