शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
3
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
4
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
5
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
6
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
7
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
8
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
9
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
11
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
12
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
13
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
14
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
15
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
16
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
17
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
18
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
19
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
20
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला

“मोदींमुळे मंदिर-मशिदीचा प्रश्न सुटला, गडकरी PM असते तर रोजी-रोटीचा प्रश्न मिटला असता”

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2022 11:00 AM

महागाईने कळस गाठला आहे. मात्र केंद्रातील मोदी सरकारला त्याचे काही घेणे देणे नाही, अशी टीका महाविकास आघाडीतील मंत्र्यांनी केली आहे.

संग्रामपूर: देशात आताच्या घडीला मंदिर, मशिदीसह महागाई, बेरोजगारी, इंधनदरवाढ यांवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी मोठ्या प्रमाणात झडताना दिसत आहेत. विरोधक केंद्रातील मोदी सरकारवर सातत्याने निशाणा साधत असून, भाजपही त्यांना प्रत्युत्तर देत आहे. यातच आता महाविकास आघाडीतील एका नेत्याने केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांचे कौतुक करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खोचक टीका केली आहे. नितीन गडकरी पंतप्रधान असते, तर रोजी-रोटीचा प्रश्न मिटला असता, असे विधान या नेत्याने केल्यानंतर आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे सांगितले जात आहे. 

नितीन गडकरी नेहमीच बेधडक विधाने आणि चोख कामासाठी ओळखले जातात. आपल्या भाषणांमध्ये राजकारणापेक्षा विकासकामांवर जास्त भाष्य करणारे नितीन गडकरी यांनी अनेकदा भाजपलाही खडे बोल सुनावले आहेत. कोणत्याही प्रकल्पाची आकडेवारी नितीन गडकरी यांना तोंडपाठ असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. मोदी सरकारमधील सर्वाधिक कार्यक्षम मंत्री म्हणून ते ओळखले जातात. यामुळेच अनेकदा गडकरी पंतप्रधान व्हावेत असे सर्वसामान्यांसह अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांना वाटत असते आणि ते अनेकदा बोलूनही दाखवले जाते. महाविकास आघाडीतील मंत्री बच्चू कडू यांनीही नितीन गडकरी यांच्या पंतप्रधानपदाबाबत भाष्य केले आहे. 

गडकरी PM असते तर रोजी-रोटीचा प्रश्न मिटला असता

बच्चू कडू बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूरला रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यासाठी आले होते. यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी नितीन गडकरींचे कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीन गडकरी यांच्यातील फरक सांगताना म्हटले की, मोदी पंतप्रधान झाल्याने मंदिर, मस्जिदचा प्रश्न मिटला. पण गडकरी चांगले व्यक्ती असून ते पंतप्रधान झाले असते तर रोजी रोटीचा प्रश्न मिटला असता, असा टोला लगावत महागाईने कळस गाठला आहे. मात्र त्यांना काही घेणे देणे नाही. ज्यावेळी पंतप्रधान मोदींनी १०० रुपयांत गॅस वाटला, त्यावेळी ४०० रुपयांत सिलेंडर मिळत होते. आज त्याची किंमत एक हजारच्या वर गेली आहे, अशी टीकाही बच्चू कडू यांनी केली आहे. 

दरम्यान, बच्चू कडू यांच्या मातोश्री स्व. इंदिराबाई कडू यांच्या स्मृतीप्रित्यर्थ तालुक्यातील रुग्णांसाठी रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न झाला. संग्रामपुर तालुका आदिवासी दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो. या परिसरात आरोग्य सुविधेचा मोठ्या प्रमाणात अभाव आहे. संपूर्ण तालुक्याकरिता १०८ क्रमांकाची एकच रुग्णवाहिका असल्याने वेळप्रसंगी उपचाराअभावी अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागतो. या गोष्टीचा विचार करून नवनियुक्त जिल्हा उपाध्यक्ष राजेश लहासे यांनी आपल्या स्वखर्चातून बच्चू कडू यांच्या आईच्या स्मृतिची आठवण म्हणून रुग्णवाहिका विकत घेऊन नागरिकांच्या सेवेत दाखल केली. 

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूNitin Gadkariनितीन गडकरीNarendra Modiनरेंद्र मोदीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी