शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

बदलापूर इफेक्ट : सरकार ॲक्शन मोडवर; दिवसभरात अनेक निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 06:31 IST

नियुक्तीआधी शाळा कर्मचाऱ्यांची आता हाेणार चारित्र्य पडताळणी, शालेय शिक्षण विभागाने काढला जीआर; महिनाभरात सीसीटीव्ही बसविणे बंधनकारक

मुंबई : बदलापूरच्या शाळेतील घटनेनंतर आता राज्य सरकार ॲक्शन मोडवर आले आहे. शाळांमधील मुलामुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक उपाययोजना करणारा आदेश शालेय शिक्षण विभागाने बुधवारी काढला. त्यानुसार कोणत्याही शाळेत कर्मचारी नेमताना आधी त्यांची चारित्र्य पडताळणी पोलिस विभागाकडून करणे अनिवार्य असेल. प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही असणे बंधनकारक राहील.

सीसीटीव्हीत आक्षेपार्ह वर्तन आढळल्यास संबंधितावर तत्काळ कारवाई करण्याची जबाबदारी शाळेचे व्यवस्थापन व मुख्याध्यापकांवर असेल. कंत्राटी कर्मचारी नेमताना त्याची माहिती पोलिसांना देणे बंधनकारक असेल. पुढील महिनाभरात शाळेच्या मोक्याच्या परिसरात योग्य प्रमाणात सीसीटीव्ही बसविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या बाबत हलगर्जीपणा केला तर कारवाई केली जाईल. हे सीसीटीव्ही चालू आहेत की नाही याची तपासणी, कंट्रोल रुम, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, फुटेजमध्ये आक्षेपार्ह बाब आढळल्यास कार्यवाहीची जबाबदारी मुख्याध्यापकांवर असेल.

शक्ती कायदा लवकरचमहिलांच्या सुरक्षेसंबंधीचा शक्ती कायदा लवकरात लवकर आणणे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. बदलापूरच्या घटनेत, आरोपीला पकडले आहे. कारवाई सुरू आहे. मात्र शाळा व्यवस्थित सुरू झाली पाहिजे त्यासाठी आजूबाजूला शांतता हवी, असे केसरकर यांनी सांगितले.

२६ ऑगस्टपर्यंत अक्षय शिंदेला पोलिस कोठडीकल्याण (जि. ठाणे) : बदलापूर येथील शाळेतील दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याचे वकीलपत्र घेण्यास कल्याण जिल्हा सत्र न्यायालयातील वकील संघटनांनी स्पष्ट नकार दिला. हा एक अत्यंत निंदनीय आणि घृणास्पद प्रकार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष प्रकाश जगताप यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आरोपी अक्षय शिंदे याला बुधवारी जिल्हा सत्र न्यायालयाने २६ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. 

‘त्या’ शाळेचा ताबा प्रशासकाकडेशिक्षणमंत्री दीपक केसरकर पत्रकार परिषदेत म्हणाले, बदलापुरातील शाळेत झालेला प्रकार हा घृणास्पद होता. यातील दिरंगाई अक्षम्य होती. शिक्षण उपसंचालकाला चौकशीचे आदेश दिले होते. तो अहवाल आमच्याकडे आला असून संचालकांनी या शाळेवर प्रशासकाची नियुक्ती केली आहे. उद्यापासून या शाळेचा ताबा प्रशासक घेतील.

अक्षयची झाली तीन लग्नेअक्षयचे वय २४ वर्षे असले तरी त्याची तीन लग्ने झाली होती. मात्र, तिन्ही पत्नी त्याला सोडून गेल्या आहेत. अक्षयचे शिक्षण दहावीपर्यंतच झाले असून, तो बदलापूरमधील एका शाळेत सफाई कामगार म्हणून काम करीत होता. याआधी तो एका इमारतीत सुरक्षारक्षक म्हणून होता. त्यानंतर एका कंत्राटाद्वारे त्याला एका खासगी शाळेत सफाई कामगार म्हणून नोकरी मिळाली. अक्षय कर्नाटकातील गुलबर्गा गावातील असून, त्याचा जन्म मात्र बदलापूरमधील खरवई गावात झाला.

आरोपी अक्षयच्या घराची तोडफोडबदलापूर : येथील शाळेतील गैरकृत्यातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याच्या खरवई येथील घराची ग्रामस्थांनी तोडफोड केली असून, त्याच्या कुटुंबीयांना घराबाहेर काढण्यात आले आहे. शिंदेच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अक्षय शिंदे येथील खरवई परिसरातील एका चाळीत राहतो. त्याच्या कुटुंबात आई-वडील आणि भाऊ हे तिघे आहेत. मंगळवारी शाळेतील गैरकृत्यात अक्षयचा सहभाग असल्याचे समजताच त्याच्या कुटुंबीयांना खरवईतील ग्रामस्थांनी घराबाहेर काढून घराची तोडफोड करत त्यांना गाव-परिसर सोडण्यास भाग पाडले. 

टॅग्स :badlapurबदलापूरCrime Newsगुन्हेगारी