शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

'घाणेरड्या राजकारणासाठी संभाजी महाराजांच्या नावाचा वापर, उद्धव ठाकरे तुम्ही तर...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 21:16 IST

'चंद्रकांत खैरैंचा मुद्दा संपला, आता त्यांनी प्रोफेशनल डान्सर व्हावं. आता त्यांच्याकडे डान्स करण्याशिवाय दुसरं काही काम उरलं नाही.'

औरंगाबाद: गेल्या अनेक दिवसांपासून औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करावे अशी मागणी लावून धरण्यात आली होती. त्याला अखेर मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. शिवसेना मंत्र्यांनी हा प्रस्ताव कॅबिनेटसमोर आणला होता. त्यानंतर कॅबिनेटमध्ये या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामकरणास मंजुरी देण्यात आली आहे. दरम्यान, या निर्णयावरुन एआयएमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच, त्यांनी सरकारवर खोचक शब्दात टीकाही केली.

'आमच्यासाठी औरंगाबादच असेल'''आज आमची संपूर्ण नाराजी, राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर आहे. यांनी आतापर्यंत आपली सत्तेसाठी खालच्या पातळीचे राजकारण केले आहे. कॅबिनेट मीटिंगमधून दोन काँग्रेसचे मंत्री बाहेर आले होते, त्यांना थोडीही लाज असेल तर आजच राजीनामा द्यावा. अशाप्रकारचे नाटक करुन लोकांना मूर्ख बनवू नका. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेसच्या मंत्र्यांनी औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नागरिकांसोबत गद्दारी केली आहे. खुर्ची वाचवण्यासाठी हा त्यांचा खेळ आहे. औरंगाबादचा एक इतिहास आहे, तुम्ही शहराचा इतिहास मिटवू शकत नाही. तुम्ही काहीही नाव ठेवा, पण आमच्यासाठी हे शहर औरंगाबादच असेल.''

'उद्धव ठाकरे तुम्ही तोंड लपवू शकत नाही'

''आज त्यांना कळालं आहे की, त्यांची सत्ता जाणार आहे. तिन पायांचे सरकार स्थापन केले आणि जाता-जाता असा निर्णय देऊन गेले. मला उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारायचा आहे की, काही दिवसांपूर्वीच तुम्ही या शहरात आला होता. तुम्ही म्हणाला होता की, आम्ही औरंगाबादचा विकास आधी करू, पाणी देऊ. पण, आता अचानक काय जादू झाली अन् नामकरणाचा निर्णय घेतला. तुम्ही आता तोंड लपवू शकत नाही, जनतेसमोर यावंच लागेल. तुमच्या नीच राजकारणामुळे शहराचे वातावरण बिघडवू शकत नाही, हे शहर आमचे आहे. तुमच्या नीच राजकारणाला आम्ही योग्य उत्तर देऊ.''

संबंधित बातमी -'या दलाल नेत्यांवर थुंका, चपलांचे हार घाला', औरंगाबादच्या नामांतरावरुन जलील आक्रमक

'महाराजांवर तुमचे प्रेम नाही'''तुमचे संभाजी महाराजांवर प्रेम नाही, त्यांचे नाव वापरुन तुम्हाला राजकारण करायचे आहे. आज हा निर्णय तुम्ही स्वतःच्या फायद्यासाठी घेतला आहे. आता हा निर्णय केंद्रात गेला आहे, केंद्र विचार करेल की, लगेच यावर निर्णय घेतला तर क्रेडीट शिवसेनेला जाणार. यांना महाराजांवर प्रेम नाही, यांना फक्त राजकारण करायचे आहे. आमच्या पक्षांनी कधीच महापुरुषांचा वापर राजकारणासाठी केला नाही, पण यांनी आजपर्यंत हेच केलं.''

'नेत्यांच्या फोटोला चपलांचा हार घाला'''औरंगाबादच्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या दलाल नेत्यांना माझं चॅलेंज आहे, तुमच्यात हिम्मत असेल तर शहरात फिरुन दाखवा. तुमच्यात हिम्मत नाही, तुम्ही फिरू शकत नाही. तुम्ही लोकांचा विश्वासघात केला आहे. काही महिन्यानंतर निवडणुका होतील, तेव्हा यांना उत्तर मिळेलच. तोपर्यंत मी शहरातील लोकांना आवाहन करतो की, या नेत्यांच्या फोटोंवर चपलांचा हार घाला आणि सोशल मीडियावर व्हायरल करा, याच लायकीचे आहेत हे नेते. चंद्रकांत खैरैंनी आता प्रोफेशनल डान्सर व्हावं, आता त्यांचे राजकारण राहिले नाही. गेल्या पंचवीस वर्षांपासून चंद्रकांत खैरे याच मुद्द्यावरुन निवडून यायचे, आता हा मुद्दा पार पडला आहे. त्यामुळे आता त्यांच्याकडे डान्स करण्याशिवाय काही काम उरले नाही.''

टॅग्स :Imtiaz Jalilइम्तियाज जलीलUddhav Thackerayउद्धव ठाकरेAurangabadऔरंगाबादChandrakant Khaireचंद्रकांत खैरेAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन