शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
3
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
4
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
5
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
6
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
7
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
8
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
9
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
10
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
11
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
12
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
13
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
14
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
15
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
16
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
17
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
18
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
19
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
20
प्रतिभा अमेरिकेबाहेर पडते आहे? - वेलकम टू इंडिया!

निमंत्रण पत्रिकांवरील खर्चास हायकोर्टाची मनाई

By admin | Updated: October 23, 2015 01:55 IST

शिर्डी संस्थानाच्या विजयादशमी उत्सवासाठी निमंत्रण पत्रिका पाठवण्याकरिता येणाऱ्या खर्चाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने चाप लावला आहे. निमंत्रण पत्रिका

मुंबई : शिर्डी संस्थानाच्या विजयादशमी उत्सवासाठी निमंत्रण पत्रिका पाठवण्याकरिता येणाऱ्या खर्चाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने चाप लावला आहे. निमंत्रण पत्रिका छपाईसाठी व त्या पोस्ट करण्यासाठी संस्थानाचा निधी वापरण्यास खंडपीठाने मनाई केली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या दोन्हीसाठी येणारा सुमारे १४.९६ लाखांचा खर्च वाचविण्यात येऊ शकतो, असे खंडपीठाने म्हटले.साईबाबा संस्थान ट्रस्टच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी केलेल्या अर्जावर न्या. ए. बी. चौधरी व न्या. आय. के. जैन यांच्या खंडपीठाने वरील आदेश दिला. साईबाबा संस्थानाचा कारभार सांभाळण्यासाठी उच्च न्यायालयाने समिती नेमली असल्याने, या समितीला संस्थानासाठी आवश्यक असलेला खर्च करण्याकरिता उच्च न्यायालयाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.शिर्डीमध्ये विजयादशमीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो. निमंत्रित हे संस्थेचे संरक्षक आहेत. काही संरक्षक गावात, शहरात आणि परदेशात राहतात. त्यांना निमंत्रण पत्रिका पाठवून बोलवण्याची प्रथा आहे, असे संस्थानाचे वकील संजय चौकीदार यांनी खंडपीठाला सांगितले.एसएमएस, एमएमएस, इंटरनेट, पब्लिकेशन्स, व्हॉट्स अ‍ॅप, टेलिव्हीजन यांसारखे तंत्रज्ञान उपलब्ध असताना निमंत्रण पत्रिका पाठवण्याची आवश्यकता नाही. यावर एवढी मोठी रक्कम खर्च करण्यात अर्थ नाही. निश्चितच ही रक्कम वाचवली जाऊ शकते, असे खंडपीठाने म्हटले. ‘भक्तांना अन्य मार्गाचा वापर करून निमंत्रण पाठवण्यात येईल, ही संस्थानाच्या वकिलांची भूमिका योग्य आहे. संस्थानाने भविष्यातही या दोन गोष्टींवर (निमंत्रण पत्रिका छपाई आणि पोस्ट खर्च) खर्च करण्यासाठी अर्ज करू नये,’ असे म्हणत खंडपीठाने अन्य गोष्टींवर पैसे खर्च करण्याची मुभा संस्थानाला दिली. (प्रतिनिधी)