शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
3
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
4
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
5
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
6
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
7
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
9
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
10
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
11
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
12
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
13
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
14
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
15
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
16
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
17
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
18
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
19
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
20
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
Daily Top 2Weekly Top 5

तर उद्धव ठाकरेंच्या सुद्धा विरोधात जाऊ: बच्चू कडू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 14:38 IST

फडणवीस सरकारने केलेली दीड लाख रुपयांच्या कर्जमाफीचा फायदा प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मिळालाच नाही

मुंबई : मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेत येताच शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतला असून, त्यांच्या धाडसी निर्णयाचे कौतुक केलेचं पाहिजे. मात्र ज्या दिवशी उद्धव ठाकरे चूक करतील त्यादिवशी त्यांच्यासुद्धा विरोधात जाऊ, असा इशारा प्रहार संघटनेचे नेते आणि राज्य जलसंपदा मंत्री बच्चू कडू यांनी दिला आहे. एका डीजीटल मिडियावर मुलाखत देताना ते बोलत होते.

आमच्या सरकारने 2 लाखांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली आहे. त्यामुळे याचा फायदा 60 ते 70 टक्के शेतकऱ्यांना होणार असल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला. तर मागच्या फडणवीस सरकारने केलेली दीड लाख रुपयांच्या कर्जमाफीचा फायदा प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मिळालाच नाही. तर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यासाठी सुद्धा 25 हजार मिळाले नसल्याचा आरोप बच्चू कडू यांनी यावेळी केला.

तर उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीचे दिलेले आश्वासन पूर्ण करून दाखवले. विशेष म्हणजे इतर पक्ष निवडणुकीच्या तोंडावर अशा घोषणा करतात. मात्र उद्धव ठाकरे यांनी शपथविधीनंतर लगेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांच्या धाडसी निर्णयाचे कौतुक करायले पाहिजे असेही बच्चू कडू म्हणाले.

उद्धव ठाकरे मुख्यंमत्री आहे म्हणून मी त्यांच्याबद्दल चांगलं बोलत आहे असे नाहीत. ज्या दिवशी उद्धव ठाकरे चुकतील त्यावेळी त्यांचा विरोधात सुद्धा जाऊ, असेही बच्चू कडून यावेळी म्हणाले. तसंच माझं मंत्री पद गेलं तरी चालेल पण मी माझी भूमिका कधीच बदलणार नसल्याचेही बच्चू कडू म्हणाले.