शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

मित्रपक्षानं महायुतीची साथ सोडली; विधानसभेला स्वबळावर २० जागा लढण्याची घोषणा

By कमलेश वानखेडे | Updated: June 12, 2024 20:27 IST

बच्चू कडुंचा महायुतीवर प्रहार, २० जागा लढणार., आज पदाधिकाऱ्यांची बैठक,  महायुतीतील फुटीचे कारण दोन दिवसात सांगणार

नागपूर - लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीची साथ सोडत वेगळी चुल मांडणारे बच्चू कडू यांनी विधानसभा निवडणुकीसाठीही ‘एकला चलो’ची भूमिका घेतली आहे. प्रहार जनशक्ती पक्षाची गुरुवारी बैठक बोलाविण्यात आली असून तीत २० जागा लढण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.

बच्चू कडू यांनी बुधवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना म्हणाले, लोकसभेत बच्चू कडू यांना सोबत का घेतले नाही हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा त्यांना विचारा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याच्या निमंत्रणाची मी वाट पाहिली नाही. एनडीएकडून एक एक पाऊल पडत आहे. ते माझ्या सोईचे पडत आहे. आम्ही सोबत राहून त्यांना मदत केली. पण एका वर्षात त्याचे परिणाम आम्हाला भोगावे लागले, असे सांगत त्यांनी महायुतीबद्दल नाराजी व्यक्त केली. फुटीचे कारण काय ते दोन दिवस वेळ द्या, मी सगळ सांगेन, असेही त्यांनी स्पष्ट केले.

संघाची भूमिका महत्वाची

संघाची भूमिका फार महत्त्वाची राहिली आहे. त्यांनी नैतिकता सोडली नाही. त्याचेच फटके राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दाखविले आहे. अमरावतीमध्ये राणाला मदत करू नका तसे तर पत्र काढले आणि त्याचा परिणाम ही भोगावा लागला, असे सांगत संघाचा भूमिकेला कडू यांनी एकप्रकारे समर्थन दिले.

जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावे

जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत आहे. त्यांची समाजाला गरज आहे. त्यांनी जास्तीत जास्त आमदार निवडून आणावे, त्यासाठी तयारीला लागावे. त्यांनी आता आंदोलन करू नये, उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती कडू यांनी केली. मी आता कुठेच मध्यस्थी करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :MahayutiमहायुतीBacchu Kaduबच्चू कडूEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाvidhan sabhaविधानसभा