शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

सावधान ! दिवाळीनंतर 30 टक्के लोकांना श्वसनविकार - श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. संगीता चेकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2017 16:36 IST

फटाक्यांमध्ये तांबे व कॅडमियमसारखी विषारी संयुगे असतात. जी हवेत धूळ स्वरूपात बराच काळ राहतात. त्यामुळे दिवाळीनंतर श्वसनाचे व अस्थमाच्या पेशंटमध्ये कमालीची वाढ होते. यावरून या सणानंतर सुमारे 30 ते 40 टक्के लोकांना श्वसनाचा विकार होत असल्याचे मीरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटलच्या श्वसनविकारतज्ज्ञ  डॉ. संगीता चेकर यांनी सांगितले. 

राजू काळे/ भाईंदर - फटाक्यांमध्ये तांबे व कॅडमियमसारखी विषारी संयुगे असतात. जी हवेत धूळ स्वरूपात बराच काळ राहतात. त्यामुळे दिवाळीनंतर श्वसनाचे व अस्थमाच्या पेशंटमध्ये कमालीची वाढ होते. यावरून या सणानंतर सुमारे 30 ते 40 टक्के लोकांना श्वसनाचा विकार होत असल्याचे मीरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटलच्या श्वसनविकारतज्ज्ञ  डॉ. संगीता चेकर यांनी सांगितले.  दिवाळीच्या तोंडावर सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली एनसीआरमध्ये फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घातली होती व त्यांनतर महाराष्ट्रातसुद्धा निवासी संकुलामध्ये फटाके विक्रीला न्यायालयाने बंदी घातली असली तरीही लक्ष्मी पूजनाच्या व पाडव्याच्या  आतषबाजीनंतर मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यातील वायू प्रदूषणात मोठी भर पडली आहे. या महानगरांमधील हवेची गुणवत्ता अत्यंत वाईट पातळीपर्यंत घसरली आहे. दिल्लीमध्ये गेल्यावर्षी दिवाळीच्या काळात फटाक्यांच्या धुराची एवढी गडद चादर पसरली की तेथील शाळांना सुटी देणे भाग झाले होते. ही आठवण आज मुंबई व लगतच्या उपनगरातील जनता विसरल्याचे दिसत होते. फटाके फोडल्यानंतर त्यातून सल्फर डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड आणि नायट्रेस गॅसेस बाहेर पडतात. ज्याचा सर्वाधिक त्रास अस्थमा, श्वसनाचा आजार आजार असणाऱ्या रूग्णांना होतो. मुंबईत तर दिवाळीच्या दिवसांत ३० ते ४० टक्के नवे रूग्ण असे येतात की ज्यांना पूर्वी कधीही अस्थमा किंवा श्वसनचा त्रास नव्हता. या दिवसांत रूग्णांची संख्या तीनपट अधिक असते. लहान मुलांची फुफ्फुसे छोटी असल्यानं त्यांना फटाक्यांचा धुराचा अधिक त्रास होतो. याविषयी अधिक माहिती देताना डॉ. संगीता चेकर यांनी सांगितले कि, फटाक्यांमध्ये तांबे व कॅडमियमसारखी विषारी संयुगे असतात. 

जी हवेत धूळ स्वरूपात बराच काळ राहतात. त्यामुळे दिवाळीनंतर श्वसनाचे व अस्थमाच्या पेशंटमध्ये कमालीची  वाढ होते. मुंबई, नवी मुंबई व ठाणे या शहरांचा विचार करता काळाच्या ओघात चाळ संस्कृती नष्ट झाली आहे. उंचचउंच टॉवर संस्कृती उदयास आली असून या उंच इमारतींमध्ये राहणाऱ्यांना फटाक्यांच्या धुराचा अधिक त्रास होतो. कारण फटाक्यांमुळे हवेत सोडले जाणारे सल्फर नायट्रेट, मॅग्नेशियम, नायट्रोजन डायोक्साईड आदी घटक हवेमध्ये सहजासहजी मिसळत नसून त्याचा थर हा जमिनीपासून ५०० ते हजार फुटावर तरंगत राहतो.

त्यामुळे या टॉवरमध्ये राहणाऱ्या वृद्ध व्यक्ती तसेच लहान मुलांना श्वसनविकाराचा अधिक त्रास होतो. तसेच अस्थमाचा अटॅक, ब्रॉकायटिस, शिंका येणे,नाक गळणे, डोकेदुखी असे विकारही वाढीस लागतात. केंद्र सरकारच्या 'सफर' या वायू प्रदूषण मोजणाऱ्या संस्थेच्या या वर्षीच्या अहवालानुसार मुंबई, पुणे, नवी मुंबई या शहरांचे प्रदूषण कमालीचे वाढले असून प्रदूषित वायूंची तसेच 'पर्टिक्युलेट मॅटर' म्हणजेच घनरूप दूषित कणांची उपस्थिती धोक्याच्या पातळीवर दाखविली गेली आहे. 

'सफर'च्या माहितीनुसार, मुंबईतील मालाड भागात शहरातील सर्वाधिक वायू प्रदूषण आहे. या उपनगरातील हवेचा दर्जा केवळ खालवलाच नसून घातक पातळीपर्यंत पोहोचला आहे. आधीच वायूप्रदूषण अधिक असलेल्या मुंबईत दिवाळीच्या दिवसांत अस्थमा रूग्णांना राहणं मुश्किल होते. त्यामुळं अशा रूग्णांना दिवाळीमध्ये मुंबई बाहेर राहण्याचा सल्ला डॉ संगीता यांनी दिला आहे.   

टॅग्स :diwaliदिवाळीpollutionप्रदूषणDeepotsav 2017दीपोत्सव 2017