शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
2
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
3
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
4
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
5
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
8
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
9
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
10
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
11
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
12
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
13
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
14
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
15
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
16
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
17
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
18
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
19
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
20
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...

शेतकऱ्यांवर अवकाळ, राज्यात शेतीचं प्रचंड नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 12:33 IST

Unseasonal rain in Maharashtra: राज्यात रविवारी आणि सोमवारी झालेल्या अवकाळी पावसाने दाणादाण उडविली वीज पडून तिघांचा बळी गेला आहे.  मराठवाड्यात १०७ मंडळांत तर खान्देशात २८ मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

मुंबई : राज्यात रविवारी आणि सोमवारी झालेल्या अवकाळी पावसाने दाणादाण उडविली वीज पडून तिघांचा बळी गेला आहे.  मराठवाड्यात १०७ मंडळांत तर खान्देशात २८ मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. पाऊस व गारांमुळे ऊस, केळी,पपई, मका व तूर या  पिकांना फटका बसला आहे. विदर्भात संत्रा कापूस पिकाला मोठा फटका बसला आहे. या पावसाने खरीपातील पिकांची हानी केली असली तरी  रब्बी हंगामातील हरभरा, गहू व ज्वारी अशा काही पिकांना हा पाऊस लाभदायक ठरणारा आहे. 

मराठवाड्यात १०७ मंडळांत अतिवृष्टी- विकास राऊतछत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याला रविवारी रात्रीपासून पहाटेपर्यंत अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसला. विभागात ४०.४ मि.मी म्हणजेच, दीड इंच पावसाची नोंद एकाच रात्रीत झाली. १०७ मंडळांत अतिवृष्टी झाली. त्यात एकाचा वीज पडून मृत्यू झाला, तर २३ लहान व मोठी ९ जनावरे दगावली. जालना ७०.७, परभणी ६५ मि.मी., तर हिंगोली जिल्ह्यात ६५.८ मि.मी. म्हणजेच अतिवृष्टीची नोंद झाली आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील चिमेगावातील राजू जायभाये (वय ३२) याचा वीज पडल्याने मृत्यू झाला.

कपाशी भिजली, तूर निजलीअकोला : अमरावती विभागात एकूण १८५ लहान-मोठ्या जनावरांचा मृत्यू व ५३ घरांची पडझड झाली आहे. पश्चिम विदर्भातील बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्याला अतिवृष्टीने झोडपून काढले. रविवारी मध्यरात्रीपासून मेघगर्जना, विजांच्या कडकडासह रात्रभर पाऊस झाला. पूर्व विदर्भात मात्र अपवाद वगळता तुरळक पावसाची हजेरी आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातही पावसामुळे नुकसान आहे. संत्र्याला झटका, तुरीला फटका हा पाऊस हरभऱ्यासाठी पोषक ठरत असला तरी वेचणीला आलेला कापूस, तूर व संत्रा पिकांचे नुकसान झाले आहे.

पुणे - भोर, आंबेगावमध्ये भाताचे नुकसानपुणे : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरू असून खेड, जुन्नर, आंबेगाव, भोर या चार तालुक्यांमध्ये पिकांना फटका बसला असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.भोर आणि आंबेगाव तालुक्यात भाताची कापणी सुरू आहे. द्राक्षे, डाळिंब, धने, मेथी, टोमॅटो, कांदा रोपे, मिरची, पालेभाज्या, गहू, कांदा, हरभरा, पपई, मका, फ्लॉवर, कोबी अशा सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.खान्देशात वीज पडून दोघांचा मृत्यूजळगाव/नाशिक : खान्देशातील जळगाव, नंदुबार धुळे जिल्ह्यात रविवारी रात्रभर जोरदार बरसल्यानंतर बेमोसमी पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान झाले तिन्ही जिल्ह्यांत  २८ महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे.   नंदुरबार जिल्ह्यात वीज पडून दोन शेतकऱ्यांसह एका बैलाचा मृत्यू झाला. मका झोपला, कांदा काळा पडलाअहमदनगर जिल्ह्यात पावसामुळे शेतात असलेला मका झोपला, लाल कांद्याचेही नुकसान झाले. आठ मंडळांत अतिवृष्टी झाली आहे. नाशिक जिल्ह्यात मालेगाव तालुक्यात रविवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसाने टोकडे गावात वीज पडून बैल ठार झाल्याची घटना घडली 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रRainपाऊस