शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
4
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
5
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
6
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
7
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
8
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
9
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
10
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
11
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
12
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
13
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
14
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
15
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
16
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
17
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
18
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
19
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
20
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

सावधान ! दिवाळीनंतर 30 टक्के लोकांना श्वसनविकार - श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. संगीता चेकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2017 16:36 IST

फटाक्यांमध्ये तांबे व कॅडमियमसारखी विषारी संयुगे असतात. जी हवेत धूळ स्वरूपात बराच काळ राहतात. त्यामुळे दिवाळीनंतर श्वसनाचे व अस्थमाच्या पेशंटमध्ये कमालीची वाढ होते. यावरून या सणानंतर सुमारे 30 ते 40 टक्के लोकांना श्वसनाचा विकार होत असल्याचे मीरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटलच्या श्वसनविकारतज्ज्ञ  डॉ. संगीता चेकर यांनी सांगितले. 

राजू काळे/ भाईंदर - फटाक्यांमध्ये तांबे व कॅडमियमसारखी विषारी संयुगे असतात. जी हवेत धूळ स्वरूपात बराच काळ राहतात. त्यामुळे दिवाळीनंतर श्वसनाचे व अस्थमाच्या पेशंटमध्ये कमालीची वाढ होते. यावरून या सणानंतर सुमारे 30 ते 40 टक्के लोकांना श्वसनाचा विकार होत असल्याचे मीरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटलच्या श्वसनविकारतज्ज्ञ  डॉ. संगीता चेकर यांनी सांगितले.  दिवाळीच्या तोंडावर सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली एनसीआरमध्ये फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घातली होती व त्यांनतर महाराष्ट्रातसुद्धा निवासी संकुलामध्ये फटाके विक्रीला न्यायालयाने बंदी घातली असली तरीही लक्ष्मी पूजनाच्या व पाडव्याच्या  आतषबाजीनंतर मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यातील वायू प्रदूषणात मोठी भर पडली आहे. या महानगरांमधील हवेची गुणवत्ता अत्यंत वाईट पातळीपर्यंत घसरली आहे. दिल्लीमध्ये गेल्यावर्षी दिवाळीच्या काळात फटाक्यांच्या धुराची एवढी गडद चादर पसरली की तेथील शाळांना सुटी देणे भाग झाले होते. ही आठवण आज मुंबई व लगतच्या उपनगरातील जनता विसरल्याचे दिसत होते. फटाके फोडल्यानंतर त्यातून सल्फर डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड आणि नायट्रेस गॅसेस बाहेर पडतात. ज्याचा सर्वाधिक त्रास अस्थमा, श्वसनाचा आजार आजार असणाऱ्या रूग्णांना होतो. मुंबईत तर दिवाळीच्या दिवसांत ३० ते ४० टक्के नवे रूग्ण असे येतात की ज्यांना पूर्वी कधीही अस्थमा किंवा श्वसनचा त्रास नव्हता. या दिवसांत रूग्णांची संख्या तीनपट अधिक असते. लहान मुलांची फुफ्फुसे छोटी असल्यानं त्यांना फटाक्यांचा धुराचा अधिक त्रास होतो. याविषयी अधिक माहिती देताना डॉ. संगीता चेकर यांनी सांगितले कि, फटाक्यांमध्ये तांबे व कॅडमियमसारखी विषारी संयुगे असतात. 

जी हवेत धूळ स्वरूपात बराच काळ राहतात. त्यामुळे दिवाळीनंतर श्वसनाचे व अस्थमाच्या पेशंटमध्ये कमालीची  वाढ होते. मुंबई, नवी मुंबई व ठाणे या शहरांचा विचार करता काळाच्या ओघात चाळ संस्कृती नष्ट झाली आहे. उंचचउंच टॉवर संस्कृती उदयास आली असून या उंच इमारतींमध्ये राहणाऱ्यांना फटाक्यांच्या धुराचा अधिक त्रास होतो. कारण फटाक्यांमुळे हवेत सोडले जाणारे सल्फर नायट्रेट, मॅग्नेशियम, नायट्रोजन डायोक्साईड आदी घटक हवेमध्ये सहजासहजी मिसळत नसून त्याचा थर हा जमिनीपासून ५०० ते हजार फुटावर तरंगत राहतो.

त्यामुळे या टॉवरमध्ये राहणाऱ्या वृद्ध व्यक्ती तसेच लहान मुलांना श्वसनविकाराचा अधिक त्रास होतो. तसेच अस्थमाचा अटॅक, ब्रॉकायटिस, शिंका येणे,नाक गळणे, डोकेदुखी असे विकारही वाढीस लागतात. केंद्र सरकारच्या 'सफर' या वायू प्रदूषण मोजणाऱ्या संस्थेच्या या वर्षीच्या अहवालानुसार मुंबई, पुणे, नवी मुंबई या शहरांचे प्रदूषण कमालीचे वाढले असून प्रदूषित वायूंची तसेच 'पर्टिक्युलेट मॅटर' म्हणजेच घनरूप दूषित कणांची उपस्थिती धोक्याच्या पातळीवर दाखविली गेली आहे. 

'सफर'च्या माहितीनुसार, मुंबईतील मालाड भागात शहरातील सर्वाधिक वायू प्रदूषण आहे. या उपनगरातील हवेचा दर्जा केवळ खालवलाच नसून घातक पातळीपर्यंत पोहोचला आहे. आधीच वायूप्रदूषण अधिक असलेल्या मुंबईत दिवाळीच्या दिवसांत अस्थमा रूग्णांना राहणं मुश्किल होते. त्यामुळं अशा रूग्णांना दिवाळीमध्ये मुंबई बाहेर राहण्याचा सल्ला डॉ संगीता यांनी दिला आहे.   

टॅग्स :diwaliदिवाळीpollutionप्रदूषणDeepotsav 2017दीपोत्सव 2017