शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

"तेरा घमंड तो चार दिन का है पगले, हमारी बादशाही तो खानदानी है"; संजय राऊतांच्या घराबाहेर बॅनर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 11:58 IST

Sanjay Raut : संजय राऊत यांच्या भांडूप येथील घराबाहेर काही बॅनर लावण्यात आले आहेत. स्थानिक नगरसेविका दिपमाला बढे यांनी हे बॅनर लावले आहेत.

मुंबई - विधान परिषदेच्या निकालानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याचं पाहायला मिळत आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह काही शिवसेना आमदारांनी बंडखोरी केल्यानं पक्षाला धक्का बसला आहे. शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राखेतून जन्म घेण्याची शिवसेनेची ताकद आहे. एकनाथ शिंदेंसोबत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यांनी आम्हाला आणि आम्ही त्यांना सोडण्याची शक्यता नाही. शिवसेनेचे आमदार सध्या गुवाहाटीला जंगल सफारीसाठी गेले आहेत. आमदारांनी देश पाहायला हवा. पर्यटन करायला हवं. ते पर्यटन करुन माघारी परततील, असं म्हटलं आहे. यानंतर आता संजय राऊतांच्या घराबाहेर बॅनर लागलेले पाहायला मिळत आहेत. 

संजय राऊत यांच्या भांडूप येथील घराबाहेर काही बॅनर लावण्यात आले आहेत. स्थानिक नगरसेविका दिपमाला बढे (Deepmala Badhe) यांनी हे बॅनर लावले आहेत. "तेरा घमंड तो चार दिन का है पगले, हमारी बादशाही तो खानदानी है" असा मजकूर लिहण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार टीका केली होती. ''राज्यसभेची एक जागा जिंकली म्हणजे जग जिंकले किंवा महाराष्ट्र जिंकला असं नाही. तुम्ही एक जागा जिंकली, पण या राज्याची सूत्र शिवसेनेकडे, उद्धव ठाकरेंकडेच असतील. फार घमंड करू नका, 'तेरा घमंड चार दिन का है पगले, हमारी बादशाही तो खानदानी है.' या बादशाहीला नख लावण्याची हिंम्मत अजून कोणाचीच नाही, असा इशारा राऊत यांनी यावेळी दिला होता. यानंतर आता तोच धागा पकडत नगरसेविका दिपमाला बढे यांनी संजय राऊतांच्या घराबाहेर बॅनर लावले आहेत. 

संजय राऊत यांनी "आज संपूर्ण देश अग्निवीर योजनेवर बोलतोय. सैन्यामध्ये आता कंत्राटी पद्धतीने सैन्य भरती करणार आहेत. चार वर्षाचे कंत्राट, जगाच्या पाठीवर असा मूर्ख निर्णय कोणत्याच राज्यकर्त्याने घेतला नसेल. तुघलक होता, त्यानेही असा निर्णय कधी घेतला नव्हता. देशाचे रक्षण कोणी करायचे, हे ज्याला कळत नाही, त्यांच्या हातात देशाची सूत्र आहेत. ठेकेदारी पद्धतीने गुलाम नेमले जातात, सैन्य नाही" असंही म्हटलं होतं.

"मोदी सरकारच्या निर्णयामुळे आज देशात अराजकता निर्माण झाली आहे. तरुण मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आला आहे. महाराष्ट्राही खदखदत आहेत, पण राज्याची सूत्र उद्धव ठाकरेंच्या हातात असल्यामुळे महाराष्ट्र शांत आहेत. ही सूत्र शिवसेनेकडे जोपर्यंत असेल, तोपर्यंत राज्य शांत राहणार. काहीजण राज्याला अशांत करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण तुम्हाला ते जमणार नाही,' असा इशाराही त्यांनी दिला होता.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदे