शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
8
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
9
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
10
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
11
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
12
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
13
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
14
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
15
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
16
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
17
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
18
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
19
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
20
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं

काही घटना आणि त्यामागचे ‘बावटे’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2020 07:32 IST

सगळ्या घटनांच्या यादीच्या श्रृंखलेत बांद्रा, पालघरचे रंग गडद का होतात? या घटनांनी डावेच पारडे कसे भरते? यांचे धागेदोरे एकमेकांमध्ये कसे? या घटनांमध्ये एकसमान धागा, समान घोषणा, माणसे आणि एकच समान निशाण कसे?

- अ‍ॅड. आशिष शेलार, आमदार, माजी शालेय शिक्षणमंत्रीकाही छोट्या घटना आजूबाजूला घडतात, त्याची यादी केली की, त्या सर्व घटनांचे धागेदोरे एकमेकांमध्ये गुंतलेले दिसतात. माझ्या मतदारसंघातील एका घटनेची उकल आपल्यापुरती करता यावी म्हणून मी गेल्या काही दिवसांतील काही घटनांची नोंद एकामागोमाग केल्यावर काही शंकांचे उभे, आडवे, डावे धागे मनात निर्माण झाले, ते मी मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याचाच हा अक्षरप्रपंच.. अर्थात पोलिसांचे काम पोलीस करतीलच.माझ्या मतदारसंघातील बांद्रा रेल्वे स्टेशन परिसरात मागील आठवड्यात अचानक हजारो मजुरांचा जमाव टाळेबंदीत जमा झाला. पोलिसांसोबत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. बांधकाम, नाका कामगारांचा जमाव भुकेचा गोळा पोटात घेऊन रस्त्यावर आला, ही बाब सरकारच्या नंतर निदर्शनास आलीच.मी त्यानंतर काही जणांशी त्यापैकी संवाद साधला. त्यावेळी मला मुंबई बांधकाम आणि नाका कामगार युनियन (सीआयटीयू संलग्न) या संघटनेचे पदाधिकारी भेटले. त्यांनी त्यापूर्वी दोनच दिवसांपूर्वी याच परिसरात निदर्शने केली; पण सरकारकडून दखल घेतली गेली नाही, त्यामुळे पुन्हा ते मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर आले. म्हणजे स्वयंप्रेरणेने हा जमाव आला नव्हता.हा परिसर प्रचंड दाटीवाटीचा. चार-पाच मजली अनधिकृत झोपड्या असून, मजूर कामगार वस्तीचा आहे. डॉ. मोंटेरियो महाराष्ट्र सचिव असलेल्या सीआयटीयूशी संलग्न कामगार युनियनने नियोजनबद्ध त्यांना रस्त्यावर उतरविले. जानेवारीमध्ये ज्या कामगार संघटनांनी भारतबंद पुकारला, त्यातील ही एक संघटना ‘सीआयटीयू...’

या घटनेच्या दिवशी सकाळी भीमा- कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी असलेल्या डॉ. आनंद तेलतुंबडे आणि गौतम नवलखा यांनी ‘एनआयए’कडे आत्मसमर्पण केले. या दोन घटनांचा एकमेकांशी काही संबंध असू शकतो का? कदाचित नसेलही किंवा असेलही... जर असेल तर मग या घटनेचा ‘एल्गार’ बराच दूरपर्यंत असू शकतो. त्यानंतर ‘सीपीएम’च्या मतदारसंघातील कासा या भागात १६ एप्रिलला रात्री साधूंना जमावाने ठेचूनमारले. या दुर्दैवी घटनेचे राजकारण करू नका, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले ते मान्य; पण अटक केलेले कार्यकर्ते कुठल्या पक्षाचे? बांद्रा किंवा पालघर या घटनांमध्ये वरवर दिसणाऱ्या कामगार, मजूर, आदिवासी या भयभीत चेहऱ्यावरूनच फक्त या घटनांची उकल होणार की, त्यांच्या डोक्यात जाळ पेटविणाऱ्यांपर्यंत पोहोचणार? घटनांच्या मास्टरमाईंडपर्यंत पोलीस पोहोचणार का? पोहोचले तर मग राज्य शासन त्यामागचे खरे चेहरे समोर आणणार का? तसं हे सरकार करणार नाही, अशी आम्हाला भीती आहे. म्हणून या दुर्दैवी घटनांबाबत बोलावं लागतं. अशा घटनांबाबत राज्य सरकारची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आहे.
‘एल्गार’चा तपास एनआयएकडे सोपविताना काय घडले? ‘भारत तेरे तुकडे हो हजार’ कोण म्हणाले? त्या देशविरोधींचे रक्षणकर्ते कोण? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यापासून जेएनयू, एल्गार परिषद व्हाया बांद्रा ते पालघर.. सगळ्या घटनांची तारखेनुसार यादी केली, तर पांढऱ्या कागदाचा ‘लाल बावटा’ कसा होतो? शर्जिल इमाम काय म्हणत होता...? उर्वशी चुडावालाच्या नेतृत्वात काय घोषणा दिल्या? गेट वे ऑफ इंडियाच्या आंदोलनात महाराष्ट्रातील कॅबिनेट मंत्री कसे? ‘आझाद काश्मीरचा’ नारा देणारी मेहक प्रभू कोण? या आंदोलनाला अन्न-पाणी पुरविणाऱ्या गाड्यांवर राष्ट्रवादीच्या घड्याळाची टीकटीक कशी? यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये कुठल्या बावट्याची तरुणाई कुणी बोलावली? उमर खालीद मुंबईत काय गेट ऑफ इंडियाला फिरायला आला का? त्याच्या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील मंत्री काय त्याला वडापाव घेऊन गेले का? कन्हैया कुमारने मुंबईत कुठला बावटा फडकविला? हार्दिक पटेलने कुणाचा प्रचार केला?
अशा प्रश्नांची उत्तरे राज्य सरकारला द्यायची नसावीत. म्हणून बांद्र्यातील घटनेमागचा ‘बावटा’ उघड होईल का? अशी भीती वाटते. या शक्तींचे स्लिपर सेलचे धागेदोरे गडचिरोलीचे जंगल ते कासा, पालघरपर्यंत आहेत की काय?, गृहमंत्री असताना गोपीनाथराव मुंडे यांनी मुंबईतील अंडरवर्ल्ड संपविले, तर देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीने पोसलेले शहरी नक्षलवादी समोर आणले.बांद्र्यातील घटनेनंतर अशा घटना कागदावर उतरवू लागलो, तर यादी वाढतच गेली. देशातील गेल्या सहा वर्षांतील भली मोठी यादी तयार झाली. जेएनयूमध्ये त्याचा केंद्रबिंदू, तर कधी फिल्म बोर्डात, कधी पुणे विद्यापीठात अशा सगळ्या घटनांच्या यादीच्या श्रृंखलेत बांद्रा, पालघरचे रंग गडद का होतात? या घटनांनी डावेच पारडे कसे भरते? यांचे धागेदोरे एकमेकांमध्ये कसे? या घटनांमध्ये एकसमान धागा, समान घोषणा, माणसे आणि एकच समान निशाण कसे? ‘दया कुछ तो गडबड है!’ एनआयएकडे शरणागती पत्करली? त्यानंतर बांद्रा, पालघर.. ‘दया कुछ तो नक्की बडी गडबड है!! अब पोलिस को ही ‘सवाल का दरवाजा’ तोडना पडेगा!!’

टॅग्स :LynchingलीचिंगNCPराष्ट्रवादी काँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरे