शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

मराठा आरक्षणाची लढाई सर्वोच्च न्यायालयातही जिंकूच - अशोक चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 02:07 IST

Maratha reservation : साष्टपिंपळगाव येथे आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचे आंदोलन गेल्या २७ दिवसांपासून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी मंगळवारी या आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.

शहागड (जि. जालना) : मराठा समाजाच्या आरक्षणासाठीची लढाई ही आता रस्त्यावरील लढाई राहिली नसून, ती आता सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. तेथेदेखील आपण मराठा समाजाची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी निष्णात आणि ज्येष्ठ विधिज्ञांची नियुक्ती केली आहे. सरकार मराठा समाजाच्या हितासाठी कटिबद्ध असून, विराेधक या मुद्द्याचे राजकारण करून त्यांची पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत; परंतु समाजाने त्याकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी साष्टपिंपळगाव येथे बोलताना केले.साष्टपिंपळगाव येथे आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचे आंदोलन गेल्या २७ दिवसांपासून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी मंगळवारी या आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.अनेक राज्यांतील आरक्षण हे ५० टक्क्यांपेक्षा अधिक झाले आहे, त्यांना स्थगिती दिली नाही. परंतु मराठा समाजाचा मुद्दा आल्यावरच स्थगिती का दिली हे समजू शकणारे नसल्याचेही चव्हाण म्हणाले. यासाठी त्यांनी हरियाणा, तामिळनाडू या राज्यांचे उदाहरण दिले. मराठा समाजातील युवकांना अडचण ठरू नये म्हणून राज्य सरकारने विशेष बाब म्हणून त्यांना नियुक्ती देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. विशेष म्हणजे ऊर्जा विभागासाठीचे जे निकष आहेत, ते सर्व विभागातील नोकरभरतीसाठी लागू करण्यात येणार असल्याचे चव्हाण म्हणाले.साष्टपिंपळगाव येथील ग्रामस्थांचे आंदोलन समाजाचा घटक म्हणून निश्चितच प्रेरणादायी आहे असे सांगून, आपल्या सर्व मागण्यांवर मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे आश्वासन दिले. त्यामुळे हे आंदोलन आता मागे घ्यावे, अशी विनंतीदेखील त्यांनी केली.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणMaratha Reservationमराठा आरक्षण