शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

‘लिव्ह इन’मध्ये सावधगिरी बाळगा! वसईमधील साहित्यिकांचे म्हणणे; घटनेवर व्यक्त केला तीव्र शब्दात संताप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2022 09:28 IST

ते म्हणाले की, ज्या मुली पालकांना आव्हान देऊन निघून जातात, त्यांच्याबाबतीत पालकांना दोष देता येत नाही. श्रद्धाचे पालक तिला थांबवायला गेले होते. मात्र, ती त्या तरुणाच्या प्रेमात वेडी झालेली असल्याने तिने पालकांचे घर सोडले होते.

जगदीश भोवड -

वसई : वसईतील तरुणी श्रद्धा वालकर हिच्याबाबतीत घडलेली घटना ही अमानुष कृत्यात समावेश करावा अशीच असल्याचे मत वसईतील साहित्य वर्तुळात व्यक्त होत आहे. अशा गोष्टी व्हायला लागल्या तर ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या तरुणींच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होईल, असे मत वसईतील मराठी ख्रिस्ती साहित्य मंडळाचे अध्यक्ष रेमंड मचाडो यांनी व्यक्त केले.

ते म्हणाले की, ज्या मुली पालकांना आव्हान देऊन निघून जातात, त्यांच्याबाबतीत पालकांना दोष देता येत नाही. श्रद्धाचे पालक तिला थांबवायला गेले होते. मात्र, ती त्या तरुणाच्या प्रेमात वेडी झालेली असल्याने तिने पालकांचे घर सोडले होते. मात्र, श्रद्धाच्या बाबतीत घडलेल्या घटनेनंतर समाज खडबडून जागा झाला आहे. एवढ्या अमानुषपणे आजवर वसईत तरी घटना घडलेली नव्हती. दुसरीकडे अशा घटनांतून धार्मिक तेढ निर्माण होईल, असे काही घडू नये.

माणुसकीला काळिमा कोकण मराठी साहित्य परिषदेचे पालघर जिल्हा अध्यक्ष प्रवीण दवणे म्हणाले की, ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. सुशिक्षित आणि वयात आलेल्या मुलींनी आपला मित्र-प्रियकर निवडताना त्याचे विचार, त्याचे आचार, त्याची घरची स्थिती पाहून निर्णय घेणे आवश्यक आहे.

घरातून फारकत घेणे चुकीचे -डिंपल प्रकाशनचे प्रकाशक अशोक मुळे म्हणाले की, ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मधील श्रद्धा वालकरचा हा प्रकार धक्कादायक आणि माणुसकीला काळिमा फासणारा आहे. इतके अमानुष असे कुणीच वागू शकत नाही, वागूही नये. सध्या  तरुण-तरुणी स्वतंत्र विचारांचे असतात. स्व-कर्तृत्वाचा एक वेगळाच उन्माद त्यात जाणवतो. पण मैत्री करताना, प्रेमात असताना हे भान विसरून घरातून फारकत घेणे चुकीचे आहे. ते नाते टिकले असते तर... हा जर-तरचा प्रश्न असला तरी कुठेतरी संवाद साधायला हवा होता. असे कृत्य करणाऱ्या या कूकर्म्यास तातडीने फाशी द्यायला हवी.

‘श्रद्धा स्वत:बाबत निर्णय घेऊ शकली नाही’ -ग्रंथप्रेमी प्रकाश जाधव म्हणाले की, श्रद्धाच्या बाबतीत घडलेली घटना पुन्हा घडता कामा नये यासाठी संस्कार जपणे आवश्यक आहे. लहानपणापासूनच मुलांवर चांगले संस्कार होणे आवश्यक आहे. नवीन पिढीला संस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घ्यायला आवडत नाही. त्यामुळे त्यांचे प्रबोधन होत नाही. रूढी, परंपरा जपल्या पाहिजेत. आंतरजातीय विवाह करण्यास विरोध असण्याचे कारण नाही, पण विचार करून असे विवाह व्हायला हवेत. दोन वर्षे श्रद्धा त्याच्याबरोबर राहत होती. ती शिकलेली होती. तरीही तिला स्वत:बाबत निर्णय घेता आला नाही, हे दुर्दैव आहे.

टॅग्स :Shraddha Walker Murder Caseश्रद्धा वालकरCrime Newsगुन्हेगारीVasai Virarवसई विरारPoliceपोलिस