शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
7
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
8
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
9
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
10
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
11
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
12
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
13
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
14
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
15
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
16
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
17
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
18
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
19
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
20
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप

वांद्रे-वरळी सी लिंक मुंबई-दिल्ली महामार्गाला जोडणार; समुद्रात उभारणार ५० हजार कोटींचा पूल : गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2021 11:57 IST

Nitin Gadkari : ५० हजार कोटी रूपयांचा पूल उभारण्याची योजना असल्याची गडकरी यांची माहिती. पायाभूत सुविधांचा विचार करून मुंबईत विकास व्हावा, गडकरी यांचं वक्तव्य.

ठळक मुद्दे५० हजार कोटी रूपयांचा पूल उभारण्याची योजना असल्याची गडकरी यांची माहिती. पायाभूत सुविधांचा विचार करून मुंबईत विकास व्हावा, गडकरी यांचं वक्तव्य.

वांद्रे वरळी सी लिंक दिल्ली-मुंबई महामार्गाला जोडण्याची योजना असल्याची मोठी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. यासाठी ५० हजार कोटी रूपयांचा उड्डाणपूल समुद्रात उभारण्याची योजना असल्याचं गडकरी म्हणाले. 

"वांद्रे वरळी सी लिंक, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, ५५ उड्डाणपूल अशी अनेक कामं केली. त्या काळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, नारायण राणे असे अनेक जण होते. मला वांद्रे वरळी सी लिंक हा वसई विरारच्या पलिकडे नेऊन मुंबई दिल्ली महामार्गाला जोडायचा होता. ती एक गोष्ट राहून गेली. सध्या दिल्ली मुंबई महामार्गाची उभारणी केली जात असून तो जेएनपीटीपर्यंत आहे. १ लाख कोटींचा हा प्रकल्प अशून त्याचं ६० टक्के काम पूर्ण झालं आहे. तोच महामार्ग वांद्रे वरळी सी लिंकपर्यंत पोहोचवण्याचं माझं स्वप्न असून त्यासाठी समुद्रात ५० हजार कोची रूपयांचा खर्चं येणार आहे," अशी माहिती गडकरी यांनी दिली. 

राज्य सरकारशी चर्चा करणार"या संदर्भात महाराष्ट्र सरकारशी चर्चा केली जाणार असून त्यांची परवानगी मिळाल्यानंतरच या उड्डाणपूलाची उभारणी केली जाईल. सध्या त्यावर अभ्यास सुरू असून हा पूल असता तर आज वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहनांची गर्दी झाली नसती," असं त्यांनी नमूद केलं. एबीपी माझाशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी यावर वक्तव्य केलं. वांद्रे वरळी सी लिंक प्रकल्प करून रस्ता वाढवला जाईल. कारण ही मुंबईची लाइफलाइन असल्याचं त्यांनी नमूद केलं. 

मुंबईत विकासासाठी जागा नाही"महाराष्ट्र हे प्रगतीशील आणि समृद्ध राज्य आहे. पायाभूत सुविधांचा विचार करूनच मुंबईचा विकास केला गेला पाहिजे. मुंबईच्या बाजूला समुद्र असल्यामुळे आता जागाच शिल्लक राहिली नाही. नवी मुंबईतही गर्दी धाली आहे. महाराष्ट्रात मुंबईतील उद्योग व्यवसायांचं विकेंद्रीकरण झाल्यास राज्याचा विकास होईल. पुढील २५ वर्षांचा विचार करून सल्ला मसलतीनंतर राज्य सरकारनं डॉक्युमेंट तयार करावं," असं गडकरी म्हणाले. 

टॅग्स :Bandra Worli Sea Linkवांद्रे-वरळी सी लिंकNitin Gadkariनितीन गडकरीMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्रBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेGopinath Mundeगोपीनाथ मुंडेNarayan Raneनारायण राणे