शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानातून ऑस्ट्रेलियात कसे पोहोचले सिडनी बीचवर गोळीबार करणारे सैतान? दहशतवादी 'पिता-पुत्रां'संदर्भात अनेक दावे
2
Pune Crime: कोचिंगमध्ये रक्तरंजित संघर्ष! शिक्षक शिकवत असतानाच विद्यार्थ्यांवर हल्ला; एकाचा मृत्यू; हल्ला करणारा विद्यार्थी फरार
3
"खूप गोष्टी आहेत त्या मी बोलू शकत नाही..."; भाजपात प्रवेश करताच तेजस्वी घोसाळकरांनी मांडली व्यथा
4
तत्कालीन CJI ने मोजक्या कर्मचाऱ्यांना दिलं होतं सहा-सहावेळा इन्क्रीमेंट; आता सुप्रीम कोर्टाने निर्णय मागे घेतला
5
"स्वप्नातही विचार केला नव्हता..."; ४ वेळा आमदार राहिलेल्या नितीन नबीन यांना भाजपाचं 'सरप्राइज'
6
बाजाराची नकारात्मक सुरुवात! सेन्सेक्स-निफ्टी लाल निशाणीवर; 'या' समभागांना मोठा फटका
7
Priyanka Gandhi Prashant Kishor: बिहार निकालाने झटका! प्रशांत किशोरांनी अचानक घेतली प्रियंका गांधींची भेट
8
Health Tips: हृदय विकाराच्या 'या' सात सूक्ष्म संकेतांकडे दुर्लक्ष करू नका, वेळीच करा उपाय!
9
जीएसटी कपातीचा आनंद संपल्यात जमा...! नवीन वर्षात ‘महागाईचा झटका’! टीव्ही, कार, स्मार्टफोनच्या किंमती १० टक्क्यांनी वाढणार
10
Kandivali Crime: कांदिवलीत गुंडांचा माज! कॉलर पकडली, वर्दी खेचत पोलिसांना मारहाण; कशामुळे झाला राडा?
11
सिडनी हल्ल्याला नवं वळण, पाकिस्तानी कनेक्शन आलं समोर; दहशतवादी बाप-लेकानं मिळून केला गोळीबार
12
'धुरंधर' अक्षय खन्नाच्या सावत्र आईची प्रतिक्रिया; म्हणाली, "मी कधीच त्याची आई झाले नाही कारण..."
13
काऊंटडाऊन सुरू, उरले १०३ दिवस! वैभव सुर्यवंशीला टीम इंडियात येण्यापासून कोणी रोखू शकणार नाही... कसे...
14
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
15
"वेदनेतून घेतलेला निर्णय, तुमच्या विश्वासाला..."; तेजस्वी घोसाळकरांचं शिवसैनिकांना भावनिक पत्र
16
आज एक चमकणारी एसयुव्ही लाँच होणार; इंटरनेट कनेक्टेड, मोठी टचस्क्रीन सह बरेच काही मिळणार...
17
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
18
Viral Video: लग्नाआधी तरुणी एक्स बॉयफ्रेंडला जाऊन भेटली, व्हिडीओ सोशल मीडिया तुफान व्हायरल; पण गोष्ट खरी आहे का?
19
'धुरंधर'मधील व्हायरल गाण्यावर शाहरुखनेही केला डान्स? Video व्हायरल; किंग खानचे 'जबरा फॅन' म्हणाले...
20
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
Daily Top 2Weekly Top 5

काही घटना आणि त्यामागचे ‘बावटे’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2020 07:32 IST

सगळ्या घटनांच्या यादीच्या श्रृंखलेत बांद्रा, पालघरचे रंग गडद का होतात? या घटनांनी डावेच पारडे कसे भरते? यांचे धागेदोरे एकमेकांमध्ये कसे? या घटनांमध्ये एकसमान धागा, समान घोषणा, माणसे आणि एकच समान निशाण कसे?

- अ‍ॅड. आशिष शेलार, आमदार, माजी शालेय शिक्षणमंत्रीकाही छोट्या घटना आजूबाजूला घडतात, त्याची यादी केली की, त्या सर्व घटनांचे धागेदोरे एकमेकांमध्ये गुंतलेले दिसतात. माझ्या मतदारसंघातील एका घटनेची उकल आपल्यापुरती करता यावी म्हणून मी गेल्या काही दिवसांतील काही घटनांची नोंद एकामागोमाग केल्यावर काही शंकांचे उभे, आडवे, डावे धागे मनात निर्माण झाले, ते मी मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याचाच हा अक्षरप्रपंच.. अर्थात पोलिसांचे काम पोलीस करतीलच.माझ्या मतदारसंघातील बांद्रा रेल्वे स्टेशन परिसरात मागील आठवड्यात अचानक हजारो मजुरांचा जमाव टाळेबंदीत जमा झाला. पोलिसांसोबत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. बांधकाम, नाका कामगारांचा जमाव भुकेचा गोळा पोटात घेऊन रस्त्यावर आला, ही बाब सरकारच्या नंतर निदर्शनास आलीच.मी त्यानंतर काही जणांशी त्यापैकी संवाद साधला. त्यावेळी मला मुंबई बांधकाम आणि नाका कामगार युनियन (सीआयटीयू संलग्न) या संघटनेचे पदाधिकारी भेटले. त्यांनी त्यापूर्वी दोनच दिवसांपूर्वी याच परिसरात निदर्शने केली; पण सरकारकडून दखल घेतली गेली नाही, त्यामुळे पुन्हा ते मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर आले. म्हणजे स्वयंप्रेरणेने हा जमाव आला नव्हता.हा परिसर प्रचंड दाटीवाटीचा. चार-पाच मजली अनधिकृत झोपड्या असून, मजूर कामगार वस्तीचा आहे. डॉ. मोंटेरियो महाराष्ट्र सचिव असलेल्या सीआयटीयूशी संलग्न कामगार युनियनने नियोजनबद्ध त्यांना रस्त्यावर उतरविले. जानेवारीमध्ये ज्या कामगार संघटनांनी भारतबंद पुकारला, त्यातील ही एक संघटना ‘सीआयटीयू...’

या घटनेच्या दिवशी सकाळी भीमा- कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी असलेल्या डॉ. आनंद तेलतुंबडे आणि गौतम नवलखा यांनी ‘एनआयए’कडे आत्मसमर्पण केले. या दोन घटनांचा एकमेकांशी काही संबंध असू शकतो का? कदाचित नसेलही किंवा असेलही... जर असेल तर मग या घटनेचा ‘एल्गार’ बराच दूरपर्यंत असू शकतो. त्यानंतर ‘सीपीएम’च्या मतदारसंघातील कासा या भागात १६ एप्रिलला रात्री साधूंना जमावाने ठेचूनमारले. या दुर्दैवी घटनेचे राजकारण करू नका, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले ते मान्य; पण अटक केलेले कार्यकर्ते कुठल्या पक्षाचे? बांद्रा किंवा पालघर या घटनांमध्ये वरवर दिसणाऱ्या कामगार, मजूर, आदिवासी या भयभीत चेहऱ्यावरूनच फक्त या घटनांची उकल होणार की, त्यांच्या डोक्यात जाळ पेटविणाऱ्यांपर्यंत पोहोचणार? घटनांच्या मास्टरमाईंडपर्यंत पोलीस पोहोचणार का? पोहोचले तर मग राज्य शासन त्यामागचे खरे चेहरे समोर आणणार का? तसं हे सरकार करणार नाही, अशी आम्हाला भीती आहे. म्हणून या दुर्दैवी घटनांबाबत बोलावं लागतं. अशा घटनांबाबत राज्य सरकारची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आहे.
‘एल्गार’चा तपास एनआयएकडे सोपविताना काय घडले? ‘भारत तेरे तुकडे हो हजार’ कोण म्हणाले? त्या देशविरोधींचे रक्षणकर्ते कोण? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यापासून जेएनयू, एल्गार परिषद व्हाया बांद्रा ते पालघर.. सगळ्या घटनांची तारखेनुसार यादी केली, तर पांढऱ्या कागदाचा ‘लाल बावटा’ कसा होतो? शर्जिल इमाम काय म्हणत होता...? उर्वशी चुडावालाच्या नेतृत्वात काय घोषणा दिल्या? गेट वे ऑफ इंडियाच्या आंदोलनात महाराष्ट्रातील कॅबिनेट मंत्री कसे? ‘आझाद काश्मीरचा’ नारा देणारी मेहक प्रभू कोण? या आंदोलनाला अन्न-पाणी पुरविणाऱ्या गाड्यांवर राष्ट्रवादीच्या घड्याळाची टीकटीक कशी? यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये कुठल्या बावट्याची तरुणाई कुणी बोलावली? उमर खालीद मुंबईत काय गेट ऑफ इंडियाला फिरायला आला का? त्याच्या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील मंत्री काय त्याला वडापाव घेऊन गेले का? कन्हैया कुमारने मुंबईत कुठला बावटा फडकविला? हार्दिक पटेलने कुणाचा प्रचार केला?
अशा प्रश्नांची उत्तरे राज्य सरकारला द्यायची नसावीत. म्हणून बांद्र्यातील घटनेमागचा ‘बावटा’ उघड होईल का? अशी भीती वाटते. या शक्तींचे स्लिपर सेलचे धागेदोरे गडचिरोलीचे जंगल ते कासा, पालघरपर्यंत आहेत की काय?, गृहमंत्री असताना गोपीनाथराव मुंडे यांनी मुंबईतील अंडरवर्ल्ड संपविले, तर देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीने पोसलेले शहरी नक्षलवादी समोर आणले.बांद्र्यातील घटनेनंतर अशा घटना कागदावर उतरवू लागलो, तर यादी वाढतच गेली. देशातील गेल्या सहा वर्षांतील भली मोठी यादी तयार झाली. जेएनयूमध्ये त्याचा केंद्रबिंदू, तर कधी फिल्म बोर्डात, कधी पुणे विद्यापीठात अशा सगळ्या घटनांच्या यादीच्या श्रृंखलेत बांद्रा, पालघरचे रंग गडद का होतात? या घटनांनी डावेच पारडे कसे भरते? यांचे धागेदोरे एकमेकांमध्ये कसे? या घटनांमध्ये एकसमान धागा, समान घोषणा, माणसे आणि एकच समान निशाण कसे? ‘दया कुछ तो गडबड है!’ एनआयएकडे शरणागती पत्करली? त्यानंतर बांद्रा, पालघर.. ‘दया कुछ तो नक्की बडी गडबड है!! अब पोलिस को ही ‘सवाल का दरवाजा’ तोडना पडेगा!!’

टॅग्स :LynchingलीचिंगNCPराष्ट्रवादी काँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरे