शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

तर उद्धव ठाकरेंच्या सुद्धा विरोधात जाऊ: बच्चू कडू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 14:38 IST

फडणवीस सरकारने केलेली दीड लाख रुपयांच्या कर्जमाफीचा फायदा प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मिळालाच नाही

मुंबई : मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेत येताच शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतला असून, त्यांच्या धाडसी निर्णयाचे कौतुक केलेचं पाहिजे. मात्र ज्या दिवशी उद्धव ठाकरे चूक करतील त्यादिवशी त्यांच्यासुद्धा विरोधात जाऊ, असा इशारा प्रहार संघटनेचे नेते आणि राज्य जलसंपदा मंत्री बच्चू कडू यांनी दिला आहे. एका डीजीटल मिडियावर मुलाखत देताना ते बोलत होते.

आमच्या सरकारने 2 लाखांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली आहे. त्यामुळे याचा फायदा 60 ते 70 टक्के शेतकऱ्यांना होणार असल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला. तर मागच्या फडणवीस सरकारने केलेली दीड लाख रुपयांच्या कर्जमाफीचा फायदा प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मिळालाच नाही. तर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यासाठी सुद्धा 25 हजार मिळाले नसल्याचा आरोप बच्चू कडू यांनी यावेळी केला.

तर उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीचे दिलेले आश्वासन पूर्ण करून दाखवले. विशेष म्हणजे इतर पक्ष निवडणुकीच्या तोंडावर अशा घोषणा करतात. मात्र उद्धव ठाकरे यांनी शपथविधीनंतर लगेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांच्या धाडसी निर्णयाचे कौतुक करायले पाहिजे असेही बच्चू कडू म्हणाले.

उद्धव ठाकरे मुख्यंमत्री आहे म्हणून मी त्यांच्याबद्दल चांगलं बोलत आहे असे नाहीत. ज्या दिवशी उद्धव ठाकरे चुकतील त्यावेळी त्यांचा विरोधात सुद्धा जाऊ, असेही बच्चू कडून यावेळी म्हणाले. तसंच माझं मंत्री पद गेलं तरी चालेल पण मी माझी भूमिका कधीच बदलणार नसल्याचेही बच्चू कडू म्हणाले.