शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

शेतकऱ्यांवर अवकाळ, राज्यात शेतीचं प्रचंड नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 12:33 IST

Unseasonal rain in Maharashtra: राज्यात रविवारी आणि सोमवारी झालेल्या अवकाळी पावसाने दाणादाण उडविली वीज पडून तिघांचा बळी गेला आहे.  मराठवाड्यात १०७ मंडळांत तर खान्देशात २८ मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

मुंबई : राज्यात रविवारी आणि सोमवारी झालेल्या अवकाळी पावसाने दाणादाण उडविली वीज पडून तिघांचा बळी गेला आहे.  मराठवाड्यात १०७ मंडळांत तर खान्देशात २८ मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. पाऊस व गारांमुळे ऊस, केळी,पपई, मका व तूर या  पिकांना फटका बसला आहे. विदर्भात संत्रा कापूस पिकाला मोठा फटका बसला आहे. या पावसाने खरीपातील पिकांची हानी केली असली तरी  रब्बी हंगामातील हरभरा, गहू व ज्वारी अशा काही पिकांना हा पाऊस लाभदायक ठरणारा आहे. 

मराठवाड्यात १०७ मंडळांत अतिवृष्टी- विकास राऊतछत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याला रविवारी रात्रीपासून पहाटेपर्यंत अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसला. विभागात ४०.४ मि.मी म्हणजेच, दीड इंच पावसाची नोंद एकाच रात्रीत झाली. १०७ मंडळांत अतिवृष्टी झाली. त्यात एकाचा वीज पडून मृत्यू झाला, तर २३ लहान व मोठी ९ जनावरे दगावली. जालना ७०.७, परभणी ६५ मि.मी., तर हिंगोली जिल्ह्यात ६५.८ मि.मी. म्हणजेच अतिवृष्टीची नोंद झाली आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील चिमेगावातील राजू जायभाये (वय ३२) याचा वीज पडल्याने मृत्यू झाला.

कपाशी भिजली, तूर निजलीअकोला : अमरावती विभागात एकूण १८५ लहान-मोठ्या जनावरांचा मृत्यू व ५३ घरांची पडझड झाली आहे. पश्चिम विदर्भातील बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्याला अतिवृष्टीने झोडपून काढले. रविवारी मध्यरात्रीपासून मेघगर्जना, विजांच्या कडकडासह रात्रभर पाऊस झाला. पूर्व विदर्भात मात्र अपवाद वगळता तुरळक पावसाची हजेरी आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातही पावसामुळे नुकसान आहे. संत्र्याला झटका, तुरीला फटका हा पाऊस हरभऱ्यासाठी पोषक ठरत असला तरी वेचणीला आलेला कापूस, तूर व संत्रा पिकांचे नुकसान झाले आहे.

पुणे - भोर, आंबेगावमध्ये भाताचे नुकसानपुणे : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरू असून खेड, जुन्नर, आंबेगाव, भोर या चार तालुक्यांमध्ये पिकांना फटका बसला असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.भोर आणि आंबेगाव तालुक्यात भाताची कापणी सुरू आहे. द्राक्षे, डाळिंब, धने, मेथी, टोमॅटो, कांदा रोपे, मिरची, पालेभाज्या, गहू, कांदा, हरभरा, पपई, मका, फ्लॉवर, कोबी अशा सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.खान्देशात वीज पडून दोघांचा मृत्यूजळगाव/नाशिक : खान्देशातील जळगाव, नंदुबार धुळे जिल्ह्यात रविवारी रात्रभर जोरदार बरसल्यानंतर बेमोसमी पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान झाले तिन्ही जिल्ह्यांत  २८ महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे.   नंदुरबार जिल्ह्यात वीज पडून दोन शेतकऱ्यांसह एका बैलाचा मृत्यू झाला. मका झोपला, कांदा काळा पडलाअहमदनगर जिल्ह्यात पावसामुळे शेतात असलेला मका झोपला, लाल कांद्याचेही नुकसान झाले. आठ मंडळांत अतिवृष्टी झाली आहे. नाशिक जिल्ह्यात मालेगाव तालुक्यात रविवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसाने टोकडे गावात वीज पडून बैल ठार झाल्याची घटना घडली 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रRainपाऊस