शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

एका दिवसात घडतो बाप्पा!

By admin | Updated: August 17, 2016 22:09 IST

कोकणवासियांचा लाडका उत्सव म्हणजे गणेशोत्सव. गणेशोत्सवाची चाहुल लागली की दोन-तीन महिने आधी गणेशमूर्तींच्या कामांना प्रारंभ होतो.

अरुण आडिवरेकर /ऑनलाइन लोकमत

रत्नागिरी, दि. 17 - कोकणवासियांचा लाडका उत्सव म्हणजे गणेशोत्सव. गणेशोत्सवाची चाहुल लागली की दोन-तीन महिने आधी गणेशमूर्तींच्या कामांना प्रारंभ होतो. मात्र रत्नागिरीत आजही एका दिवसात गणेशमूर्ती तयार करण्याची परंपरा जपली जाते. विशेष म्हणजे या मूर्तीचे रंगकामदेखील एका दिवसातच होते. एका दिवसात घडणाऱ्या या गणपतीची ख्याती ह्यलाल गणपतीह्ण म्हणून परिचित आहे आणि नवसाला पावणारा, अशी त्याची मुख्य ओळख आहे.पेशवेकालीन असलेला हा गणपती तेली आळीतील शेट्ये कुटुंबियांचा असून सध्या गणपतीचा उत्सव वगैरे सर्व धार्मिक रितीरिवाजाप्रमाणे चालत आलेले कार्य हे केदार उर्फ परी शेट्ये व त्यांचा पुतण्या अनिकेत शेट्ये करतात. हा गणपती खासगी असला तरी तो आता सार्वजनिक वाटेल इतर त्याच्यासमोर येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे.हा गणपती बनविण्याचा मान पूर्वीपासून रामआळीतील पाटणकर कुटुंबियांकडे आहे. हा गणपती नागपंचमीच्या दिवशी एका दिवसात तयार केला जातो. नागपंचमीच्या दिवशी सकाळी ७.३० वाजता शेट्ये कुटुंबिय चौरंग व पाट डोक्यावरुन घेऊन पाटणकरांच्या घरी (पुढील दुकानात) गणपतीच्या स्थानावर घेऊन येतात. तेथे पाटणकर कुटुंबिय रितीरिवाजाप्रमाणे पाटाची पूजाअर्चा करुन गणपती तयार करण्यास सुरुवात करतात. एका दिवसात रात्री १२ वाजायच्या आत ही गणपती मूर्ती पूर्ण झाली पाहिजे, असा रिवाज आहे. साधारणपणे रात्री ९ ते ९.३० वाजेपर्यंत ही मूर्ती पूर्ण होते. ही संपूर्ण मूर्ती पूर्वीपासून पिढ्यान पिढ्या एकाच कुटुंबाकडून तीही संपूर्ण हाती (साचा नाही) पूर्ण करण्याची परंपरा आहे. या मूर्तीत अगदी जुने फोटो जरी आपण पाहिले आणि सध्याची मूर्ती जरी पाहिली तरी कोणताही फरक जाणवत नाही हे खास वैशिष्ट्य आहे.सध्या ही मूर्ती संजय (शिवा) दत्तात्रय पाटणकर हे बनवितात. त्यांच्या आधी त्यांचे वडील दत्तात्रय विठोबा पाटणकर गेले अनेक वर्षे ही मूर्ती बनवत होते. वयोमानानुसार शारीरिक थकव्यामुळे आता ते आपल्या मुलाला मार्गदर्शन करतात. त्यांच्याअगोदर त्यांचे वडील विठोबा बाबीशेठ पाटणकर हे ही मूर्ती अनेक वर्षे बनवत असत. त्याही आधी दत्तात्रय पाटणकर यांचे आजोबा बाबी शेट राघोबा पाटणकर व त्याआधी पणजोबा हे ही मूर्ती तयार करीत असत. जुन्या माहितीप्रमाणे शिवा पाटणकर यांची ही लाल गणपतीची मूर्ती बनविण्याची ५ वी पिढी आहे. ही मूर्ती रंगविण्याचा दिवस ठरलेला आहे. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी मूर्ती रंगविण्यास सुरुवात होते. संध्याकाळी ४ वाजेपर्यंत मूर्ती पूर्ण रंगवून झाल्यावर तिला दागदागिने घालून पूजाअर्चा करुन दर्शनाकरिता तयार ठेवली जाते.दुसऱ्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीला सकाळी रितीरिवाजाप्रमाणे पूजा अर्चा पार पडल्यावर सकाळी ८.३० वाजता शेट्ये कुुटुंबिय यांच्या ताब्यात ही मूर्ती दिली जाते. रथातून सवाद्य वाजत गाजत मिरवणुकीने शेट्ये कुटुंबियांच्या घरी स्थानापन्न केली जाते.थिबा राजाने दिलेला मेणापूर्वी इंग्रजांनी नजरकैदेत ठेवलेला ब्रह्मदेशाचा राजा थिबा राजा आपल्या रत्नागिरीमध्ये अनेक वर्ष होता. हे आपणाला माहीतच आहे. हा थिबा राजा अत्यंत धार्मिक व दानशूर होता. त्या काळात त्याने आपल्या रत्नागिरीमधील व आजूबाजुच्या अनेक मंदिरांमध्ये जशा भेटवस्तू भक्तीभावाने दिल्या. तसेच या गणपतीवरसुद्धा त्यांची खूप श्रद्धा होती. खास गणपतीला घरी आणण्यापासून ते अगदी विसर्जनापर्यंत नेण्यासाठी एक खास मेणा या शेट्ये कुटुंबांना दिला. त्याकाळी अनेक वर्षे हा गणपती थिबा राजाने दिलेल्या मेण्यातून जात असे.