शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
4
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
5
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
6
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
7
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
8
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
9
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
10
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
11
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
12
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
13
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
14
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
15
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
16
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
17
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
18
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
19
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
20
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा

बालाकोट एअर स्टाईकची चिकित्सा का आवश्यक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 16:19 IST

पुलवामा हल्ल्यानंचर भारताने दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त करण्यासाठी बालाकोट येथे एअरस्ट्राईक केला. त्यानंतर सत्ताधाऱ्यांनी या हल्ल्यात ३०० दहशतवादी मरण पावल्याचे घोषित केले. विरोधकांनी या मत दहशतवाद्यांच्या आकड्यावर शंका घेतली.. आणि एका नवीन राजकीय वादाला तोंड फुटले..खरंच बालाकोट एअर स्ट्राईकची चिकित्सा व्हायला हवी का ..? 

- विवेक भुसे- लोकसभा निवडणुकीच्या तयारीची पाहणी करण्यासाठी राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल हे पुण्यात आले होते़. त्याचवेळी नौदलाने दहशतवादी समुद्रामार्गे येण्याची शक्यता असल्याचा इशारा दिला होता़. त्यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जयस्वाल म्हणाले होते की, मुंबईवरील हल्ला आम्ही कधीही विचारु शकत नाही़.मुंबईवर झालेला हल्ला हा केवळ पोलीसच नाही तर सरंक्षण दल, गुप्तचर संस्था, राजकीय पक्ष, देशभरातील सर्व राज्यातील सरकारे, केंद्र सरकार आणि सामान्य नागरिक यापैकी कोणीही विसरु नये़. पाकिस्तानातून आलेल्या ८ जणांनी संपूर्ण देशाला तीन दिवस वेठीस धरले होते़. याची पूनावृत्ती होऊ नये़. भविष्यात कोणत्याही दहशतवाद्याने भारताकडे वाकड्या नजरेने पाहून यासाठी भारताच्या हवाई दलाने बालाकोट येथील जैश ए महंमदच्या तळावर केलेल्या एअर स्टाईकची चिकित्सा करणे आवश्यक आहे़. या एअर स्टाईकवरुन सत्ताधारी भाजप आणि विरोधक यांच्यात एकमेकांवर आरोपप्रत्यारोप सुरु झाले आहेत़. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तर आता एअर स्टाईकवरुन विरोधकांवर निशाणा साधताना जवानांच्या देशभक्तीवर सवाल करीत असल्याचे सांगत आहे़. निवडणुकीच्या या राजकारणात फायदा उठविण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे़ तर त्याचावर प्रश्न चिन्ह उभे करुन विरोधक लोकांना संभ्रमित करीत आहेत़. मात्र, त्याच्या पुढे जाऊन या एअर स्टाईकचा नेमका काय परिणाम झाला़ याचा भविष्याच्या दृष्टीने शोध घेण्याची नितांत आवश्यकता आहे़. जैश ए महंमदच्या या प्रशिक्षण तळावर सुमारे ३०० तरुण प्रशिक्षण घेत असल्याचे व त्या सर्वांचा खातमा झाल्याचा दावा भाजप करीत आहे़. तसे जर असेल तर ते हवाई दलाचे सर्वात मोठे यश म्हणावे लागेल़. मात्र, त्याला पुष्ठी देणारे पुरावे अद्याप समोर आले नाहीत़. मोदी सरकारने प्रथमच पाकिस्तानची हवाई हद्दीचा भंग करुन कारवाई केली़. त्यावर कोणत्याही देशाने पाकिस्तानची बाजू घेतली नाही़.ही आपल्या दृष्टीने चांगली गोष्ट झाली़. मात्र, त्याचवेळी परदेशी मिडियाने हा हल्ला व त्याचा झालेला परिणाम यावर वेगवेगळी मते व्यक्त केली आहे़. अनेकांनी या हल्ल्यात जैश ए महंमदचे काहीही नुकसान झाले नसल्याचा दावा केला आहे़ तर बीबीसीने ६० जण ठार झाल्याचे म्हटले आहे़. हे सर्व पहाता भारतीय गुप्तचरांनी आतापर्यंत या घटनेचा सर्व धुंडोळा घेतला असण्याची शक्यता आहे़ हवाई दलाला सोपविलेले काम त्यांनी केले़. त्यातून जैश ए महंमदच्या कँपचे किती नुकसान झाले, हे पाहणे व त्याची खात्री करणे गुप्तचर एजन्सीचे काम आहे़. त्याचवेळी हल्ल्यानंतर आपणच आपली पाठ थोपटून घेऊन निर्धास्त बसणेही चुक ठरु शकते़. जर या हल्ल्यात हा संपूर्ण कँप उद्धवस्त झाला नसेल तर तो भारतासाठी पुढील काळात खूप मोठा धोका ठरु शकतो़. मुंबईत केवळ ८ जण आले व त्यांनी देशाला वेठीस धरले होते़. आता बालाकोटला जैश ए महमंदच्या कँपवर ३०० जण प्रशिक्षण घेत होते़ (हल्ला करण्यात आला .तेव्हा तेथे ३०० मोबाईल अ‍ॅक्टिव्ह असल्याचे सांगितले जाते) त्यापैकी किती जण या हल्ल्यात मारले गेले़. त्यांचा कँप पूर्णपणे उद्धवस्त झाला का ? जर झाला अथवा नाही तरी आता ते पुढे काय करीत आहेत़ याची माहिती काढणे अत्यंत आवश्यक आहे़. जर या कँम्पचे फारसे नुकसान झाले नसेल व प्रशिक्षण घेणारे अनेक जण वाचले असतील तर ते भारतासाठी सर्वात धोकादाय ठरु शकते़. या हल्ल्यातून वाचलेले दहशतवादी अधिक पेटून उठतील व पुढील काळात ते एकत्रितपणे भारताला लक्ष्य करण्याची सर्वाधिक शक्यता आहे़. एका आत्मघातकी दहशतवाद्याने किती हाहाकार माजविला हे आपण पुलवामा घटनेत  पाहिले आहे़. या कँपवर तर शेकडोने आत्मघातकी पथक तयार करण्याचे काम सुरु होते, असे सांगितले जाते़. ते पाहता भविष्यात जर मुंबईत ते जसे आले तसे त्यांनी एकाचवेळी देशाच्या वेगवेगळ्या भागात जाऊन आत्मघातकी हल्ले केले तर देशात काय परिस्थिती निर्माण होऊ शकेल, याचा विचारही आपण सध्या करु शकत नाही़. त्यामुळे राजकीय नेते काय बोलतात, याकडे दुर्लक्ष करुन बालाकोट एअर स्टाईकच्या परिणामाची चिकित्सा होणे भविष्यासाठी अत्यंत आवश्यक आहे़ .

टॅग्स :Puneपुणेpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाindian navyभारतीय नौदलGovernmentसरकारcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस