शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
5
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
6
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
7
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
8
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
9
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
12
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
13
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
14
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
15
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
16
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
17
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
18
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
19
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
20
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?

तर उद्धव ठाकरेंच्या सुद्धा विरोधात जाऊ: बच्चू कडू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 14:38 IST

फडणवीस सरकारने केलेली दीड लाख रुपयांच्या कर्जमाफीचा फायदा प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मिळालाच नाही

मुंबई : मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेत येताच शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतला असून, त्यांच्या धाडसी निर्णयाचे कौतुक केलेचं पाहिजे. मात्र ज्या दिवशी उद्धव ठाकरे चूक करतील त्यादिवशी त्यांच्यासुद्धा विरोधात जाऊ, असा इशारा प्रहार संघटनेचे नेते आणि राज्य जलसंपदा मंत्री बच्चू कडू यांनी दिला आहे. एका डीजीटल मिडियावर मुलाखत देताना ते बोलत होते.

आमच्या सरकारने 2 लाखांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली आहे. त्यामुळे याचा फायदा 60 ते 70 टक्के शेतकऱ्यांना होणार असल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला. तर मागच्या फडणवीस सरकारने केलेली दीड लाख रुपयांच्या कर्जमाफीचा फायदा प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मिळालाच नाही. तर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यासाठी सुद्धा 25 हजार मिळाले नसल्याचा आरोप बच्चू कडू यांनी यावेळी केला.

तर उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीचे दिलेले आश्वासन पूर्ण करून दाखवले. विशेष म्हणजे इतर पक्ष निवडणुकीच्या तोंडावर अशा घोषणा करतात. मात्र उद्धव ठाकरे यांनी शपथविधीनंतर लगेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांच्या धाडसी निर्णयाचे कौतुक करायले पाहिजे असेही बच्चू कडू म्हणाले.

उद्धव ठाकरे मुख्यंमत्री आहे म्हणून मी त्यांच्याबद्दल चांगलं बोलत आहे असे नाहीत. ज्या दिवशी उद्धव ठाकरे चुकतील त्यावेळी त्यांचा विरोधात सुद्धा जाऊ, असेही बच्चू कडून यावेळी म्हणाले. तसंच माझं मंत्री पद गेलं तरी चालेल पण मी माझी भूमिका कधीच बदलणार नसल्याचेही बच्चू कडू म्हणाले.