शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
5
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
6
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
7
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
8
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
9
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
10
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
11
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
12
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
13
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
14
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
15
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
16
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
17
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
18
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
19
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
20
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
Daily Top 2Weekly Top 5

वांद्रे-वरळी सी लिंक मुंबई-दिल्ली महामार्गाला जोडणार; समुद्रात उभारणार ५० हजार कोटींचा पूल : गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2021 11:57 IST

Nitin Gadkari : ५० हजार कोटी रूपयांचा पूल उभारण्याची योजना असल्याची गडकरी यांची माहिती. पायाभूत सुविधांचा विचार करून मुंबईत विकास व्हावा, गडकरी यांचं वक्तव्य.

ठळक मुद्दे५० हजार कोटी रूपयांचा पूल उभारण्याची योजना असल्याची गडकरी यांची माहिती. पायाभूत सुविधांचा विचार करून मुंबईत विकास व्हावा, गडकरी यांचं वक्तव्य.

वांद्रे वरळी सी लिंक दिल्ली-मुंबई महामार्गाला जोडण्याची योजना असल्याची मोठी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. यासाठी ५० हजार कोटी रूपयांचा उड्डाणपूल समुद्रात उभारण्याची योजना असल्याचं गडकरी म्हणाले. 

"वांद्रे वरळी सी लिंक, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, ५५ उड्डाणपूल अशी अनेक कामं केली. त्या काळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, नारायण राणे असे अनेक जण होते. मला वांद्रे वरळी सी लिंक हा वसई विरारच्या पलिकडे नेऊन मुंबई दिल्ली महामार्गाला जोडायचा होता. ती एक गोष्ट राहून गेली. सध्या दिल्ली मुंबई महामार्गाची उभारणी केली जात असून तो जेएनपीटीपर्यंत आहे. १ लाख कोटींचा हा प्रकल्प अशून त्याचं ६० टक्के काम पूर्ण झालं आहे. तोच महामार्ग वांद्रे वरळी सी लिंकपर्यंत पोहोचवण्याचं माझं स्वप्न असून त्यासाठी समुद्रात ५० हजार कोची रूपयांचा खर्चं येणार आहे," अशी माहिती गडकरी यांनी दिली. 

राज्य सरकारशी चर्चा करणार"या संदर्भात महाराष्ट्र सरकारशी चर्चा केली जाणार असून त्यांची परवानगी मिळाल्यानंतरच या उड्डाणपूलाची उभारणी केली जाईल. सध्या त्यावर अभ्यास सुरू असून हा पूल असता तर आज वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहनांची गर्दी झाली नसती," असं त्यांनी नमूद केलं. एबीपी माझाशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी यावर वक्तव्य केलं. वांद्रे वरळी सी लिंक प्रकल्प करून रस्ता वाढवला जाईल. कारण ही मुंबईची लाइफलाइन असल्याचं त्यांनी नमूद केलं. 

मुंबईत विकासासाठी जागा नाही"महाराष्ट्र हे प्रगतीशील आणि समृद्ध राज्य आहे. पायाभूत सुविधांचा विचार करूनच मुंबईचा विकास केला गेला पाहिजे. मुंबईच्या बाजूला समुद्र असल्यामुळे आता जागाच शिल्लक राहिली नाही. नवी मुंबईतही गर्दी धाली आहे. महाराष्ट्रात मुंबईतील उद्योग व्यवसायांचं विकेंद्रीकरण झाल्यास राज्याचा विकास होईल. पुढील २५ वर्षांचा विचार करून सल्ला मसलतीनंतर राज्य सरकारनं डॉक्युमेंट तयार करावं," असं गडकरी म्हणाले. 

टॅग्स :Bandra Worli Sea Linkवांद्रे-वरळी सी लिंकNitin Gadkariनितीन गडकरीMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्रBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेGopinath Mundeगोपीनाथ मुंडेNarayan Raneनारायण राणे