शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

काही घटना आणि त्यामागचे ‘बावटे’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2020 07:32 IST

सगळ्या घटनांच्या यादीच्या श्रृंखलेत बांद्रा, पालघरचे रंग गडद का होतात? या घटनांनी डावेच पारडे कसे भरते? यांचे धागेदोरे एकमेकांमध्ये कसे? या घटनांमध्ये एकसमान धागा, समान घोषणा, माणसे आणि एकच समान निशाण कसे?

- अ‍ॅड. आशिष शेलार, आमदार, माजी शालेय शिक्षणमंत्रीकाही छोट्या घटना आजूबाजूला घडतात, त्याची यादी केली की, त्या सर्व घटनांचे धागेदोरे एकमेकांमध्ये गुंतलेले दिसतात. माझ्या मतदारसंघातील एका घटनेची उकल आपल्यापुरती करता यावी म्हणून मी गेल्या काही दिवसांतील काही घटनांची नोंद एकामागोमाग केल्यावर काही शंकांचे उभे, आडवे, डावे धागे मनात निर्माण झाले, ते मी मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याचाच हा अक्षरप्रपंच.. अर्थात पोलिसांचे काम पोलीस करतीलच.माझ्या मतदारसंघातील बांद्रा रेल्वे स्टेशन परिसरात मागील आठवड्यात अचानक हजारो मजुरांचा जमाव टाळेबंदीत जमा झाला. पोलिसांसोबत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. बांधकाम, नाका कामगारांचा जमाव भुकेचा गोळा पोटात घेऊन रस्त्यावर आला, ही बाब सरकारच्या नंतर निदर्शनास आलीच.मी त्यानंतर काही जणांशी त्यापैकी संवाद साधला. त्यावेळी मला मुंबई बांधकाम आणि नाका कामगार युनियन (सीआयटीयू संलग्न) या संघटनेचे पदाधिकारी भेटले. त्यांनी त्यापूर्वी दोनच दिवसांपूर्वी याच परिसरात निदर्शने केली; पण सरकारकडून दखल घेतली गेली नाही, त्यामुळे पुन्हा ते मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर आले. म्हणजे स्वयंप्रेरणेने हा जमाव आला नव्हता.हा परिसर प्रचंड दाटीवाटीचा. चार-पाच मजली अनधिकृत झोपड्या असून, मजूर कामगार वस्तीचा आहे. डॉ. मोंटेरियो महाराष्ट्र सचिव असलेल्या सीआयटीयूशी संलग्न कामगार युनियनने नियोजनबद्ध त्यांना रस्त्यावर उतरविले. जानेवारीमध्ये ज्या कामगार संघटनांनी भारतबंद पुकारला, त्यातील ही एक संघटना ‘सीआयटीयू...’

या घटनेच्या दिवशी सकाळी भीमा- कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी असलेल्या डॉ. आनंद तेलतुंबडे आणि गौतम नवलखा यांनी ‘एनआयए’कडे आत्मसमर्पण केले. या दोन घटनांचा एकमेकांशी काही संबंध असू शकतो का? कदाचित नसेलही किंवा असेलही... जर असेल तर मग या घटनेचा ‘एल्गार’ बराच दूरपर्यंत असू शकतो. त्यानंतर ‘सीपीएम’च्या मतदारसंघातील कासा या भागात १६ एप्रिलला रात्री साधूंना जमावाने ठेचूनमारले. या दुर्दैवी घटनेचे राजकारण करू नका, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले ते मान्य; पण अटक केलेले कार्यकर्ते कुठल्या पक्षाचे? बांद्रा किंवा पालघर या घटनांमध्ये वरवर दिसणाऱ्या कामगार, मजूर, आदिवासी या भयभीत चेहऱ्यावरूनच फक्त या घटनांची उकल होणार की, त्यांच्या डोक्यात जाळ पेटविणाऱ्यांपर्यंत पोहोचणार? घटनांच्या मास्टरमाईंडपर्यंत पोलीस पोहोचणार का? पोहोचले तर मग राज्य शासन त्यामागचे खरे चेहरे समोर आणणार का? तसं हे सरकार करणार नाही, अशी आम्हाला भीती आहे. म्हणून या दुर्दैवी घटनांबाबत बोलावं लागतं. अशा घटनांबाबत राज्य सरकारची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आहे.
‘एल्गार’चा तपास एनआयएकडे सोपविताना काय घडले? ‘भारत तेरे तुकडे हो हजार’ कोण म्हणाले? त्या देशविरोधींचे रक्षणकर्ते कोण? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यापासून जेएनयू, एल्गार परिषद व्हाया बांद्रा ते पालघर.. सगळ्या घटनांची तारखेनुसार यादी केली, तर पांढऱ्या कागदाचा ‘लाल बावटा’ कसा होतो? शर्जिल इमाम काय म्हणत होता...? उर्वशी चुडावालाच्या नेतृत्वात काय घोषणा दिल्या? गेट वे ऑफ इंडियाच्या आंदोलनात महाराष्ट्रातील कॅबिनेट मंत्री कसे? ‘आझाद काश्मीरचा’ नारा देणारी मेहक प्रभू कोण? या आंदोलनाला अन्न-पाणी पुरविणाऱ्या गाड्यांवर राष्ट्रवादीच्या घड्याळाची टीकटीक कशी? यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये कुठल्या बावट्याची तरुणाई कुणी बोलावली? उमर खालीद मुंबईत काय गेट ऑफ इंडियाला फिरायला आला का? त्याच्या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील मंत्री काय त्याला वडापाव घेऊन गेले का? कन्हैया कुमारने मुंबईत कुठला बावटा फडकविला? हार्दिक पटेलने कुणाचा प्रचार केला?
अशा प्रश्नांची उत्तरे राज्य सरकारला द्यायची नसावीत. म्हणून बांद्र्यातील घटनेमागचा ‘बावटा’ उघड होईल का? अशी भीती वाटते. या शक्तींचे स्लिपर सेलचे धागेदोरे गडचिरोलीचे जंगल ते कासा, पालघरपर्यंत आहेत की काय?, गृहमंत्री असताना गोपीनाथराव मुंडे यांनी मुंबईतील अंडरवर्ल्ड संपविले, तर देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीने पोसलेले शहरी नक्षलवादी समोर आणले.बांद्र्यातील घटनेनंतर अशा घटना कागदावर उतरवू लागलो, तर यादी वाढतच गेली. देशातील गेल्या सहा वर्षांतील भली मोठी यादी तयार झाली. जेएनयूमध्ये त्याचा केंद्रबिंदू, तर कधी फिल्म बोर्डात, कधी पुणे विद्यापीठात अशा सगळ्या घटनांच्या यादीच्या श्रृंखलेत बांद्रा, पालघरचे रंग गडद का होतात? या घटनांनी डावेच पारडे कसे भरते? यांचे धागेदोरे एकमेकांमध्ये कसे? या घटनांमध्ये एकसमान धागा, समान घोषणा, माणसे आणि एकच समान निशाण कसे? ‘दया कुछ तो गडबड है!’ एनआयएकडे शरणागती पत्करली? त्यानंतर बांद्रा, पालघर.. ‘दया कुछ तो नक्की बडी गडबड है!! अब पोलिस को ही ‘सवाल का दरवाजा’ तोडना पडेगा!!’

टॅग्स :LynchingलीचिंगNCPराष्ट्रवादी काँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरे