शहरं
Join us  
Trending Stories
1
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणीचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला, मृत्यू नेमका कशामुळे?
3
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
4
‘त्यांनी आपल्या २ मुली पळवल्या तर तुम्ही त्यांच्या १० जणीं घेऊन या’, भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान  
5
महागडे मोबाइल अन् मोठे टीव्हीच हवेत; या दिवाळीत 'प्रीमियम' खरेदीचा नवा पॅटर्न समोर
6
कोण आहे रंजना प्रकाश देसाई?; ज्यांना ८ व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदाची मिळाली जबाबदारी
7
रणबीरच्या 'रामायण'मध्ये विवेक ओबेरॉयचीही भूमिका, अभिनेत्याने दान केलं मानधन; म्हणाला...
8
बाजारात मोठी अस्थिरता! सेंसेक्स-निफ्टी सपाट पातळीवर बंद; महिंद्रा-बजाजसह 'हे' शेअर्स आपटले
9
प्रणित मोरे ऐकत नाय! क्रिकेटपटूच्या बहिणीसोबत वाढतेय जवळीक? 'बिग बॉस'च्या घरातील व्हिडीओ पाहून चाहतेही अवाक्
10
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
11
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
12
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
13
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
14
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
15
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
16
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
17
सावधान! 'ही' ५ उपकरणे एक्सटेंशन बोर्डमध्ये लावाल तर होऊ शकतो मोठा स्फोट; जाणून घ्या
18
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
19
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
20
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा

काही घटना आणि त्यामागचे ‘बावटे’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2020 07:32 IST

सगळ्या घटनांच्या यादीच्या श्रृंखलेत बांद्रा, पालघरचे रंग गडद का होतात? या घटनांनी डावेच पारडे कसे भरते? यांचे धागेदोरे एकमेकांमध्ये कसे? या घटनांमध्ये एकसमान धागा, समान घोषणा, माणसे आणि एकच समान निशाण कसे?

- अ‍ॅड. आशिष शेलार, आमदार, माजी शालेय शिक्षणमंत्रीकाही छोट्या घटना आजूबाजूला घडतात, त्याची यादी केली की, त्या सर्व घटनांचे धागेदोरे एकमेकांमध्ये गुंतलेले दिसतात. माझ्या मतदारसंघातील एका घटनेची उकल आपल्यापुरती करता यावी म्हणून मी गेल्या काही दिवसांतील काही घटनांची नोंद एकामागोमाग केल्यावर काही शंकांचे उभे, आडवे, डावे धागे मनात निर्माण झाले, ते मी मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याचाच हा अक्षरप्रपंच.. अर्थात पोलिसांचे काम पोलीस करतीलच.माझ्या मतदारसंघातील बांद्रा रेल्वे स्टेशन परिसरात मागील आठवड्यात अचानक हजारो मजुरांचा जमाव टाळेबंदीत जमा झाला. पोलिसांसोबत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. बांधकाम, नाका कामगारांचा जमाव भुकेचा गोळा पोटात घेऊन रस्त्यावर आला, ही बाब सरकारच्या नंतर निदर्शनास आलीच.मी त्यानंतर काही जणांशी त्यापैकी संवाद साधला. त्यावेळी मला मुंबई बांधकाम आणि नाका कामगार युनियन (सीआयटीयू संलग्न) या संघटनेचे पदाधिकारी भेटले. त्यांनी त्यापूर्वी दोनच दिवसांपूर्वी याच परिसरात निदर्शने केली; पण सरकारकडून दखल घेतली गेली नाही, त्यामुळे पुन्हा ते मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर आले. म्हणजे स्वयंप्रेरणेने हा जमाव आला नव्हता.हा परिसर प्रचंड दाटीवाटीचा. चार-पाच मजली अनधिकृत झोपड्या असून, मजूर कामगार वस्तीचा आहे. डॉ. मोंटेरियो महाराष्ट्र सचिव असलेल्या सीआयटीयूशी संलग्न कामगार युनियनने नियोजनबद्ध त्यांना रस्त्यावर उतरविले. जानेवारीमध्ये ज्या कामगार संघटनांनी भारतबंद पुकारला, त्यातील ही एक संघटना ‘सीआयटीयू...’

या घटनेच्या दिवशी सकाळी भीमा- कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी असलेल्या डॉ. आनंद तेलतुंबडे आणि गौतम नवलखा यांनी ‘एनआयए’कडे आत्मसमर्पण केले. या दोन घटनांचा एकमेकांशी काही संबंध असू शकतो का? कदाचित नसेलही किंवा असेलही... जर असेल तर मग या घटनेचा ‘एल्गार’ बराच दूरपर्यंत असू शकतो. त्यानंतर ‘सीपीएम’च्या मतदारसंघातील कासा या भागात १६ एप्रिलला रात्री साधूंना जमावाने ठेचूनमारले. या दुर्दैवी घटनेचे राजकारण करू नका, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले ते मान्य; पण अटक केलेले कार्यकर्ते कुठल्या पक्षाचे? बांद्रा किंवा पालघर या घटनांमध्ये वरवर दिसणाऱ्या कामगार, मजूर, आदिवासी या भयभीत चेहऱ्यावरूनच फक्त या घटनांची उकल होणार की, त्यांच्या डोक्यात जाळ पेटविणाऱ्यांपर्यंत पोहोचणार? घटनांच्या मास्टरमाईंडपर्यंत पोलीस पोहोचणार का? पोहोचले तर मग राज्य शासन त्यामागचे खरे चेहरे समोर आणणार का? तसं हे सरकार करणार नाही, अशी आम्हाला भीती आहे. म्हणून या दुर्दैवी घटनांबाबत बोलावं लागतं. अशा घटनांबाबत राज्य सरकारची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आहे.
‘एल्गार’चा तपास एनआयएकडे सोपविताना काय घडले? ‘भारत तेरे तुकडे हो हजार’ कोण म्हणाले? त्या देशविरोधींचे रक्षणकर्ते कोण? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यापासून जेएनयू, एल्गार परिषद व्हाया बांद्रा ते पालघर.. सगळ्या घटनांची तारखेनुसार यादी केली, तर पांढऱ्या कागदाचा ‘लाल बावटा’ कसा होतो? शर्जिल इमाम काय म्हणत होता...? उर्वशी चुडावालाच्या नेतृत्वात काय घोषणा दिल्या? गेट वे ऑफ इंडियाच्या आंदोलनात महाराष्ट्रातील कॅबिनेट मंत्री कसे? ‘आझाद काश्मीरचा’ नारा देणारी मेहक प्रभू कोण? या आंदोलनाला अन्न-पाणी पुरविणाऱ्या गाड्यांवर राष्ट्रवादीच्या घड्याळाची टीकटीक कशी? यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये कुठल्या बावट्याची तरुणाई कुणी बोलावली? उमर खालीद मुंबईत काय गेट ऑफ इंडियाला फिरायला आला का? त्याच्या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील मंत्री काय त्याला वडापाव घेऊन गेले का? कन्हैया कुमारने मुंबईत कुठला बावटा फडकविला? हार्दिक पटेलने कुणाचा प्रचार केला?
अशा प्रश्नांची उत्तरे राज्य सरकारला द्यायची नसावीत. म्हणून बांद्र्यातील घटनेमागचा ‘बावटा’ उघड होईल का? अशी भीती वाटते. या शक्तींचे स्लिपर सेलचे धागेदोरे गडचिरोलीचे जंगल ते कासा, पालघरपर्यंत आहेत की काय?, गृहमंत्री असताना गोपीनाथराव मुंडे यांनी मुंबईतील अंडरवर्ल्ड संपविले, तर देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीने पोसलेले शहरी नक्षलवादी समोर आणले.बांद्र्यातील घटनेनंतर अशा घटना कागदावर उतरवू लागलो, तर यादी वाढतच गेली. देशातील गेल्या सहा वर्षांतील भली मोठी यादी तयार झाली. जेएनयूमध्ये त्याचा केंद्रबिंदू, तर कधी फिल्म बोर्डात, कधी पुणे विद्यापीठात अशा सगळ्या घटनांच्या यादीच्या श्रृंखलेत बांद्रा, पालघरचे रंग गडद का होतात? या घटनांनी डावेच पारडे कसे भरते? यांचे धागेदोरे एकमेकांमध्ये कसे? या घटनांमध्ये एकसमान धागा, समान घोषणा, माणसे आणि एकच समान निशाण कसे? ‘दया कुछ तो गडबड है!’ एनआयएकडे शरणागती पत्करली? त्यानंतर बांद्रा, पालघर.. ‘दया कुछ तो नक्की बडी गडबड है!! अब पोलिस को ही ‘सवाल का दरवाजा’ तोडना पडेगा!!’

टॅग्स :LynchingलीचिंगNCPराष्ट्रवादी काँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरे