शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

तर उद्धव ठाकरेंच्या सुद्धा विरोधात जाऊ: बच्चू कडू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 14:38 IST

फडणवीस सरकारने केलेली दीड लाख रुपयांच्या कर्जमाफीचा फायदा प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मिळालाच नाही

मुंबई : मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेत येताच शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतला असून, त्यांच्या धाडसी निर्णयाचे कौतुक केलेचं पाहिजे. मात्र ज्या दिवशी उद्धव ठाकरे चूक करतील त्यादिवशी त्यांच्यासुद्धा विरोधात जाऊ, असा इशारा प्रहार संघटनेचे नेते आणि राज्य जलसंपदा मंत्री बच्चू कडू यांनी दिला आहे. एका डीजीटल मिडियावर मुलाखत देताना ते बोलत होते.

आमच्या सरकारने 2 लाखांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली आहे. त्यामुळे याचा फायदा 60 ते 70 टक्के शेतकऱ्यांना होणार असल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला. तर मागच्या फडणवीस सरकारने केलेली दीड लाख रुपयांच्या कर्जमाफीचा फायदा प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मिळालाच नाही. तर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यासाठी सुद्धा 25 हजार मिळाले नसल्याचा आरोप बच्चू कडू यांनी यावेळी केला.

तर उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीचे दिलेले आश्वासन पूर्ण करून दाखवले. विशेष म्हणजे इतर पक्ष निवडणुकीच्या तोंडावर अशा घोषणा करतात. मात्र उद्धव ठाकरे यांनी शपथविधीनंतर लगेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांच्या धाडसी निर्णयाचे कौतुक करायले पाहिजे असेही बच्चू कडू म्हणाले.

उद्धव ठाकरे मुख्यंमत्री आहे म्हणून मी त्यांच्याबद्दल चांगलं बोलत आहे असे नाहीत. ज्या दिवशी उद्धव ठाकरे चुकतील त्यावेळी त्यांचा विरोधात सुद्धा जाऊ, असेही बच्चू कडून यावेळी म्हणाले. तसंच माझं मंत्री पद गेलं तरी चालेल पण मी माझी भूमिका कधीच बदलणार नसल्याचेही बच्चू कडू म्हणाले.