शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

निमंत्रण पत्रिकांवरील खर्चास हायकोर्टाची मनाई

By admin | Updated: October 23, 2015 01:55 IST

शिर्डी संस्थानाच्या विजयादशमी उत्सवासाठी निमंत्रण पत्रिका पाठवण्याकरिता येणाऱ्या खर्चाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने चाप लावला आहे. निमंत्रण पत्रिका

मुंबई : शिर्डी संस्थानाच्या विजयादशमी उत्सवासाठी निमंत्रण पत्रिका पाठवण्याकरिता येणाऱ्या खर्चाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने चाप लावला आहे. निमंत्रण पत्रिका छपाईसाठी व त्या पोस्ट करण्यासाठी संस्थानाचा निधी वापरण्यास खंडपीठाने मनाई केली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या दोन्हीसाठी येणारा सुमारे १४.९६ लाखांचा खर्च वाचविण्यात येऊ शकतो, असे खंडपीठाने म्हटले.साईबाबा संस्थान ट्रस्टच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी केलेल्या अर्जावर न्या. ए. बी. चौधरी व न्या. आय. के. जैन यांच्या खंडपीठाने वरील आदेश दिला. साईबाबा संस्थानाचा कारभार सांभाळण्यासाठी उच्च न्यायालयाने समिती नेमली असल्याने, या समितीला संस्थानासाठी आवश्यक असलेला खर्च करण्याकरिता उच्च न्यायालयाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.शिर्डीमध्ये विजयादशमीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो. निमंत्रित हे संस्थेचे संरक्षक आहेत. काही संरक्षक गावात, शहरात आणि परदेशात राहतात. त्यांना निमंत्रण पत्रिका पाठवून बोलवण्याची प्रथा आहे, असे संस्थानाचे वकील संजय चौकीदार यांनी खंडपीठाला सांगितले.एसएमएस, एमएमएस, इंटरनेट, पब्लिकेशन्स, व्हॉट्स अ‍ॅप, टेलिव्हीजन यांसारखे तंत्रज्ञान उपलब्ध असताना निमंत्रण पत्रिका पाठवण्याची आवश्यकता नाही. यावर एवढी मोठी रक्कम खर्च करण्यात अर्थ नाही. निश्चितच ही रक्कम वाचवली जाऊ शकते, असे खंडपीठाने म्हटले. ‘भक्तांना अन्य मार्गाचा वापर करून निमंत्रण पाठवण्यात येईल, ही संस्थानाच्या वकिलांची भूमिका योग्य आहे. संस्थानाने भविष्यातही या दोन गोष्टींवर (निमंत्रण पत्रिका छपाई आणि पोस्ट खर्च) खर्च करण्यासाठी अर्ज करू नये,’ असे म्हणत खंडपीठाने अन्य गोष्टींवर पैसे खर्च करण्याची मुभा संस्थानाला दिली. (प्रतिनिधी)