शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

Priyanka Chaturvedi : "गेल्या १० दिवसांत १२..."; बदलापूर घटनेवरून प्रियंका चतुर्वेदींनी सरकारला धरलं धारेवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 14:45 IST

Badlapur Case And Priyanka Chaturvedi : प्रियंका चतुर्वेदी यांनी राज्यातील सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

बदलापूर येथील एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींसोबत घडलेल्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. यामुळे लोकांमध्ये तीव्र संताप आहे. या घटनेबाबत बदलापुरात लोक रस्त्यावर उतरले होते. याच दरम्यान महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आहे. या आंदोलनादरम्यान खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी राज्यातील सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

ANI शी बोलताना प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या की, "महिला आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचारात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या १० दिवसांत १२ घटना घडल्या आहेत. ठाण्यात POCSO कायद्यांतर्गत दररोज एक केस समोर येत आहे. आम्ही या सर्व वाईट गोष्टींचा विरोध करत आहोत. उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रात असे गुन्हे घडत आहेत."

प्रियंका यांनी महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून महायुती सरकारला धारेवर धरलं आणि म्हणाल्या, "आंदोलन करणाऱ्या महिला सांगत आहेत की, त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ नको, तर त्यांना महिलांची सुरक्षा हवी आहे. महाराष्ट्रातील महिला शक्ती कायद्याबाबत विचारत आहेत. मी स्वतः राष्ट्रपतींना पत्र लिहिलं आहे की तीन वर्षे झाली आहेत, पण त्याचं काय झाल?"

१७ ऑगस्ट रोजी बदलापूरमधील एका शाळेत काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याने चार वर्षांच्या दोन मुलींसोबत दुष्कृत्य केलं. शाळेच्या वॉशरूममध्ये मुलींशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी शाळेच्या व्यवस्थापनाने मुख्याध्यापक, वर्गशिक्षक आणि इतरही काही लोकांना निलंबित केलं आहे. मात्र, या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आणि संताप आहे.  

टॅग्स :badlapurबदलापूरShiv SenaशिवसेनाCrime Newsगुन्हेगारी