शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मंत्रीपदाची शपथ घेताना बाळासाहेबांची आठवण झाली नाही, किशोरी पेडणेकरांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 15:35 IST

Kishori Pednekar : शिवसेना (Shivsena) नेत्या किशोरी पेडणेकर यांनी शिंदे गटातील मंत्र्यांवर आणि भाजपवर निशाणा साधला आहे.

मुंबई : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा काल मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) झाला. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर विरोधी पक्षांकडून आता राज्य सरकारवर टीका होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर, अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांच्या मंत्रीपदावरुन विरोधक टीका करत आहेत. दरम्यान, शिवसेना (Shivsena) नेत्या किशोरी पेडणेकर यांनीही शिंदे गटातील मंत्र्यांवर आणि भाजपवर निशाणा साधला आहे.

"जे मंत्री महोदय झाले, त्यांचा पाळणा वेगवेगळ्या पक्षात हलला. त्यानंतर ते आमच्याकडे आले, त्यांचाही आम्ही बहुमान केला. शिवसेना आमचीच, धनुष्यबाण आमचंच, बाळासाहेबही आमचेच असे म्हणणाऱ्यांना मंत्रीपदाची शपथ घेताना बाळासाहेबांची आठवण झाली नाही. मंत्रीपदाची शपथ घेऊन 12 तासांच्यावर वेळ उलटून गेला. पण एकही आमदाराला बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर जाऊन दर्शन घ्यावे, असे वाटले नाही. याचा अर्थ फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी बाळासाहेबांचे नाव वापरायचे आणि बाळासाहेबांच्या घराण्याला, ठाकरे घराण्याला संपवायचे कसे, याचा विडा यांनी उचलला आहे", असा आरोप किशोरी पेडणेकर यांनी केला.

याचबरोबर, शिंदे-फडणवीस सरकारमध्ये व्यावसायिक मंगलप्रभात लोढा यांना मंत्रीपद दिल्यामुळे किशोरी पेडणेकर यांनी भाजपवर टीका केली आहे. बहुभाषिक मुंबईत, मराठी मुंबईत मंगलप्रभात लोढा हे विकासक आहेत, आमदार आहेत, भाजपने त्यांना मंत्रीपद दिले, पण आमच्यातून गेलेले, शिवसेनेला आई म्हणणारे मुंबईतील एकाही आमदाराला मंत्रीपद दिले नाही, ही मुंबईची शोकांतिका आहे, असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.

दरम्यान, राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर जवळपास एक महिन्याहून अधिक काळ मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. त्यामुळे विरोधी पक्षांतर्फे अनेकदा राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सरकारला घेरण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, अखेर रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार मंगळवारी पार पडला. पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात एकनाथ शिंदे यांच्या गटातील 9 आणि भाजपच्या 9 आमदारांना मंत्रिमंडळाची शपथ घेतली आहे.

'या' नेत्यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथशिंदे गटातील आमदार तानाजी सावंत, उदय सामंत, संदीपान भुमरे, दादा भुसे, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, शंभूराज देसाई, संजय राठोड, गुलाबराव पाटील यांनी आज कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. तर भाजपमधून गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, सुरेश खाडे, राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावित आणि मंगलप्रभात लोढा यांनी यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली.

थोडी नाराजी तर आहेच - बच्चू कडू शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात अपक्ष आणि मित्रपक्षांना सहभागी करून घेण्यात आल्याचे दिसत नाही. त्यावरुन आता राजकीय चर्चा सुरू झाल्या आहे. 'प्रहार' संघटनेचे बच्चू कडू यांनी आपली नाराजी बोलून दाखवली. "नाराजी नाही असं नाही. थोडी नाराजी तर आहेच. कारण जो उशीरा आला त्याला पहिल्या पंगतीमध्ये बसवले गेले. आणि जो पहिला गेला त्याला शेवट बसवले जात आहे. पण राजकारणात थोडं कमी जास्त होत असते", असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Kishori Pednekarकिशोरी पेडणेकरPoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे