शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
4
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
5
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
6
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
7
शैलेश जेजुरीकर बनले 'या' अमेरिकन कंपनीचे CEO! मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही मिळणार 'भारतीय' नेतृत्व!
8
Tripti Dimri : "मी ३० वर्षांपासून गप्प...", तृप्ती डिमरीने खूप काही केलंय सहन, का नाही उठवला आवाज?
9
Russia Ukraine War: "हल्ले थांबवा अन्यथा..."; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्पकडून पुतिन यांना इशारा!
10
BCCI च्या ऑफिसमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या IPL जर्सी चोरुन हरयाणात विकल्या
11
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
12
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
13
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
14
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
15
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
16
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
17
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
18
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
19
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
20
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं

‘लिव्ह इन’मध्ये सावधगिरी बाळगा! वसईमधील साहित्यिकांचे म्हणणे; घटनेवर व्यक्त केला तीव्र शब्दात संताप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2022 09:28 IST

ते म्हणाले की, ज्या मुली पालकांना आव्हान देऊन निघून जातात, त्यांच्याबाबतीत पालकांना दोष देता येत नाही. श्रद्धाचे पालक तिला थांबवायला गेले होते. मात्र, ती त्या तरुणाच्या प्रेमात वेडी झालेली असल्याने तिने पालकांचे घर सोडले होते.

जगदीश भोवड -

वसई : वसईतील तरुणी श्रद्धा वालकर हिच्याबाबतीत घडलेली घटना ही अमानुष कृत्यात समावेश करावा अशीच असल्याचे मत वसईतील साहित्य वर्तुळात व्यक्त होत आहे. अशा गोष्टी व्हायला लागल्या तर ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या तरुणींच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होईल, असे मत वसईतील मराठी ख्रिस्ती साहित्य मंडळाचे अध्यक्ष रेमंड मचाडो यांनी व्यक्त केले.

ते म्हणाले की, ज्या मुली पालकांना आव्हान देऊन निघून जातात, त्यांच्याबाबतीत पालकांना दोष देता येत नाही. श्रद्धाचे पालक तिला थांबवायला गेले होते. मात्र, ती त्या तरुणाच्या प्रेमात वेडी झालेली असल्याने तिने पालकांचे घर सोडले होते. मात्र, श्रद्धाच्या बाबतीत घडलेल्या घटनेनंतर समाज खडबडून जागा झाला आहे. एवढ्या अमानुषपणे आजवर वसईत तरी घटना घडलेली नव्हती. दुसरीकडे अशा घटनांतून धार्मिक तेढ निर्माण होईल, असे काही घडू नये.

माणुसकीला काळिमा कोकण मराठी साहित्य परिषदेचे पालघर जिल्हा अध्यक्ष प्रवीण दवणे म्हणाले की, ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. सुशिक्षित आणि वयात आलेल्या मुलींनी आपला मित्र-प्रियकर निवडताना त्याचे विचार, त्याचे आचार, त्याची घरची स्थिती पाहून निर्णय घेणे आवश्यक आहे.

घरातून फारकत घेणे चुकीचे -डिंपल प्रकाशनचे प्रकाशक अशोक मुळे म्हणाले की, ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मधील श्रद्धा वालकरचा हा प्रकार धक्कादायक आणि माणुसकीला काळिमा फासणारा आहे. इतके अमानुष असे कुणीच वागू शकत नाही, वागूही नये. सध्या  तरुण-तरुणी स्वतंत्र विचारांचे असतात. स्व-कर्तृत्वाचा एक वेगळाच उन्माद त्यात जाणवतो. पण मैत्री करताना, प्रेमात असताना हे भान विसरून घरातून फारकत घेणे चुकीचे आहे. ते नाते टिकले असते तर... हा जर-तरचा प्रश्न असला तरी कुठेतरी संवाद साधायला हवा होता. असे कृत्य करणाऱ्या या कूकर्म्यास तातडीने फाशी द्यायला हवी.

‘श्रद्धा स्वत:बाबत निर्णय घेऊ शकली नाही’ -ग्रंथप्रेमी प्रकाश जाधव म्हणाले की, श्रद्धाच्या बाबतीत घडलेली घटना पुन्हा घडता कामा नये यासाठी संस्कार जपणे आवश्यक आहे. लहानपणापासूनच मुलांवर चांगले संस्कार होणे आवश्यक आहे. नवीन पिढीला संस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घ्यायला आवडत नाही. त्यामुळे त्यांचे प्रबोधन होत नाही. रूढी, परंपरा जपल्या पाहिजेत. आंतरजातीय विवाह करण्यास विरोध असण्याचे कारण नाही, पण विचार करून असे विवाह व्हायला हवेत. दोन वर्षे श्रद्धा त्याच्याबरोबर राहत होती. ती शिकलेली होती. तरीही तिला स्वत:बाबत निर्णय घेता आला नाही, हे दुर्दैव आहे.

टॅग्स :Shraddha Walker Murder Caseश्रद्धा वालकरCrime Newsगुन्हेगारीVasai Virarवसई विरारPoliceपोलिस